Home Blog Page 215

क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजार ऐरोली येथे हळविल्याने उत्तनच्या मच्छीमारांचे होत आहे प्रचंड नुकसान!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: भाईंदरच्या उत्तन कोळी लोकांचा मासळी बाजार क्रॉफर्ड मार्केट येथून हलवून एरोली स्टेशन पासून आठ किलो मीटर लांब हलविण्यात आले असून त्यामुळे उत्तनच्या मच्छीमारांचे अतोनात हाल तर होतच आहे शिवाय त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान देखील होत आहे.

मासळी बाजार ऐरोली शहरापासून आठ किलोमीटर लांब अंतरावर हलविण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी मासळी घेण्यासाठी ग्राहक खूप कमी प्रमाणात येतात.

या परिसरात कांदळवन आणि पाणथळ जमीन असल्यामुळे सर्वत्र पाणी आणि चिखल जमा होतो त्यामुळे मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी खूपच अडचण येत आहेत.

या ठिकाणी मासळी विकण्यासाठी पत्र्याचे शेड देखील देखील नसल्यामुळे पावसाळ्यात मासळी खराब होऊ लागली आहे.

उत्तनच्या मच्छीमारांना आपली मासळी बाजारात विकण्यासाठी उत्तन ते ऐरोली आणि परत ऐरोली ते उत्तन असा किमान दहा ते बारा तासाचा कालावधी लागत आहे.

त्यामुळे याठिकाणी महिला शौचालय नसल्यामुळे त्यांची फारच गैरसोय होत आहे. शिवाय जी मासळी विकण्यासाठी हमाल जागा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात त्यासाठी हमाल शंभर रुपये प्रतिदिन घेत आहेत ही देखील एक प्रकारची लुटच आहे म्हणावी लागेल.

मासळीचा लिलाव करणाऱ्याला प्रत्येक कॅरेट मागे साढे तीन रुपये कमिशन दयावे लागतात. त्याशिवाय बर्फ़ाचा खर्च, टेम्पो भाडे, बोटीला डिझेल, खलाशी मेहनत आणि महिलांचे कष्ट हे सर्व वजाबाकी जोडली तर ज्या मासळीची किंमत एक हजार रुपये होणार तिथे फक्तं दोनशे रुपये प्रति कॅरेट होते आहे.

त्यामुळे मच्छीमारांना बोटी समुद्रात जाऊ नका असे फोन करून मासळी विकणाऱ्या महिलांनी निरोप दिला असल्यामुळे आता ५० टक्के बोटी समुद्रात गेल्याच नाही. ऐरोलीच्या बाजारात मासळी विकली गेली नसल्यामूळे मच्छीमार महिलांना पहिल्यांदाच मासळी फेकून द्यावी लागली.

मच्छीमार महिलांनी घेतली आमदार गीता जैन यांची भेट…

या विषयावर तोडगा काढण्यासाठी उत्तनच्या मच्छीमारांनी आमदार गीता जैन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ऐरोली तेथे मासळी बाजार हळविल्याने होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास या संबंधी चर्चा केली.

यावेळी उत्तनचे कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपली अडचण व होणारी गैरसोय हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी बोलताना एका मच्छीमार महिलेने उद्गार काढले की, “पायातील चप्पल व बूट शोरुममध्ये विकले जातात पण सर्वांना आवडत असलेली आणि माणसांची भोजन व्यवस्था करणारी मासळी मात्र बाजारात घाणीत विकावी लागते हे आमचे दुर्दैव आहे”

हे वाक्य ऐकुन मिरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांनी ही बाब अत्यंत गंभीर आहे असे सुचक उद्गार काढले. याबाबत आमदार गीता जैन यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्याशी या समस्ये बाबत चर्चा करणार असे आश्वासन उत्तनच्या मच्छीमारांना दिले आहे.

ज्यांच्या खांद्यावर राहुल गांधी हात ठेवतात तो पक्षच रसातळाला जातो ! नारायण राणे यांचा संजय राऊतांना खोचक टोला..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. “राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्षच रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही”, असा खोचक टोला राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. काँग्रेस आता कुठे आहे का ? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्षच रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं राणे यांनी म्हटले.

सव्वा महिना झाला. राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी १६ तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे. राज्य अधोगतीकडे चाललंय. त्यामुळे लोकांना जागृत करणार आहे, असं सांगतानाच परत चिपळूणला जाणार असून पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या गेल्या केंद्र सरकारने ७०० कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने केवळ दहा हजार रुपये दिले. लोकांनी ते पिंपात टाकले. आता ते फुगून बाहेर येतील, अशी मिश्किल टोला त्यांनी लगावला.

देशमुख पिता-पुत्राला पुन्हा ‘ईडी’ कडून समन्स..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लाँड्रिग’ प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ‘ईडी’ आणखी एकदा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत ते जारी केले जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

‘ईडी’ने गेले दोन दिवस देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून झडती घेतली आहे. त्या अनुषंगाने नव्याने समन्स पाठवले जाणार आहे. महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ‘ईडी’चा देशमुखांसह कुटुंबीयांच्या मागे ससेमिरा सुरू आहे. त्यांना आतापर्यंत ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश व पत्नी आरती देशमुख यांना अनुक्रमे दोन व एकवेळा चौकशीसाठी समन्स बजाविले. मात्र, तिघांनीही उपस्थित राहण्याचे टाळले आहे.

डोंबिवलीत खोणी येथील म्हाडाचे लाभार्थी मुदत उलटूनही घराच्या प्रतीक्षेत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली जवळ असलेल्या खोनी परिसरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. २०१८ साली या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. लाभार्थ्यांना मार्च २०२१ पर्यन्त घराचा ताबा देण्याचे आश्वासन म्हाडा कडून देण्यात आले होते. या घरांसाठी लाभार्थ्यांनी ९० टक्के रक्कम देखील भरली मात्र मुदत उलटूनही अद्यापही या इमारतीचे काम सुरू आहे .आज लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा करून देखील त्यांना घरे मिळालेली नाहीत. “आमचे राहत्या घराचे भाडे भरा, अन्यथा आमचा शेवटचा हप्ता माफ करा” अशी मागणी करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आत्ता म्हाडा या बाबत काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.

डोंबिवलीजवळ खोणी परिसरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातर्गत १६ इमारती उभारल्या जात आहेत. २०१८ साली अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या ठिकाणी घराची लॉटरी लागली होती. अनेक लाभार्थ्यांनी २०१८ ते आत्तार्पयत घराचे हप्ते म्हाडाला भरले आहे. मार्च २०२१ पर्यन्त घरांचा ताबा दिला जाणार होता. मात्र अद्याप प्रकल्पाचे काम सुरु आहे. प्रकल्पाच्या कामाची गती पाहता घरे तयार होण्यासाठी आणखीन वेळ लागणार आहे. या प्रकल्पात जवळपास १ हजार लाभार्थी आहेत. त्यातील काही लाभार्थी आज मोठय़ा संख्येने प्रकल्पाच्या ठिकाणी जमले होते. यावेळी लाभार्थ्यांनी काही लोकांनी ९० टक्के तर जणांनी १०० टक्के हप्ते भरले आहेत. म्हाडाने दिलेल्या मुदतीत घरांचा ताबा दिलेला नाही. आम्ही सर्व सामान्य लोक असून आम्ही आत्ता काय करणार. म्हाडा प्रशासनाने आम्ही ज्या ठिकाणी राहतो. त्याठिकाणच्या घराचे आठ हजार रुपये भाडे द्यावे. अन्यथा शेवटचा घराचा १ लाख ६० हजार रुपयांचा हप्ता माफ करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

या बाबत म्हाडा प्रकल्पाचे अधिकाऱ्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला गेला असता मात्र आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

दोन डोस घेतलेल्यांना येत्या ‘१५ ऑगस्ट’ पासून लोकल प्रवसाची परवानगी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दीड वर्षा पासून कोविड काळामध्ये उभारलेल्या महाभयंकर महामारीत मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी राज्याच्या प्रशासनाकडे विनंती केली आहे. आपणां सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही तोवर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष काढून आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाश्यांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण येत्या १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल ऍपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर ‘क्यूआर कोड’ असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल
मी आपणांस विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या किंवा बेकायदेशीर रित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व त्याचा पुरावा सोबत ठेऊन प्रवास करावा अशी मी विनंती करतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.