Home Blog Page 274

लहान मुलंच बनवत आहेत मुंबई मध्ये कोरोना चाचणीचे कोविड किट..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई मध्ये लहान मुलंच बनवत आहेत कोरोना चाचणी साठी चे कोविड किट

मुंबई वॉर्ड क्रमांक ३९ च्या नगरसेवकांच्या हद्दीत एका ठिकाणी कोरोना चाचणी चे टेस्ट किट बनवण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी एका खोली मध्ये जमिनीवरच सर्व साहित्य मांडलेले असून कित्येक लहान लहान मुले जमिनीवर बसून हे साहित्य पॅक करत आहेत. ग्लोव्हज, मास्क किंवा इतर कोणती हि साधने या मुलांना पुरवण्यात आलेली नाहीत. यामुळे या मुलांनाच नाही तर हे किट वापरणाऱ्या रुग्णांना धोका उदभवू शकतो. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना असे खळबळजनक प्रकार घडताना दिसत आहेत.

स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या महत्वाच्या उत्पादनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतोय असं एका सोशल मीडिया वर मुलं किट बनवत असल्याच्या व्हायरल व्हिडीओ मधून दिसून येत आहे.

पोलिसांची अनास्था बेतली तरुणीच्या जीवावर; गुन्हा दाखल करण्यासाठी पैशांची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह

पुणे– एक तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे वाकड पोलिसांनी १० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्याने पोलिसांनी तिचा केवळ तक्रार अर्जच घेतला. जर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई केली असती तर तरुणीने आत्महत्या केली नसती, असा गंभीर आरोप मयत तरुणीच्या भावाने केला.

श्रद्धा ज्ञानेश्‍वर कोकणे (रा. रहाटणी), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मयत श्रद्धाचा भाऊ ऋतिक ज्ञानेश्वर कोकणे यांनी याबाबत माहिती दिली, श्रद्धा हिचा प्रेम विवाह नात्यातील अजिंक्‍य साठे या तरुणाशी ठरला होता. त्यांनी एकत्र फोटोही काढले होते. मात्र नंतर साठे कुटुंबीयांकडून भरमसाठी पैशाची मागणी झाली. त्यातच अजिंक्‍य याचे इतर काही मुलींशी संबंध असल्याचेही श्रद्धा हिला कळाले. यामुळे तिने अजिंक्‍यशी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. मात्र साठे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांकडून लग्नासाठी दबाव आणला.

लग्न न केल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अजिंक्‍य साठे याने दिली. यामुळे श्रद्धा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यात गेली. मात्र तेथील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे पोलिसांनी केवळ तक्रार अर्जच घेतला असल्याचे ऋतिक याने सांगितले.

त्यानंतर राजकीय नेता असलेल्या अजिंक्‍य याच्या दाजीकडून पोलिसांवर दबाव आणला. मी श्रद्धा व तिच्या कुटुंबास कोणताही त्रास देणार नाही. तिचे फोटो व व्हिडिओ डिलिट केले आहेत, अशा आशयाचा मजकूर अगोदरच टाईप केलेल्या एका कागदावर अजिंक्‍य याची केवळ स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पोलिसांनी दाखविली. मात्र त्यानंतरही अजिंक्‍यकडून श्रद्धा हिला सोशल मीडियावर त्रास देणे सुरूच होते. हा त्रास असहाय्य झाल्यावर श्रद्धा हिने २६ एप्रिल रोजी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे ऋतिक म्हणाला.

आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला अजिंक्‍य साठे, त्याचे आई वडील, दोन बहिणी आणि दाजी जबाबदार असल्याचे श्रद्धाने आपल्या मोबाइलवर टाइप करून ठेवले होते. तिच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करतानाही सहा ऐवजी फक्‍त तीनच आरोपी असल्याचे पोलिसांनी दाखविले.

जर पहिल्यांदाच पोलिसांची गुन्हा दाखल करून आरोपींवर योग्य ती कारवाई केली असती तर कदाचित श्रद्धा हिच्यावर आत्महत्येची वेळच आली नसती, असे तिच्या भावाने सांगितले.
सध्या या प्रकरणात तपास करत असलेले पोलीस अधिकारी आरोपींचे नातेवाईक आहेत.
त्यामुळे हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी मागणी मयत श्रद्धा यांचा भाऊ ऋतिक कोकणे याने केली आहे.

याप्रकरणी ऋतिकने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
त्यानंतर संबंधित महिला पोलीस अधिकारी यांना नियंत्रण कक्षास संलग्न करण्यात आले आहे. शिवाय त्या महिला अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारनं बनविलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे.

मराठा आरक्षण कायदा केंद्र सरकारच्या दृष्टीने वैध

मराठा समाजाला आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस दहा दिवस मॅरेथॉन सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. आज, बुधवारी निकाल जाहीर करताना घटनापीठाने मराठा आरक्षण अवैध असल्याचे सांगितले.

केंद्राचे ईडब्ल्यूएस आरक्षण लागू होऊ शकते, तर मराठा आरक्षण का नाही?

आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढविण्यासाठी १९९२ च्या इंदिरा सहानी प्रकरणाची पुनर्समीक्षा केली जावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. तथापि इंदिरा सहानी प्रकरणाची पुनर्समीक्षा करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशातील आरक्षणाच्या दृष्टीने मराठा समाजाला मागास ठरविले जाऊ शकत नाही. आरक्षण दिले गेले तर समानतेच्या कायद्याचे ते उल्लंघन ठरेल. आरक्षणासाठीची एकूण मर्यादा ५० टक्क्यांची आहे. ही मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी घटनापीठाने केली आहे.

मराठा आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचा प्रश्न केंद्राने अनुत्तरीत ठेवला!; अशोक चव्हाणांचा आरोप

मराठा आरक्षण रद्द करतोय, असे स्पष्ट मत कोर्टाने दिले आहे. अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कोर्टाच्या निकालानंतर दिली आहे. कोर्टाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोर्टाच्या या दुर्दैवी निर्णयामुळे स्थगित असलेले आरक्षण थांबलेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण घटनाबाह्य

मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी करताना घटनापीठाने ५० टक्के आरक्षण मर्यादेबाबत सर्व राज्यांची मते मागविली होती. मराठा आरक्षण खटल्याची १५ मार्चला सुरू झालेली सुनावणी २६ मार्चला संपली होती.

मराठा आरक्षण- कोर्टाचा निर्णय दुर्दैवी – छत्रपती संभाजीराजे

सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. पण हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मराठा समाजाने संयम बाळगावा. कोणताही उद्रेक करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

भाजप नगरसेविका मेघना रावलच्या हॉटेलमध्ये चालत होता वेश्या व्यवसाय! पोलिसांनी धाड टाकून पाच मुलींची केली सुटका!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी:

मिरा भाईंदर शहरातील प्रभागच्या भाजप नगरसेविका मेघना रावल यांच्या मालकीच्या ‘द मेरियाड’ या हॉटेलमध्ये शहरात कडक लॉकडाउन असून देखील राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू होता. पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे. लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली भाजप नागरसेविका मेघना रावल यांच्या मालकीचे असलेले ‘द मेरियाड’ या हॉटेलमध्ये चक्क कुंटणखाना चालवला जात असून दलाला मार्फत टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या मुलीं पासून ते मॉडेलिंग करणाऱ्या मुली याच हॉटेलमध्ये ग्राहकांना पुरविल्या जात असल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. माहितीची खात्री केल्या नंतर अमित काळे यांच्या पथकाने या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे.

पोलिसांनी सुटका केलेल्या मुली भोजपुरी चित्रपटात काम करायच्या तर काही मुलींनी टिव्ही मालिकांत देखील काम केले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाउन झाल्यामुळे चित्रपट सृष्टीची कामे बंद पडल्याने या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही दलालांनी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले असून पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या मुलींवर वेश्या व्यवसाय करण्याची पाळी आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी धाड टाकून रामरतन कारवा (30) आणि परबत मानचामरिया (42) या दोन दलालांना अटक केली आहे.

गेल्या काही वर्षांत मिरा भाईंदर शहरातील लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, जुगाराचे अड्डे, डान्सबार अशा अनेक अनैतिक व्यवसायात भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे समोर आल्याने पक्षाची प्रतिमा खूपच डागाळलेली असून ‘पार्टी विथ डिफरेन्स’ म्हणून नैतिकतेचा आव आणणाऱ्या भाजपचा पुन्हा एकदा खरा चेहरा लोकांसमोर आला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.

गेल्या दोन महिन्या पासून शहरात संपूर्ण लॉकडाउन लागले असून सर्व हॉटेल बियरबार, लॉजिंग बोर्डिंग बंद असताना देखील भाजप नागरेविकेच्या या हॉटेलमध्ये मात्र राजरोसपणे वेश्या व्यवसाय कसा काय चालू होता? या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याची देखील या हॉटेलमध्ये भागीदारी असल्याचे बोलले जात असून त्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच या हॉटेलमध्ये असे अनैतिक कार्य केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांसोबत बढती देण्यात आली आहे. या बदल्यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई आणि अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती अभियान के. वेंकटेशम यांचं नाव आहे.

विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे वर्णी लावण्यात आली आहे. तर के.वेंकटेशम यांची संचालक, नागरी संरक्षण आणि संदीप बिश्नोई यांची महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) विभाग येथे पदोन्नती झाली आहे.