Home Blog Page 254

ठाणे महापालीकेने दिली १०२ रूग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृहसंकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणा अंतर्गत ठाणे शहरातील जवळपास १०२ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेच्यावतीने सर्व खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृह संकुले यांच्यासाठी लसीकरण धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत महापालिकेने आतापर्यंत १०२ खासगी रूग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी दिली आहे.

केंद्र-राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत १०२ नवीन खासगी हॉस्पिटलना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून यामध्ये १८ क्लिनिक आणि ८४ रुग्णालयांचा समावेश आहे. महापालिकेच्या टीमच्या माध्यमातून सर्व क्लीनिक तसेच रुग्णालयांची कायदेशीर तपासणी करून लसीकरणासाठी सक्षम असल्याची पडताळणी करूनच रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना येथे यापूर्वीच लसीकरण सुरू करण्यात आले असून खासगी गृहसंकुलांमध्ये ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे पहिले खासगी लसीकरण करण्यात आले आहे.

आस्थापनांमध्ये १ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी, ५ हजार रुपये विद्यावेतनही मिळणार ! प्रशिक्षणाबरोबरच रोजगारही मिळणार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (महाराष्ट्र ऍप्रेंटीसशीप प्रोमोशन स्कीम – MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चालू वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये १ लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन अनुज्ञेय राहील, अशी माहितीही त्यांनी दिली. या योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना उपयोगी पडतील अशा ७१५ व्यवसायांना ही योजना लागू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री मलिक म्हणाले की, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम करुन प्रत्येक हाताला काम देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहित करून पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतील.

उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याबरोबरच राज्यातील युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार पारंपारिक व नवीन उद्योगक्षेत्रांमध्ये उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस (Basic Training Provider) प्रति प्रक्षिणार्थी प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. तसेच ज्या मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस केंद्र शासनाकडून प्रशिक्षण प्रतिपूर्ती मिळणार नाही अशा संस्थांना प्रशिक्षण खर्च रक्कम प्रतिपूर्ती प्रति प्रशिक्षणार्थी अनुज्ञेय राहील. यासंदर्भातील सविस्तर माहिती आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

राज्य सरकारकडून 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDA च्या महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या आर.ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आला होता. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्त झालेले मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय ते महसूल आणि वन विभागातही प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. तर MMRDA महानगरच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले एस.व्ही.आर. श्रीनिवास हे 1991 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती.

बदली झालेल्या IAS अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे बदली झाली

1) एस व्ही आर श्रीनिवास – प्रधान सचिव, गृहनिर्माण यांची नियुक्ती महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,  मुंबई या पदावर

2) लोकेश चंद्रा – प्रधान सचिव र.व का. यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर.

3) मिलिंद म्हैसकर – प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (गृहनिर्माण) या पदावर

4) विकास चंद्र रस्तोगी – यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.) सामान्य प्रशासन विभाग पदावर

5) बी वेणुगोपाल रेड्डी – व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम् यांची नियुक्ती प्रधान सचिव वने या पदावर

6) सुमंत भांगे – व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्ती सचिव, सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर

मंडणगडतालुक्यात कडक लॉकडाऊन प्रशासनाचे ऊत्तम नियोजन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे

मंडणगड:गणेश नवगरे.कोरोनोच्या दुस-या लाटीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या तालुका प्रशासनाचे आढावा बैठकीमध्ये सर्वच प्रशासनाचे विभागावांर नाराजी व्यक्त केली असताना त्यावेळी देखील पोलीस खात्याबाबत कोणतीही तक्रार किंवा चुक आढावा बैठकीत मिळालेली नव्हती त्यानुसार तालुक्यात खुप उत्तम प्रकारे पोलीस खात्याने आपली जबाबदारी पार पाडलेली असतानाच जिल्हाधिकारी यानी नुकतेच घोषित केलेल्या जिल्हयाचे कडक लाॅकडावूनची अमलबजावणी करताना पोलीस निरीक्षक श्री सुशांत वराळे यांनी आपले 27 पोलीस व 19 होमगार्ड यांचे सोबत नगरपंचायत मंडणगड यांचे साथीने आज पहील्याच दिवशी अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण शहर पूर्ण बंद ठेवून केलेल्या अमलबजावणीमुळे तालुक्यातील वाढत्या कोरोनो रूग्ण संख्येला नक्कीच आळा बसेल म्हणून जनमानसांतुन पोलीस खात्याचे व नगरपंचायतीचे कौतुक केले जात आहे. पुढील दिवसांतही असेच नियोजन करून तालुक्याचे वाढत्या रूग्णसंख्येच्या संकटातून दूर करण्यासाठी अशीच महेनत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील जनमाणसांतून होत आहे.

मंडणगड शहरामध्ये व तालुक्यातून येणारे नागरीकांचे सुरक्षीततेसाठीव कडक लाॅकडावूनच्या अमजबजावणीसाठी पोलीस निरीक्षक श्री वराळे यांनी तालुक्यात रायगड जिल्ळयाचे बाजूस म्हाप्रळ या ठिकाणी महाड तालुक्याचे बाजूस लाटवण या ठिकाणी तसेच मंडणगड शहरातध्ये दापोलीस फाटा भिंगळोली गावाचे प्रवेशव्दारावर तसेच पालवणी फाटयावर असे ठिक ठिकाणी नाके लावून अनावश्यक फिरणारे नागरीकांना शहरात येणे जाणे पासून रोखण्याचे काम करीत असतानाच स्वतः पोलीस निरीक्षक सर्वच नाक्यांवर गस्त घालीत असून नगरपंचायत च्या मदतीने शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून संपूर्ण शहर बंद ठेवण्याचे उत्तम नियोजन केले आहे. यामुळे तालुक्यात वाढती कोरोना रूग्ण संख्येस नक्कीच आळा बसेल व तालुक्यात वाढणारी कोरोनोची साखली तोडण्यास यांचे नियोजनाचा नक्की फायदा होईल अशी आशा सर्व सामान्य नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे.

या नियोजनाला तालुक्यातील जनतेस व्यापा-यांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून असाच पुढे काहीवस प्रतिसाद देवून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच वाढतील रूग्णसंख्या रोखीला सहकार्य करावे असे आवाहन श्री सुशांत वराळे यांनी सर्वसामान्य जनतेला तसेच व्यापा-यांना केले आहे.

१९ हजार लाचप्रकारणी फरारी पोलीस नाईक विलास सोनवणे एसीबीच्या जाळ्यात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जळगाव मध्ये धरणगाव येथे नेमणूकीस असलेला पोलीस नाईक विलास सोनवणे याने लाचेची मागणी केल्या प्रकरणी अ‍ॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता फिर्यादीस शिक्षा होणार नाही अशा पद्धतीने कागदपत्र तयार करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्याच्या मोबदल्यात १९ हजार रुपयांची विलास सोनवणे याने लाच मागितली होती.

या प्रकरणी पोलीस नाईक विलास सोनवणे याच्या विरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता. पोलीस नाईक विलास सोनवणे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दि.८ मार्च २०२१ रोजी भाग ५ गु.र.न. ११९/२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ व भा.द.वि. ३९२, २०१, १८६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस नाईक विलास सोनवणे फरार होता. दि. २७ मे रोजी एसीबी जळगाव युनीट मधील धडाकेबाज पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांना सदर आरोपी जळगांव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांनी आपले कौशल्य वापरुन फरार पोलीस नाईक विलास सोनवणे यास शिताफीने आपल्या जाळ्यात ओढून ताब्यात घेत वरिष्ठांसमक्ष हजर केले.पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.