Home Blog Page 220

BREAKING NEWS! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणातुन संन्यास; खासदारकीही सोडणार.. भाजपला मोठा धक्का!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम ठोण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी “मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो व आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे” असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा केली आहे.

गेल्या काही काळापासून बाबुल सुप्रियो नाराज होते. यामुळे ते मोठा निर्णय घेतील असा अंदाज बांधला जात होता. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. पश्चिम बंगालचे असल्याने बाबुल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येही जाण्याची शक्यता होती. परंतू बाबुल यांनी आज राजकारणाचं सोडण्याची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे काम करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी या मागचे कारण गुलदस्त्यात गुप्तरीत्या ठेवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांची भाजपामध्ये कमी होत चाललेली भूमिका बरेच काही सांगून जात होती. बाबुल काहीतरी मोठा निर्णय घेतील असे बोलले जात होते. यावर बाबुल सुप्रियो यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पक्षासोबत माझे काही मतभेद होते. निवडणुकीच्या आधीच ते साऱ्यांसमोर आले होते. पराभवाची मी जबाबदारी घेतो, परंतु त्यासाठी बाकीचे नेते देखील जबाबदार आहेत, असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

बाबुल यांनी म्हटले की, पक्ष सोडण्याचा विचार मी बऱ्याच काळापासून करत होतो. राजकारण सोडण्याचे आधीपासूनच मन बनविले होते. मात्र, जे.पी नड्डा यांनी रोखल्यामुळे मी तो निर्णय मागे घेतला होता. आता काही नेत्यांबरोबर मतभेद वाढू लागले होते आणि वादही समोर येत होते, यामुळे मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.

बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते सांगितले आहे. तसेच भाजपसोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, माझा पक्ष भाजपाच होता आणि राहील असे म्हणत ज्यांना जे समजायचे आहे ते समजून जातील, असे सूचक वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे बाबुल सुप्रीयो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावेळी वगळले होते.

मला कोणत्याही पक्षाने फोन केलेला नाही, मी कुठेही जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस किंवा सीपीआयएम, कुठेच नाही. मी नेहमी एका टीमचे समर्थन केले आहे. मी अमित शहा आणि जे.पी नड्डा यांना राजकारण सोडण्याचे सांगितले आहे. मी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतू कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतलेले नाही.

सावधान! पुरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली भामटे व समाजकंटक सक्रिय!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

पूरग्रस्तांच्या नावाखाली कोणतीही आपत्ती कोसळली की, ज्याप्रमाणे दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन सढळ हस्ते मदत करतात, त्याचप्रमाणे काही भामटे, समाजकंटक या परिस्थितीचाही पुरेपूर गैरफायदा घेतात. राज्यात आलेल्या महापुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना फसविले जात आहे. विविध संस्थांच्या नावे समाजमाध्यमांवर जाहिराती करून मदत वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात स्वीकारली जात असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुरामध्ये झालेली जीवितहानी आणि वित्तहानी याबाबतचे फोटो आणि त्यासोबत सामाजिक संस्थांच्या नावाचा गैरवापर करून वस्तू आणि पैसे स्वीकारले जात आहेत. काही संस्थांच्या नावाचे प्रोफाइल तयार करून ती संस्था आपणच चालवीत असल्याचे भासविले जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी संस्थांच्या ऐवजी वैयक्तिक खात्याचा तपशील दिला जात असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी केलेले आवाहन :-
१) समाजमाध्यमांवर, इंटनेटरवरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

२) कुणाच्याही प्रोफाइलवर, लिंक वर क्लिक करू नका.

३) मदत करण्यापूर्वी संस्था अधिकृत असल्याची खात्री करा.

४) शहानिशा केल्या शिवाय समाजमाध्यमांवर मदतीचे संदेश व्हायरल करू नका.

५) ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना बँक खाते, डेबिट कार्डचा तपशील देऊ नका.

६) फसवणूक झाल्यास किंवा शंका आल्यास स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे किंवा येथे www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा असे सायबर सेल तर्फे आव्हान करण्यात आले आहे.

डोंबिवली वाहतूक विभाग यांचेकडून चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

अतिवृष्टी झाल्याने अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थिती मूळे चिपळूण येथील काही गावांवर फार मोठे संकट ओढावले आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे डोंगर-कडा कोसळून गावातील घरे जमिनीखाली गाडली गेली असून लोकांच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले आहे.

मा.पोलीस उप आयुक्त श्री. बाळासाहेब पाटील वाहतूक विभाग ठाणे व सहा.पोलीस आयुक्त श्री.उमेश माने पाटील वाहतूक विभाग कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली वाहतूक उपशाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे व अंमलदार यांनी स्वेच्छेने केलेली मदत तसेच साईश ग्रुपच्या श्रीमती राजश्री पवार यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त बाधित कुटुंबियांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पूरग्रस्त भागातील रहिवाशांना गहू, तांदूळ, डाळ, तेल व कपडे इत्यादीने भरलेला एक टेम्पो मा.पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग ठाणे यांनी पोलीस उप आयुक्त कार्यालय तीन हात नाका ठाणे येथून हिरवा झेंडा दाखवून आज रवाना केला.

सदर कार्यक्रमास मा.पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग ठाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही – मुंबई पोलीस

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात सहआरोपी असलेले पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही,
अशी हमी राज्य सरकारतर्फे मे. उच्च न्यायालयात देण्यात आली.
पठाण यांनी अटकेपासून दिलासा देण्याच्या आणि गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पठाण यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ ऑगस्टला ठेवली आहे.
तोपर्यंत पठाण यांना अटक केली जाणार नाही,
अशी हमी मुंबई पोलिसां तर्फे देण्यात आली आहे.
मीरा भाईंदरचे विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी परमबीर सिंह, अकबर पठाण आणि आणखी इतर चारजणां विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी मिरा भाईंदरच्या शिवसेनेच्या आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनमिया आणि विकासक सुनील जैन यांना अटक करण्यात आली असून या दोघांना आधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यामध्ये आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली असून मुंबई पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

डोंबिवलीतील ज्वेलर्स ची फसवणूक करणाऱ्या आरोपीस कल्याण क्राईम युनिट-३ ने केला २४ तासांत गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील ‘नार्वेकर ज्वेलर्स’ यांच्या दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करून दुकानदाराला बँकेतून ‘एनईएफटी’ द्वारे पैसे पाठवले आहेत असा मोबाईल वर खोटा संदेश दाखवून व बनावट धनादेश देऊन सोन्याची खरेदी करून अनोळखी आरोपी फरार झाला होता. त्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २९/०७/२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘सीसीटीव्ही’ फुटेज व मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हे शाखा घटक-३ कल्याणच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपी विनय राजेश लोहिरे (वय: ३८ वर्ष) राहणार: अंबरनाथ, जिल्हा: ठाणे याचा अंबरनाथ परिसरात शोध घेऊन शिताफीने पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकातील सपोनि भूषण दायमा, पोउपनि नितीन मुदगन, पोउपनि मोहन कळमकर, विलास मालशेटे, पोलीस हवालदार अरविंद पवार, निवृत्ती थेरे, सुरेश निकुळे, दत्‍ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, मंगेश शिर्के, अजित राजपूत, सचिन साळवी, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा हे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी कारवाई मध्ये उपस्थित होते.