Home Blog Page 271

कोरोना काळात कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे –

बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय २८) तिचा गळा दाबून तर मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे (वय १ वर्ष २ महिने) याचा सुरीने गळा कापून खून केला.

याप्रकरणी दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. कामधंद्यासाठी मागील काही महिन्यांपासून ते कदमवाक वस्ती परिसरात आले होते. येथील एका घरात ते भाड्याने राहत होते. मागील काही दिवसांपासून काम नसल्यामुळे हनुमंत शिंदे बेरोजगार होता. यामुळे त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हे भयानक कृत्य केले. पत्नी आणि लहान मुलाचा खून केल्यानंतर त्याने राहत्या घरात बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्यांना अटक

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्या ३ जणांना कोनगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमधून आग्रा येथून बटाट्याचा माल भरून कल्याण येथे नाशिक मुंबई रोडने जात असताना सरवलीपाडा येथे त्यांच्या गाडीच्या पाठीमागून मोटार सायकलवरून तीन जणांनी येऊन फिर्यादीस ओरडून ‘गाडी रोक तुमने हमे कट क्यू मारा’ असे म्हणत फिर्यादी आणि साक्षीदार यांना मारहाण करून फिर्यादी यांचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरीने काढून घेतले व टेम्पोची काच फोडून नुकसान केले असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून ३ जणांना अटक करून त्यांच्याकडून मोटार सायकल, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ३४,८००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

डोंबिवलीच्या शिवसेना मध्यवर्ती शाखेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन बँकेचे उदघाटन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दि.०८.०५.२०२१ रोजी ऑक्सिजन बँकेच्या उदघाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ह्या ऑक्सिजन बँकेचे उदघाटन झाले. अत्यावश्यक गरजू लोकांना मोकळ्या हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर युनिट रोलिंग तत्वावर निशुल्क वाटण्यात आले.

यावेळी कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर सौ. विनिताताई राणे, कल्याण लोकसभा युवासेना जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे, राजेश कदम, सागर जेधे, माजी परिवहन समिती सभापती सुधीर पाटील, उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, कार्यालय प्रमुख सतीश मोडक, उपशहर संघटक दीपक भोसले, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविताताई गावंड, डोंबिवली विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, डोंबिवली शहर विधानसभा अधिकारी राहुल म्हात्रे, माजी परिवहन सभापती संजय पावशे, परिवहन सभापती मनोज चौधरी, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, वसंत भगत, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, विभागप्रमुख अमोल पाटील, कल्याण ग्रामीण संपर्कप्रमुख एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील हे या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते..

राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात महाभयंकर कोरोना संसर्गाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनते पर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने ‘कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स’ कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना ‘कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स’ अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये ही पत्रकारांचा समावेश महाविकास आघाडी सरकार ने केलेला नाही. परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्स चा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही. ही खेदजनक बाब आहे. पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या या बिकट काळात १२४ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार ने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर ५० लाख रुपये मदत निधी द्यावा त्यासाठी ‘कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा’ म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्र पाठवून केली आहे.

पालिकेच्या डोंबिवलीतील लसीकरणात भाजपा च्या समीर चिटणीस यांची नियोजनबध्द आखणी; लाभार्थींचा अभिप्राय नोंदवून कौतुक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीत गेल्या चार दिवसाने पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून डोंबिवली पश्चिम येथील ‘सावित्रिदेवी बसप्पा हेबळी’ विद्यालयातील लसीकरण केंद्रावर ३२० जणांना लस देण्यात आल्याची माहिती भाजपचे मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी दिली. अनेक लाभार्थ्यांनी सदर लसीकरण केंद्राच्या शिस्तबद्ध व नियोजनबध्द कामाचे अभिप्राय नोंदवहीत नोंदवून कौतुक केले आहे, तर जेष्ठ नागरिकांनी सदर केंद्रातील लसीकरणाच्या नियोजनबद्ध आखणीबद्दल समाधान व्यक्त केले.

बुधवारी सकाळी १२.३० वाजता या केंद्रावर महापालिकेकडून लसीच्या कुप्यांचा पुरवठा करण्यात आला. त्यांनतर उत्तम नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने या सेंटरवर लसीकरण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर अनेक नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू झाले असून सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस, मंडळ उपाध्यक्ष अमोल दामले, दिलीप धुरी, सुरेश जोशी, गीता नवले आदी कार्यकर्ते ही लसीकरणाची मोहीम राबवत आहेत. अनेक लाभार्थ्यांनी लस घेतल्यानंतर ताटकळत न ठेवता लसीकरण सेवा उपलब्ध करुन दिल्याने लसीकरण केंद्राबद्दल समाधान व्यक्त केले व लसीकरण नियोजन बध्द होत असल्याने नागरिकांनी अभिप्राय नोंदवही ठेवण्यासाठी आग्रह केला होता. या नोंदवहीत अनेकांनी या केंद्राच्या नियोजनाचे कौतुक केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने खोळंबा होऊ न देता लस पुरवठा पुर्ववत केल्याने भाजपा मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी आणि पालिका अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.