Home Blog Page 248

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानीं साकेत येथील पम्पिंग स्टेशनला केली “सप्राईज व्हिजिट” पाणी पुरवठ्यासंबंधित जाणून घेतली माहिती!

संपादक: मोईन सय्यद/ मिरा-भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत पम्पिंग स्टेशन येथे “सप्राईज व्हिजिट” केली. एकंदरीत या पम्पिंग स्टेशनवर नेमक्या काय अडचणी आहेत? MIDC कडून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरवठा नीट होण्यातील तांत्रिक बाबी सविस्तर पणे चर्चा करून समजून घेतल्या. दररोज येणाऱ्या पाण्याच्या व्हॉल्युम वरील फ्लकच्युएशन, प्रेशर मधील फरक, पाण्याचे फिल्टरेशन, शटडाऊनची कारणे, पाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि अन्य महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने साकेत येथे कुठलीही पूर्व सूचना न देता कार्यरत पाहणी केली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष लीलाताई पाटील, नगरसेविका रुबिना फिरोज, मर्लिन डीसा, गीता परदेशी, माजी नगरसेवक फरीद कुरेशी, मिरा भाईंदर युवक काँग्रेस अध्यक्ष दीप काकडे व ओवळा माजीवडा युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल काटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MIDC कडून मिरा भाईंदर शहराला होणारा पाणी पुरवठा शहरात व्यवस्थित येत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजप पक्षाची आहे, महापौर, उपमहापौर यांची आहे. केवळ महानगरपालिका भवनात बसून सगळी काम होत नसतात. सत्ताधाऱ्यांना लोकहितासाठी चेंबर मधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून काम करणं गरजेचं आहे. मात्र मिरा भाईंदर शहराच्या दुर्दैवाने सत्ताधारी सध्या केवळ आपआपसांत हेवेदावे सांभाळण्यात मग्न आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सुयोग्य पाणी मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी व्यक्त केले असून शहराला होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी आम्ही यापुढेही असेच वेळोवेळी या साकेत येथील पंपिंग स्टेशनला भेट देत राहू असे म्हंटले आहे.

उत्तर मुंबईत पहिल्यांदाच ‘अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे कोविड-१९ रूग्णांवर उपचार
मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयानं वाचवले कोरोनाबाधित रूग्णांचे प्राण


संपादक: मोईन सय्यद/मीरारोड प्रतिनिधि

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात कोविड-१९ ची हलक्या-मध्यम स्वरूपातील लक्षणं असणाऱ्या रूग्णांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार दिले जात आहे. त्यानुसार कोविड-१९ विषाणूची लागण झालेल्या दोन रूग्णांवर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे उपचार करण्यात आले असून उत्तर मुंबईत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांवर या नवीन उपचारपध्दतीने या संसर्गावर मात करण्यात आली आहे.


कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांसाठी अँटीबॉडी कॉकटेल उपचारांना भारतात मंजुरी देण्यात आली होती. अशाच अँटीबॉडी कॉकटेल उपचारपध्दतीचा डोस अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानुसार आता वॉक्हार्ट रूग्णालयात कोरोना रूग्णांवर या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येत आहे.


६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन्ही कोरोना रूग्णांना मे महिन्यात उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्हीही रूग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा त्रास होता. या रूग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल थेरपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार कुटुंबियांची परवानगी घेऊन उपचार करण्यात आले आहे. या थेरपीनंतर रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लवकर दोन्ही रूग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांसाठी आता ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपी एक प्रभावी उपचार ठरत आहे.


मीरारोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन डॉ. जिनेंद्र जैन म्हणाले, “ ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कोरोना रूग्णांना ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ ही थेरपी देण्यात येत आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (एसओपी २) ९३ टक्के आहे पंरतू ते आँक्सिजन सपोर्टवर नाहीत परंतू त्यांना अन्य लठ्ठपणा, मधुमेह, यकृताचे आजार, हृदयरोग आणि फुफ्फुसाचे आजार असल्यास संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. तसेच, अतिगंभीर स्वरूपाच्या कोरोनाबाधित रूग्ण आणि एखादी अँलर्जी असणाऱ्या रूग्णांना या थेरपीची शिफारस केली जात नाही ”


डॉ. जैन पुढे म्हणाले, “’मोनोक्लोनल अँटीबॉडी’ हे कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मामधून काढलेले आहे. रुग्णांना ‘कासिरिविमॅब’ (६०० एमजी) आणि ‘इम्डेविमॅब’ (६०० एमजी) या दोन्ही औषधांचे गुण असलेलं औषध दिले जाते. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. अँटीबॉडी कॉकटेलची संपूर्ण डोस 30 मिनिटांत रुग्णाला दिली जाते. त्यानंतर एक तास रूग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येते. या औषधांमुळे कोरोना रूग्णांच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होत आहे.”


“कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आता वॉक्हार्ट रूग्णालयात ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ ही थेरपी सुरू करण्यात आली आहे. ही थेरपी विषाणूची तीव्रता कमी करण्यास आणि उच्च-जोखीम रूग्णांची प्रकृती खालावण्यापूर्वी त्यांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आम्ही जास्तीत जास्त रूग्णांना ही थेरपी घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ”असे डॉ. जिनेंद्र जैन म्हणाले.

शैक्षणिक कर्जासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे मलिक यांनी सांगितले.

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले, राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. १८ ते ३२ वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. ३३ टक्के इतक्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यानंतर ५ वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.

महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://malms.maharashtra.gov.in
या लिंकवर क्लिक करावे. पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

याशिवाय, केंद्र शासनाच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरिता विद्यार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रुपये तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ९८ हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करु शकतात, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली मनपा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना केडीएमसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत, तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-१९ ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये मुले विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता, कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळांच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील कोविड-१९ संसर्गाची लागण होणा-या ८ ते १२ वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विद्यालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.

त्यानुसार महापालिकेची सर्व प्राथमिक विद्यालये, खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालये यांच्या मुख्यध्यापकांकडून शाळेची संपूर्ण माहिती (मुख्यध्यापकांचे नाव, मेल आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक, शाळेचा संपूर्ण पत्ता, शाळेतील मुलांची संख्या इ.) उपलब्ध करुन घेणेबाबत तसेच “बालकांकरीता विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर “या संकल्पनेची माहिती संबधित मुख्याध्यापकास उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांस कळविण्यात आले आहे.

यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक‍ विद्यालयातील मुख्याध्यापकांना, त्यांनी ” माझा विदयार्थी ,माझी जबाबदारी ” या संकल्पनेस अनुसरून राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर मध्ये भरती होणाऱ्या मुलांच्या मनोरंजनासाठी आवश्यक उपाययोजना (वाचनालये, भिंतीवर कार्टुनची चित्रे, लहान बालकांची गाणी , बैठी सुरक्षित खेळणी इ.) करणेबाबत कळविण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुलांची मानसिकता व मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना वेळोवेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त यांचेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

सरकारच्या देशमुखप्रकरणी याचिकेला सी.बी.आय चा आक्षेप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेला सी.बी.आय सह मूळ तक्रारदाराने आक्षेप घेतला. अ‍ॅड.जयश्री पाटील यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेत उच्च न्यायालयाने सी.बी.आय ला देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

ही याचिका करण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला गेला होता. न्यायालयाने यावेळी मूळ तक्रारदाराची हस्तक्षेप याचिका करण्याची मागणी मान्य करताना राज्य सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अशी याचिका राज्य सरकार कशी काय करू शकते ? राज्य सरकारला अशी याचिका करण्याचा अधिकार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

सी.बी.आय तर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सरकारच्या याचिकेला विरोध केला. तपास रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.