Home Blog Page 264

३०० पोलीस कोरोना ‘सुपर सेव्हर’ समूहात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाबाधितांच्या उपचार मोहिमेत पोलिसांचाही सहभाग

मुंबईत राष्ट्रीय जनआरोग्य प्रशिक्षण आणि अनुसंधान संस्थेने कोरोनाबधितांना त्वरित उपचार, सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ‘सुपर सेव्हर’ समूह तयार करण्याची योजना आखली असून त्यात पोलीस दलासही सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पोलीस दलातील ३०० अधिकारी अंमलदारांची ‘सुपर सेव्हर’ समूहात निवड केली जाणार आहे. ‘सुपर सेव्हर’ समूह कोरोना उपचार केंद्र आणि बाधित त्यांच्यातील दुवा किंवा पूरक जबाबदारी पार पाडेल. चाचणीतून कोरोना बाधितांचे निदान झाल्यानंतर अनेक रुग्णांना रुग्णालयात किंवा कोरोना उपचार केंद्रात बेड्स मिळत नाही. अनेकांना घर ते रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नाही. काहींना प्राणवायू, कृत्रिम श्वसन यंत्रणेची आवश्यकता असते. अशावेळी बाधितास उपचार मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे संसर्ग पसरून रुग्णाच्या जीवावर बेतते आणि वैद्यकीय यंत्रणेवरही ताण येतो. निदान झाल्यापासून उपचारांस सुरुवात होण्यापर्यंतच्या काळात (गोल्डन अवर) ‘सुपर सेव्हर’ समूह रुग्णांना आवश्यक ती मदत पुरवणार आहेत.

रुग्णवाहिकेस विलंब होत असल्यास पर्यायी व्यवस्था उभी करून त्याआधारे बाधितास रुग्णालयात नेणे, बेड उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील उपचार आवश्यक नसलेल्या बाधितांना विलगीकरणात दाखल करणे ही सुपर सेव्हर समूहाची प्रमुख जबाबदारी असेल. जनआरोग्य प्रशिक्षण, अनुसंधान संस्थेने अशा समूहांत पोलिसांनाही सहभागी करून घ्यावे, अशी सूचना केली आहे. त्यादृष्टीने मुंबई पोलीस दलाने ३०० अधिकारी, अंमलदारांची निवड सुरू केली असून लवकरच त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल, असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू; कोरोना संक्रमण वाढण्याची भीती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवा सुरू ठेवण्याची अनुमती दिली गेली असली तरी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतचे बहुतांश हॉटेल रात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. दिवसा पार्सल आणि रात्री ग्राहकांची झुंबड असे चित्र काही हॉटेलांमधून दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई व गुजरात राज्यामध्ये असलेल्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सोळा हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज ८०० ते ९०० रुग्ण वाढ होत होती. सध्या टाळेबंदीचा परिणाम होऊन रुग्णवाढ २०० ते २५० च्या जवळपास देऊन ठेपली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत राज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांना फक्त पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

असे असतानाही महामार्गावरील काही हॉटेलचालक दिवसा पार्सल सुविधा आणि रात्रीच्या वेळी हॉटेल व मद्यविक्री सुरू ठेवत असल्याचे आढळून आले आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा पंधरा ते सतरा मोठी हॉटेल्स रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने सुरू असतात. या ठिकाणाहून दर तासाला पोलिसांचे गस्ती पथक फेरी मारत असले तरी आजवर कोणत्याही हॉटेल चालकावर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. मनोरजवळील एका हॉटेल व्यावसायिकाचा अलीकडेच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून परराज्यातील चालकांच्या खानपान सेवेत रुजू असलेल्या काही स्थानिक कामगारांना या आजाराचे नव्याने संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे.

कासव तस्करी करणारे वनविभागाच्या ताब्यात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे येथे कासवांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना ठाणे वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ कासव जप्त केले आहेत.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, वनक्षेत्रपाल ठाणे, रोड स्टाफ यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पांचपाखाडी, विवियाना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी, ठाणे येथे वन्यपक्षी / वन्यप्राणी तस्करी करत असताना २ इसमांना ताब्यात घेऊन २ कासव जप्त करून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.

देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतूसासह एकास अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई – तुर्भे येथील व्यापाऱ्यास लुटण्याकरीता जाणाऱ्या एका इसमास देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतूसासह एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, माउली सिरॅमिक कंपनी जवळ, बँक ऑफ इंडिया रोड, सेक्टर २३, तुर्भे, नवी मुंबई येथे एक इसम अग्निशत्र घेऊन येणार असल्याची माहिती एपीएमसी
पोलिसांना मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या इसमास अटक केली. त्याच्याजवळ १ देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतूसे बेकायदेशीर मिळून आले. सदर देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतूसे जप्त करून सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदर ठिकाणी एका व्यापाऱ्यास पिस्टलचा धाक दाखवून त्याच्या कंपनीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आला असल्याचे त्याने सांगितले.

अटक इसमाकडून एकूण ५२, ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बिहार मध्ये ७३ मृतदेह नदीतून काढले बाहेर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये, देशातील काही शहरांमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे धक्का बसेल. बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये नदीतून कोरोनाबाधित ७३ मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिहार सरकारच्या म्हणण्यानुसार, बक्सर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३ मृतदेह गंगेमधून काढण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे त्यांचा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम अंत्यसंस्कार न केल्यामुळे हे मृतदेह गंगा नदीत फेकल्या गेल्याची शक्यता आहे. आता चौसा गावातील महादेव घाट येथे जेसीबी ने खणून हे मृतदेह पुरण्यात येत आहे.

बिहारचे जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी बक्सर जिल्ह्यातील चौसा गावाजवळील गंगा नदीत सापडलेल्या मृतदेहांबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, गेल्या ४-५ दिवसांत हे मृतदेह शेजारील उत्तर प्रदेशातून वाहून गेले आणि बिहारपर्यंत आले. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह मिळाल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढे मृतदेह सापडल्याने गंगा नदीच्या स्वच्छता आणि सुरळीत प्रवाहाबद्दल नेहमीच चिंतेत आहेत. असंख्य मृतदेह वाहून आल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागला आहे, असे मंत्री संजयकुमार झा यावेळी बोलताना म्हणाले.