Home Blog Page 245

डॉक्टर्स डे निमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमांचे आयोजन

संपादक: मोईन सैय्यद / मिरारोड प्रतिनिधी

मुंबई: गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी डॉक्टरांनी आपले आयुष्य धोक्यात घालून अनेकांना जीवदान दिले आहे. कोविड काळात डॉक्टरांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी वॉक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. सुमारे १०० डॉक्टर्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कायर्क्रमातंर्गत समाजाप्रती नि: स्वार्थ सेवा दिल्याबद्दल डॉक्टरांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

मीरा रोडच्या वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे सेंटर प्रमुख डॉ. पंकज धमिजा म्हणाले, डॉक्टर्स हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. या कठीण परिस्थितीत जेव्हा आपण सर्व आपल्या कुटुंबाविषयी आणि स्वतःबद्दल काळजी घेत असतो, तेव्हा मात्र डॉक्टर्स त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता अविरत रुग्णसेवा पुरविण्याचे काम करतात. डॉक्टरांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी या महामारीच्या काळात तणावातून मुक्त राहण्यासाठी रुग्णालयाने हा एक कार्यक्रम आयोजित केला होता. कराओके, स्टँड-अप कॉमेडी अॅाक्ट्स आणि त्यानंतर चाट पार्टी अशा अनेक मनोरंजन कार्यक्रमात डॉक्टर सहभागी झाले होते. रूग्णांच्या रक्षणासाठी त्यांचे कौतुक करून त्यांना रौप्य पदकांनीही गौरवण्यात आले. त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच विशेष आभार देखील मानण्यात आले.

मीरारोड येथील वॉक्हार्ट हॉस्पीटलचे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश एल. भालेराव सांगतात डॉक्टर्स डे निमित्त आमच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. हॉस्पिटलद्वारे आयोजित सर्व उपक्रमांचा आम्ही पुर्णतः आनंद घेतला. यामुळे आम्हाला आमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ काढणे शक्य झाले आणि एकत्र येण्यास आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालविण्यास मदत झाली. साथीच्या आजाराच्या वेळी आम्ही आपली काळजी घेतली तशीच आमच्या सुरक्षेची काळजी हॉस्पीटलने घेतली यासाठी मी वोक्हार्ट हॉस्पीटलचे विशेष आभार मानतो

वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

बांद्रा कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर.श्रीनिवास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, “या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहत आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आता या परिसरात खूप वस्ती वाढली आहे. बीकेसी सारखे संकुलही उभे राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही.’’

बांद्रा कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा वरळी सागरी मार्ग / एस.व्ही मार्ग, सायन/धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोडरस्त्यासहीत इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेळेत साधारण १० मिनिटे बचत होणार आहे.या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली वरळी बांद्रा सागरी मार्गाकडून बांद्रा-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी बांद्रा-कुर्ला संकुलाकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे.

या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा-कुर्ला संकुल ते बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

त्यानंतर आज दि.२८ जून २०२१ रोजी बांद्रा वरळी सागरी मार्ग ते बांद्रा-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड यांना सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान!

संपादक: मोईन सैय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह


मुंबई राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले.

मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भुत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

मनुष्य कितीही यशस्वी झाला, संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःखाच्या प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सूर्यदत्ता समूहाच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनादेखील सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्यदत्ता संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार व वैशाली भागवत यांनी सत्काराला उत्तर दिले. पलक मुच्छल यांनी गीत सादर केले तर उर्वशी रौतेला यांनी गढवाली गाणे गायले.

महिलेच्या छातीतून आरपार गेली दीड फुटाची सळई; मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया!

संपादक: मोईन सैय्यद/मुंबई प्रतिनिधी

सलग तीन तास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचविले महिलेचे प्राण

शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आली शस्त्रक्रिया

विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) ही खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका २९ वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्या ठिकाणी असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना. मात्र, शीव परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढून सदर महिलेचा जीव वाचविला असून आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडण्यासह समर्पित भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे आणि संबंधित परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. देविदास क्षीरसागर यांनी कौतुक केले असून सदर चमूला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये ही अनेक गरजूंसाठी नवजीवन देणारी रुग्णालये असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या शनिवारी म्हणजेच दिनांक १९ जून २०२१ रोजी विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर आपले नेमून दिलेले बांधकाम विषयक काम करीत होती. हे काम करत असतानाच साधारणपणे दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई दुर्दैवाने महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्यानंतर या अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हलविण्यात आले.
..
सदर महिलेची असलेली अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) ‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सलग ३ तास सुरू होती.
..
या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील तीन विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेली १२ व्यक्तींची चमू अथकपणे कार्यरत होती. सदर दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात येऊन महिलेचे प्राण वाचविण्यात आले. आता सदर दुर्दैवी घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.
..

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या चमूमध्ये शल्यक्रिया विभागातील डॉक्टर विनीत कुमार, डॉक्टर रणजीत कांबळे, डॉक्टर पार्थ पटेल; हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉक्टर अमेय, डॉक्टर प्राजक्ता आणि परिचारिका श्रीमती तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशीही माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख तथा अधिष्‍ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली आहे.

मिरा भाईंदरच्या युएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिलीप घेवारे सुरतहून ताब्यात; ठाणे गुन्हे शाखेचे यश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पुर्व येथील सर्वे क्र. ६६३ आणि ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. युएलसीचे बिगरशेती बनावट कागदपत्र बनवून कसल्याही कोर्ट फी, स्टॅम्प ड्युटी, आवक जावक नोंदीशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामे करताना या बिल्डरांनी सरकारचा अब्जावधींचा महसूल बुडवला होता.

या कोट्यवधींच्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिकेत नगररचना विभागात कार्यरत असलेला सहाय्यक नगर रचनाकार दिलीप घेवरे याला आज सकाळी गुजरातच्या सुरत येथे ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. दिलीप घेवारे गेल्या दोन आठवड्यांपासून फरार होता आणि अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी त्याचे आटोकाट प्रयत्न चालू होते. आज त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी सत्र न्यायालयात ठेवण्यात आली होती मात्र सुनावण्यापूर्वीच त्याला गुन्हे शाखा ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुजरातमध्ये सुरत येथून अटक केली आहे.