Home Blog Page 280

कल्याण डोंबिवली पालिकेने आगामी लसीकरणाची फक्त कागदावर तयारी केली – मंदार हळबे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

१८ वर्षावरील व्यक्तींना सरसकट लस देण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडे त्याप्रमाणात यंत्रणा नाही. जास्तीत- जास्त लसीकरण केंद्राची तयारी पालिकेने करायला हवी होती. पालिकेने फक्त कागदावर तयारी केली.अशी टिका पालिकेचे विरोधी पक्ष नेता आणि नगरसेवक मंदार हळबे यांनी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पालिकेच्या आगामी लसीकरण धोरणावर हळबे यांनी टिका केली आहे.

याबाबत मंदार हळबे म्हणाले कि, कल्याण डोंबिवली पालिका लसीकरणासाठी राज्यशासनावर अवलंबून आहे. ज्यावेळी सरकारचे धोरण निश्चित झाले कि, १८वर्षावरील सर्व नागरिकांना लस द्यायची.
त्यावेळी जास्तीत जास्त लसीकरण केंद्राची तयारी
पालिकेने करायला हवी होती. मात्र पालिकेने फक्त कागदावर तयारी केली. जर एक मे पासून लस द्यायची वेळ आली असती तर, त्याप्रमाणात पालिकेची तयारी नाही. यंत्रणा नाही. लसीकरण केंद्र कुठे सुरू कराव्या याच्या जागा पालिकेने हेरून ठेवल्या आहेत.

लसीकरण केंद्र सुरु करताना खुप तयारी करावी लागते.आम्हाला केंद्र सुरु करण्यासाठी दोन दिवस लागले. एक केंद्र उभे करण्यास चार पाच दिवसाचा कालावधी लागतो. तिथे लागणारी जागा मनुष्यबळ, संगणक व्यवस्था, मंडप अश्या अनेक बाबी आहेत.परंतु आगामी लसीकरण बाबत महापालिकेची तयारी नाही. असे मंदार हळबे म्हणाले.

*लसीकरणाचे रेशनिंग करावे*
सरकारने लसीकरणाचे व्यापक धोरण राबविताना
त्यात रेशनिंग व्यवस्था आणावी. जे नागरिक पांढरेशुभ्र
रेशनिंग कार्ड धारक आहेत, त्यांच्या कडेन प्रत्येक लसीकरणाचे पैसे घ्यावेत.केशरी कार्डधारकांकडून
पांढऱ्या धारकांपेक्षा कमी पैसे घ्यावेत, तर पिवळ्या
रेशन कार्ड धारक गोरगरिबांना मोफत लस द्यावी असे
मंदार हळबे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे १८ वर्षावरील नागरिकांना खाजगी करणाच्या माध्यमातून लस दिली जाणार आहे.याचा निर्णय राज्यसरकारने करायचा आहे. राज्यशासनाच्या मोफत लसीकरणाच्या धोरणामुळे करदात्या नागरिकांवर ताण पडणार आहे. यापूर्वी झालेल्या लसीकरणाचे नागरिकांनी ₹ २५० प्रमाणे पैसे दिले होते. लसीकरण केंद्राबाबत विचारणा करणारे नागरिकांचे फोन येतात. मोफत लस पेक्षा घराजवळ केंद्र असल्याच्या सुविधेत नागरिकांना समाधान वाटते.

परमबीर सिंह यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल; लवकरच अटक होण्याची शक्यता..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा नोंदवण्यात आला.

परमबीर सिंह यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल; लवकरच अटक होण्याची शक्यता

ऍट्रोसिटी कायद्याच्या विविध २२ कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी २० एप्रिलला परमबीरसिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मध्यरात्री परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

परमबीर सिंह यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्ताचा पदभार असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केली आहे. संबधित तक्रार घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरूद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर करुन हे प्रकरण आता ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी *(Break The Chain)* व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या नमूद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विधीमंडळ, मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.

ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

९ लाख कामगारांच्या खात्यात पैसे जमा; ठाकरे सरकारची वचनपूर्ती..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात १५०० रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना आर्थिक मदत जाहीर राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार आता नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या दीड लाखाच्या आसपास असून त्यापैकी ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने अर्थसाह्य देण्यात आले आहे. मागील चार दिवसांमध्ये कामगार विभागाच्या वतीने १३७ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

राज्यात कोविड संकट असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात १५०० रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या वतीने हे पैसे थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

सॅनिटायजर्स आणि आणि मास्कचे पोलिसात वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून डॉक्टर्स, परिचारिका, समाजसेवक, जागरूक नागरीक, पत्रकार आणि पोलीस हे कोरोना योद्धा म्हणून काम करत आहे. नागरिकांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या या कोरोना योद्धांचे नागरिक मनापासून आभार मानत आहेत.

डोंबिवलीतील समाजसेवक ऍड. प्रदीप बावस्कर, निलेश गांधी, हिम्मत म्हात्रे, संतोष बावस्कर यांनी पोलिसांच्या दिवसरात्र मेहनतीच्या कार्याला सलाम म्हणून विष्णूनगर पोलीस ठाण्याला भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांची भेट घेऊन पोलिसांसाठी १०० मास्क आणि
सॅनिटायजर्स दिले.