Home Blog Page 273

५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्ड चा लससाठा प्राप्त, तरीही गोंधळ कायम !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लस उपलब्ध नसल्याने गेले पाच दिवस पहिल्या मात्रेसाठी डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईत लसीकरण बंद होते. ते काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर दुपारनंतर सुरू झाले. मात्र ऐन वेळी लस आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या २८ केंद्रांवर लस दिली जात होती. डोंबिवलीत लसी अभावी ४५ वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होती तर नवी मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र ते फक्त एकाच केंद्रावर सुरू असल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

दिवसभरात अनेकदा प्रयत्न करूनही लसीकरणाची तारीख व वेळ मिळत नसल्याने डोंबिवली व नवी मुंबईकर त्रस्त आहेत. त्यात शहरात लशींचा तुटवडा असल्याने मागील चार दिवस लसीचा पहिला डोस देणे बंद होते. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालयात कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा दिली जात होती. पहिल्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत होते. महापालिकेला ५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्डच्या लसकुप्या प्राप्त झाल्याने दुपारी १ नंतर लसीकरण सुरू झाले होते परंतु वाशी येथील कामगार विमा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र मिळालेला लससाठाही कमी असल्याने लसीकरण किती दिवस सुरू राहील हे पालिका प्रशासनालाही सांगता येत नाही. लसीकरणाचे दैनंदिन चित्र बदलत असल्याने नागरिकांमध्ये अद्याप गोंधळ आहे.

गृहमंत्रालयाचे राज्यांना आदेश; रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांसंदर्भात नियमावली तयार करा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोणत्याही खासगी अथवा सरकारी रुग्णालयाला विशेषतः कोरोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसात, देशातल्या काही राज्यांमधल्या काही रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्याने आता गृहमंत्रालयाला जाग आली आहे. याबद्दल एक निवेदन गृहमंत्रालयाने दिलं आहे. यात म्हटलं आहे, राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केल्यानंतर केंद्रिय गृहसचिव यांनी हे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत आग लागलेल्या घटना पाहता, तसंच उन्हाळ्याच्या दिवसात वाढणारं तापमान लक्षात घेता हे समोर येत आहे की, वाढत्या तापमानामुळे, देखभालीच्या अभावामुळे किंवा काही यंत्रांवर ताण आल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ज्यामुळे माणसांचे जीव जात आहेत, तसंच अत्यावश्यक साधनसामुग्रीचंही नुकसान होत आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन रुग्णालयांचं आगीपासून संरक्षण करण्यासाठीचा सुनियोजित आराखडा तयार करण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांना वेळोवेळी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेची, तसंच इतर उपयुक्त यंत्रणांची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, असं सांगण्यात आलं आहे. अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक विभागाच्या महासंचालकांनी जारी केलेल्या नियमावलीचाही उल्लेख गृहमंत्रालयाने केला आहे.

मोदींनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली ती मराठा आरक्षणासाठीही दाखवावी : उद्धव ठाकरे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाचे आरक्षण घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दि.०५ रोजी दिला. मराठा आरक्षण विषय राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल तमाम मराठा बांधवांसाठी धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायलयाने नेमकं काय म्हंटलं?

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या लढाईत निराशाजनक निर्णय आला आहे. त्यानंतरही मराठा समाजाने संमजस्यपणा दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीराजे यांनीही संयम दाखवला. ते म्हणाले की, ज्या वकीलांनी उच्च न्यायालयात विजय मिऴवून दिला त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात केस लढली. निकालावर अभ्यास केला जात आहे.

केंद्राला ‘सर्वोच्च’ दिलासा! दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’ राबवण्याचा दिला सल्ला

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही. न्यायालयाने मार्ग दाखवून दिला आहे. न्यायालयाने आरक्षण कायदे करण्याचे अधिकार राज्याला नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा अधिकार पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कलम ३७० हटवताना जी हिंमत दाखवली तशीच हिंमत मराठा आरक्षणासाठीही दाखवावी आणि मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. यासाठी उद्या पीएम मोदींना पत्र लिहिणार आहे.

*मराठा आरक्षण : ९ सप्टेंबर २०२० पर्यंतचे प्रवेश वैध*
आपल्याला हक्क आपल्याला मिळवून देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर आम्ही अभ्यास करत आहोत. यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची समिती नव्हे फौज नेमली असल्याचे ते म्हणाले.

दुसरीकडे मराठा समाजाच्या मागास स्थितीबद्दल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गायकवाड समितीचा अहवाल स्वीकाराहार्य नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. दरम्यान आरक्षण धोरणानुसार ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते, ते वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीवर बोलताना म्हणाले की कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचे केलेल्या प्रयत्नांचे न्यायालयाने कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील रुग्णवाढ मंदावली आहे. देशातील प्रमुख शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे गाफील राहुन चालणार नाही. केंद्राकडे २०० कोटी मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे. लसपुरवठा वाढला की लसीकरणाला वेग येईल.३ हजार टन मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा मानस असून दररोज १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरु केली गेली असून काही दिवसात ऑक्सिजनमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार.

खा.विखेंच्या रेमडेसिवीर प्रकरणात कोर्टाने दिले पोलिसांना ‘हे’ आदेश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खासदार सुजय विखे यांच्या रेम्डेसिवीर इंजेक्शन खरेदी प्रकरनी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करावा- आदेश

पोलिसांनी योग्य कार्यवाही न केल्यास याचिकाकर्ते यांना परत न्यायालयात येण्याची मुभा

अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली होती. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला होता. तो रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नव्हते. सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान च्या रुग्णालयाल, जिल्हा रुग्णालय, व पीएमटी रुग्णालय येथे देखील वाटप केले होते.

१०,००० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ. सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड. सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खासदार डॉ. सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली होती.

दि. ०५.०५. २०२१ रोजी, याचिकाकर्ते यांनी सदर रिट याचिकेमध्ये दुरुस्ती अर्ज दाखल करून एका वृत्तपत्रात आलेले बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी राजकीय लोकांनी जसे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, खा.शरद पवार व आ. रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना रेम्डेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याबद्दल कार्यवाही करावी अशी विनंती सदर अर्जात केली होती. सदर अर्ज याचिकाकर्ते यांनी माघारी घेतला असून मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणात याचिकाकर्ते यांना काही तक्रार असेल तर ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत वरील राजकीय व्यक्तीने सदर घटना केली आहे त्या ठिकाणी त्यांना नियमानुसार तक्रार करण्याची मुभा दिली आहे.

डॉ. सुजय विखे यांनी सदर याचिकेत त्यांना प्रतिवादी बनवावं व त्यांचे म्हणणे ऐकावे अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता तो त्यांनी माघारी घेतला आहे. सदर अर्ज माघारी घेत असतांना मा. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले कि, जो व्यक्ती अजून आरोपी नाही त्याला गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत ऐकण्याची गरज नाही असा कायदा आहे.
मा. उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले कि सदर प्रकरणात याचिकार्ते, पोलीस, जिल्हाधिकारी व डॉ… सुजय विखे यांनी सादर केलेल्या कागदपत्रातून वस्तुस्थिती बद्दल एकमत होत नाही व वस्तुस्तिथी तपासण्याचे व चौकशी करण्याचे काम न्यायालयाचे नसून तपास अधिकाऱ्याचे आहे. सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठाची गोपनीयता पाळण्यासाठी शासकीय अधिकारी यांनी खोटे कागदपत्रे तयार केली आहे का ? डॉ. विखे चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणलेले रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणत्या कंपनीचा आहे? १७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा व्यतिरिक्त अजून साठा असल्याचे मत याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आले ते खरे आहे का ? त्यासाठी तपासाधिकाऱ्याला फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.

मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. आर.व्ही. घुगे व मा. न्या. बी.यु देबडवार यांनी वरील सर्व बाबी लक्षात घेता सदर प्रकरणी याचिकाकर्ते यांना अतिरिक्त तक्रार/ जवाब व अतिरिक्त कागदपत्रे पोलीस स्टेशन ला नोंदवणे/ देण्याची मुभा दिली व तसे केल्यावर तपास अधिकाऱ्याने फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्ते यांना कोणत्याही अधिकारी, पोलीस अधिकारी सदर प्रकरणात फसवाफसवी व बनावट कागदपत्रे बनवत असेल असे वाटल्यास त्यांच्या विरुद्ध देखील तक्रार/ जवाब देण्याची मुभा दिली आहे. तपास अधिकारी यांनी सदर गुन्ह्यात खासदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांचा गुन्ह्यात हात असेल तर योग्य कार्यवाही करावी. कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असे निरीक्षण मा. न्यायालयाने नोंदवले. तसेच तपास अधिकाऱ्याने योग्य प्रकारे कार्यवाही न केल्यास परत न्यायालयात येण्याची मुभा दिली.

सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर, ऍड. अजिंक्य काळे, ऍड. उमाकांत आवटे व ऍड. राजेश मेवारा यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने ऍड. डी. आर. काळे, व डॉ. सुजय विखे यांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी काम पाहिले.

आईने ऑक्सिजन बेडअभावी प्राण सोडले म्हणून सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जिल्हा नाशिक येथे आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृत्यू ने व्याकुळ होऊन सॅनिटायझर पिऊन लेकीनेही आयुष्य संपवलं.

नाशिकमध्ये राहणाऱ्या जया भुजबळ या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारासाठी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या मृत्यूने कन्या शिवानी भुजबळ व्यथित झाली होती. यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

शिवानीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. आई आणि मुलीचा पाठोपाठ मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.