Home Blog Page 221

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने जेष्ठ गायिका आशा भोसले सन्मानित..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य शासनाचा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेल्या ‘लोकराज्य’ यावेळी भेट म्हणून देण्यात आले.

‘भारतरत्न’ लता मंगेशकर आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झालेल्या आशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती आहेत. आणि त्यामुळेच आशा भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासन महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीतातले दिग्गज यांची मदत घेतली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

आरोग्य विभागाच्या आदेशाकडे खाजगी कोरोना रुग्णालयांचा काणाडोळा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

२२ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत न केल्याचे झाले उघड

कोरोना बाधित रुग्णांकडून अतिरिक्त देयक वसूल केल्याची बाब लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत उघड होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरातील २२ खासगी कोरोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ कोटी १४ लाख २८ हजार १२३ रुपयांची रक्कम परत केली नसल्याचे समोर आले आहे.

अशा रुग्णालयांना आरोग्य विभागाने पुन्हा नोटिसा बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रुग्णांना पैसे दिल्यानंतरच रुग्णालयांची नोंदणी नव्याने करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा नव्हती. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची मान्यता दिली होती. यापैकी काही रुग्णालयांकडून अवाजवी देयके आकारून रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लेखापरीक्षक विभागाचे विशेष पथक नेमले होते. या पथकामार्फत रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या सर्वच देयकांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे समोर आले. या सर्वच रुग्णालयांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले होते.

११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम तर २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल – राजेश टोपे

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून २५ जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील दुकांनाच्या वेळेत बदल होऊ शकतात. तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे म्हणाले की, ‘राज्यात शनिवार, रविवार दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यात बदल करून शनिवारी दुकाने ३ ते ४ वाजेपर्यंत चालू ठेवता येऊ शकतात. तसेच आठवड्याला (सोमवार ते शुक्रवार) दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती त्यात वाढ करून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू करता येऊ शकतात. रेस्टॉरंट, चित्रपटगृह, सलून, जिम हे ५० टक्के सुरू करता येईल. पण अशा ठिकाणी एसी नको, खेळती हवा असली पाहिजे. तसेच खासगी ऑफिस ५० टक्के सुरू करायला पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यास काही हरकत नाही’.

अकरा जिल्ह्यांत निर्बंध कायम..

राज्यातील अकरा जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितले.

लोकल सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसात..

सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबत चा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी आवर्जून सांगितले. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

या जिल्ह्यांत होणार निर्बंध शिथिल

मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद

विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली

कोकण: रायगड, ठाणे, मुबई

उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक

हे वरील जिल्हे निर्बंधांमध्ये शिथिलता यादीत आहेत असे राजेश टोपे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात, पालकांना दिलासा; निर्णय खाजगी शाळांना देखील लागू.. !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मंत्रिमंडळाने देखील शालेय शुल्क १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय खाजगी शाळांना देखील लागू असणार असल्याचा अद्यादेश राज्य सरकार लवकरच काढणार आहे.

राजस्थानमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणामध्ये जो निकष ठेवण्यात आला आहे. त्याच निकषानुसार राज्यातही शालेय शुल्क कपात करण्यता आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना फार मोठा दिलासा मिळेल याबाबत अध्यादेश राज्य सरकारद्वारे दोन दिवसांत जारी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ८५ टक्के फी भरावी लागणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खासगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील खासगी शाळा १५ टक्के फी कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना प्रश्न केला असता त्यांनी राज्य सरकारचा हा निर्णय यंदा लागू असणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपातीचा अध्यादेश काढण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कपात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुद्धा राजस्थानप्रमाणे १५ टक्के फी कपातीचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मोठी बातमी; साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना.. जाणून घ्या..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि मोठी बातमी आहे. मोदी सरकार या आठवड्यात साडेसात कोटी पीएफधारकांना चांगली बातमी देणार आहे.

बातमीनुसार, केंद्र सरकार पीएफ खात्यात व्याजाची रक्कम ३१ जुलैपर्यंत ठेवू शकते. खरेतर, अलीकडेच, केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के व्याज मंजूर केले. आणि आता अशी अपेक्षा आहे की या आठवड्यात ही रक्कम सुमारे ६.५ कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा होईल.

कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, ८.५% दराने ‘ईपीएफओ’ ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतील. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये शेवटच्या वेळी KYC च्या गोंधळांमुळे बर्‍याच सदस्यांना बराच काळ थांबावे लागले.