Home Blog Page 266

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला विभाग अधिक सक्षम करावा अशी महत्वपूर्ण सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पाणीपुरवठा आणि मलनिसारण विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन व्हीसीद्वारे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेकडे राज्यातली अनेक महत्वाची काम सुरू असली, तरीही ती पूर्ण करण्याची गती वाढवण्याची गरज आहे. राज्याच्या विकासातील महत्वाचा घटक असलेल्या या प्राधिकरणाने त्यासाठी वेगाने हालचाली करण्याची गरज श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. प्राधिकरणातील काम पूर्ण करण्यासाठी तज्ञ संस्थांची मदत घेणे तसेच एमएसआरडीसीच्या धर्तीवर या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दिलेले काम प्राधिकरण वेळेत पूर्ण करते अशी खात्री पटली तरच राज्यातील महानगरपालिका अनेक काम तुमच्याकडे देतील असा विश्वस श्री. एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.

मंत्रीमहोदयांनी केलेल्या सूचनेनुसारच अनेक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपन्यांच्या सहकार्याने यापुढे काम करण्याचे प्राधिकरणाने निश्चित केले असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी, शहा कन्सल्टन्सी, प्राइमो कन्सल्टन्सी, पुराणिक व्हेंचर्स, एमएसपी इंटरनॅशनल यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांची मदत घेणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसच कंत्राटी पध्दतीने अभियंते आणि उप-अभियंते यांची रिक्त पदे भरून हा विभाग गतिमान करणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे मंत्री श्री. गुलाबराव पाटील, या खात्याचे राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, नगरविकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, नगरविकास विभागाचे सचिव श्री. महेश पाठक आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

भाजपाच्या माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव- सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील सागाँव-सागर्ली येथील सागावेश्वर मंदिर जवळ २० हजार दशलक्ष पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. कोरोनाचे संकट पाहता यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांनासह हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी भाजप च्या माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, नामदेव पाटील, सुहासिनी राणे, पूनम पाटील, जनार्दन भोईर, भाऊ ठाकूर, प्रफुल पठारे, ऋषिकेश देशमुख, उमेश भंडारे, वसंत सुखदरे, छाया कांबळे, दिलीप पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेविका डॉ.पाटील ह्या महानगरपालिकडे पाठपुरावा करत होत्या. माजी नगरसेविका सुनीता पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पुढील वर्षभरात प्रभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघेल असे यावेळी डॉ.सुनीता पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच अमृत योजना अंतर्गत व कल्याण-डोंबिवली (मुंबई महानगर प्रदेश) मध्ये अनेक कामं मंजूर करवून घेउन बरीच कामे जलद गतीने होत आहेत. बरीचशी कामे प्रगतीपथावर आहेत त्याबद्दल माजी नगसेविका डॉ. सुनीता पाटील, पालकमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

लोकल ट्रेनमध्ये आवश्यक सेवा पुरवठादाराखेरीज इतरांना परवानगी देणार नाही; महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली माहिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट केलं की मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेलमध्ये प्रवास करण्यावरील सध्याचे निर्बंध या टप्प्यावर शिथिल केले जाणार नाहीत कारण अद्याप कोविड कोरोनाची प्रकरणे पसरत आहेत.

कार्यवाह सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी खंडपीठाला माहिती दिली की शहरातील आघाडीचे आरोग्य कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांना शहरातील लोकल गाड्या, मेट्रो किंवा मोनोरेलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सहकारी बँका कर्मचारी युनियनने (सीबीईयू) दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे निवेदन देण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या कामात लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल सेवांच्या मार्गाने प्रवास करण्याची परवानगी मिळावी यासाठी राज्य शासनाकडे निर्देश मागितले.
सीबीईयूचे वकील ए.एस पीरझादा यांनी खंडपीठाला सांगितले की, गेल्या वर्षी पूर्ण ताळेबंद असताना त्याच्या ग्राहकांना लोकल गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचे ग्राहक आवश्यक बँकिंग सेवा करीत आहेत.

पीरजादा पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचार्‍यांना वाहतुकीच्या या पद्धतींमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे, सहकारी बँकांच्या तसेच खाजगी बँकांच्या कर्मचार्‍यांनाही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. यावर काकडे यांनी खंडपीठाला माहिती दिली की राष्ट्रीयकृत बँकांच्याच नव्हे तर केवळ सरकारी कर्मचार्‍यांनाच परवानगी दिली जात आहे.
ते म्हणाले, “राज्यात कोविड चे संक्रमण अद्यापही पसरले आहे. आम्ही आत्ता इतर कोणासाठीही गाड्या उघडू शकत नाही.”

दरम्यान, आणखी एक याचिका नमूद केली गेली आहे ज्यात अधिवक्ता के.आर.तिवारी यांनी खंडपीठाला वकिलांना स्थानिक गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.
ते म्हणाले की, गेल्या वर्षी न्यायालयात जाण्यासाठी वकिलांना स्थानिक गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.

ठाणे पोलीस आयुक्त कोण? यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर झाले मनोमिलन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ही गेले काही दिवस रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी जय जीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जयजित सिंह यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जय जित सिंग हे भारतीय पोलिस सेवेच्या १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली. त्यावेळेपासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले जयजीत सिंह यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होत होती. तथापि जय जित सिंह यांच्या नावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकवाक्यता होत नव्हती.

ठाकरे सरकार मधील खातेवाटपात गृहखाते राष्ट्रवादी च्या ताब्यात असल्यामुळे या खात्यातील नियुक्त्या, बदल्या या राष्ट्रवादी मार्फतच करण्यात याव्यात असा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा आग्रह होता. तर दुसरीकडे शिवसेनेतील वजनदार मंत्री हे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद ज्या पक्षाकडे आहे त्यांनी केलेल्या शिफारशी विचारात घेऊन गृह खात्यातील नियुक्‍त्या तसेच बदल्या करण्यात याव्यात याबाबत आग्रही होते. अखेरीस आज याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चर्चेअंती मनोमिलन होऊन त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी जय जित सिंह यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच जगजित सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश निघतील असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात येत आहे.

जागतिक परिचारीका दिनानिमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये परीचारीकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणा-या उपक्रमाचे आयोजन

संपादक: मोईन सय्यद / मुंबई, प्रतिनिधी

उपक्रमातंर्गत १०३० परिचारीकांच्या कार्याचा गौरव करित सन्मानित करण्यात आले

मिरारोड: वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जागतिक परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट ग्रुप हॉस्पिटल्सच्या वतीने सुमारे १०३० परिचारीकांना सन्मानित केले. मीरा रोड तसेच इतर भागातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवित परिचारीका दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादीत न ठेवता आठवडाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन हा व्हॉईस टू लीड (नेतृत्वाचा आवाज) या संकल्पनेवर आधारीत होता. भविष्यातील आरोग्य सेवेसाठी एक दृष्टी ठेवत कोणत्याही परिस्थितीत अविरत रूग्ण सेवा करण्याचे वचन यावेळी देण्यात आले.

कोरोना सारख्या संकट काळातही अहोरात्र रुग्णसेवा पुरविणा-या ख-या अर्थाने कोव्हीड वॉरिअर्स ठरलेल्या परिचारीकांची भूमिक खरोखरच वाखण्याजोगी आहे. याच परिचारीकांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपुर्ण आठवडाभर गायन स्पर्धा, सेल्फी काढणे, विविध कलागुण सादर करणे, नृत्याविष्कार आदी उपक्रमांचे आयोजन हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले होते. वाँक्खार्ट हॉस्पिटल सोबोच्या एलिझाबेथ जोसेफ यांची सर्व परिचारीकांच्या वतीने प्रतिज्ञा घेतली. तर वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच क्लिनिकल डायरेक्टर डॉ क्लाईव्ह फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. या क्षेत्रात पाच वर्षाहून अधिक काळ सेवा पुरविणा-या परिचारीकांना सोन्याचे नाणे भेट देत विशेष सत्कार करण्यात आला.

वाँक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालक जहाबिया खोराकीवाला सांगतात हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे दिवसरात्र रुग्णसेवेकरिता कार्यरत असलेल्या परिचारींकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे होय. या महामारीच्या काळात संकटाशी लढणा-या रूग्णांना मानसिक आधार देणे, त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवित त्यांची काळजी घेणे, त्यांच्या सुरक्षिततेबाबत खात्री करून घेणे अशा अनेक प्रकारे परिचारीकां आपआपली भूमिका बजावित आहेत आणि यापुढेही बजावणार आहेत. या परिचारीकांना समाजात आदराचे स्थान मिळावे तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे, याकरिता अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात आला होता.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अखंड रुग्णसेवा पुरविणा-या या परिचारीकांच्या कार्याला सलाम करत कोरोना सारख्या संकटाला लढा देण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजाविणा-या या परिचारीकांचा आम्हाला खुप अभिमान वाटतो. रुग्ण सेवा करताना कसलाही भेदभाव न करता रुग्णांना अविरत सेवा पुरविणा-या परिचारीका या आरोग्यसेवेचा महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन डॉ. क्लाईव्ह फर्नांडिस, वाँक्हार्ट हॉस्पिटलमधील ग्रुप क्लिनिकल डायरेक्टर यांनी केले.