Home Blog Page 290

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड!

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीत पसरली शोककळा!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करताना त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. त्यांनी १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.

सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. १९४७ च्या ‘जुगनू’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली ‘आरती’ चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी. शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी भारत सरकारनं २००७ साली ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं. २००९ साली त्यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही प्रदान करण्यात आला होता. आजच्या त्यांच्या एक्झिट मुळे संपूर्ण सिनेसृष्टी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे..

वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी राज्यात पूर्णतः लॉकडाऊन तर इतर दिवशी कडक निर्बंध!

वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी राज्यात पूर्णतः लॉकडाऊन तर इतर दिवशी कडक निर्बंध

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन लॉकडाऊन विषयी चर्चा केली होती अखेर आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील कडक निर्बधांची घोषणा केली आहे. आता राज्यात दिवसा जमावबंदी लागू असेल व रात्री 08 नंतर संचार बंदी केली असून शनिवार व रविवारी पूर्णतः कडक लॉकडाऊन असेल.

सिनेमागृह, नाट्यगृह, खेळाची मैदाने पुर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल, मॉल्स, गार्डन देखील बंद राहणार असून हॉटेल पार्सलसेवा पुरता सुरू राहील. राज्यातील सर्व शासकीय आस्थापनातील कर्मचाऱ्यांना ५० टक्के क्षमतेने तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जरी लागला नसला तरी कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे राज्य सरकारने जनतेला जाहीररीत्या आव्हान केले आहे.

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा GSWA ने केला सत्कार!

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा केला सत्कार!

मिरारोड, प्रतिनिधी : ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वीपणे राबवून फुप्फुसाच्या गंभीर आजाराच्या रुग्णाला रुग्णवाहिकेने अवघ्या 35 मिनिटांत मुंबईच्या पावनहंस विमानतळावर पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा मिरारोडच्या गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सन्मान करून त्यांचे आभार मानले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसाच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर रुग्णवाहिका योग्य त्या बंदोबस्तात पायलट वाहनाच्या मदतीने कोठेही ट्राफीक जॅममध्ये अडकणार नाही व रुग्णवाहिकेला पूर्ण रस्ता मोकळा मिळेल याची खबरदारी घेतली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून अवघ्या 35 मिनीटांत मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पीटल पासून ते मुंबईच्या विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे अंबुलन्सने विनाअडथळा पेशंट सुखरुप पोहचविले.

ग्रीन कॉरीडॉर मोहीम, यशस्वी होण्यासाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मिरारोड ते विलेपार्ले यादरम्यान वाहतूक बंदोबस्त लावून घेण्यात आला. त्यांनतर वाहतूक शाखेच्या पायलेटींग कार सोबत सकाळी ०९.१० वाजता ही रुग्णवाहिका वोकार्ड हॉस्पिटल मिरारोड येथून निघून ०९.१७ वाजता रुग्णवाहिकेने दहीसर टोलनाका पार केला व पवनहंस विलेपाले विमानतळावर ०९.४५ वाजता पेशंटला घेऊन सुखरुप पोहचली. वाहतूक पोलीसांनी वोकार्ड हॉस्पिटल, मिरारोड ते विमानतळ केवळ ३५ मिनीटात पेशंटला सुखरूप पोहचवले. पेशंट १०.०५ वा. एअर एम्बुलेन्सने रवाना होऊन ११.४० वाजता हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर पोहचले.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच ग्रीन कोरीडोर मोहीम यशस्वी पद्धतीने हाताळल्याबद्दल मीरा भाईंदर शहरातील अनेक मान्यवर नेते आणि नागरीकांनी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त सदानंद दाते, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, डी.सी.पी मंजुनाथ, CSO जुहू एअरपोर्ट पवार, सांताक्रुजचे पोलिस निरीक्षक घानोरे या सर्वांचे आभार मानले तसेच सुर्यकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), रमेश भामे पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच वाहतूक अंमलदार, वाहतूक शाखा मिरा-भाईंदर यांचे विशेष कौतुक केले आहे.

या प्रसंगाचे औचित्य साधून मिरारोड पूर्वेकडील गोकुळ व्हिलेज येथे असलेली गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणविलकर यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान करण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी 3 एप्रिल रोजी संस्थेच्या वतीने काशिमिरा येथील वाहतूक शाखेत जाऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे यांचेसह उपस्थित सर्व वाहतूक पोलिसांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणविलकर सोबत संस्थेचे सचिव कवी खान, संस्थेचे सदस्य प्रवीण सालीयन आणि सॅमी इत्यादी उपस्थित होते.

राज्यसरकारकडून दोन दिवसांची मुदत अन्यथा घेणार कठोर निर्णय!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

कोरोना संसर्गाचे प्रमाण थोडे कमी झाल्यावर आपण गाफील राहिलो, पण त्याने पुन्हा डोके वर काढले. उपनगरी रेल्वे, उपाहारगृहांमध्ये गर्दी होत आहे.

घरगुती कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होत आहे. परिणामी, कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने व दुपटीने वाढत आहे.ती अशीच वाढत राहिली तर रुग्णालये तुडुंब भरतील.त्यामुळे अनावश्यक गर्दी आता टाळावीच लागेल, असे आवाहन राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केले.

टाळेबंदीची लगेचच घोषणा करत नाही

पण दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि टाळेबंदीला पर्याय सापडला नाही तर टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

वर्षांच्या सुरुवातीला कोरोनाचे संकट नियंत्रणात आले असे वाटत होते. या काळात राज्याला पुढे नेणारा-अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.

पण त्यानंतर काही लोकांनी शिमगा सुरू केला. त्याला योग्यवेळी उत्तर देईन, आता कोरोना संकट महत्त्वाचे आहे. असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. कोरोना संकट आता आक्रोळविक्रोळ स्वरुपात परतले आहे. विषाणूचे नवे रूप आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पावणे चार लाख रुग्णांसाठी व्यवस्था सज्ज आहे.

रुग्ण वाढ झपाटय़ाने होत आहे.

महिनाभरात मुंबईतील परिस्थिती बिघडली आहे असंही ते म्हणाली व चिंता व्यक्त केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 60 वर्षीय महाराजला नयानगर पोलिसांनी केली अटक!

मिरा भाईंदर प्रतिनिधी : एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एका ६० वर्षीय महाराजला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. मीरारोडमध्ये राहणारा हा महाराज मूळचा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे.

मिरारोड पूर्वेकडील महामार्गावर दीपक हॉस्पिटलच्या समोर असलेल्या पय्याडे हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरारोडच्या पय्याडे हॉटेलवर धाड टाकून वेश्यागमनसाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती. त्यामध्ये एक १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी देखील होती.

नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची विचारपूस केली असता एका महाराज ने तिच्यावर अनेकदा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खात्री केल्या नंतर त्या ६० वर्षीय महाराजला अटक केली आहे. सदर महाराज हा भगवे कपडे घालून पूजापाठ करण्यासाठी जात असे. त्याच्या राहत्या घरी सुद्धा त्याचा दरबार भरत असे. भक्तमंडळी त्याच्या घरी जाऊन सेवा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या १५ वर्षांपासून हा महाराज शहरात बस्तान मांडून आहे. महाराजाच्या अवतारात हा ढोंगी असले अनैतिक प्रकार करत होता असे समोर आले आहे.

हा महाराज पीडित अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यां पासून लैंगिक अत्याचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या सह संबंधित कायदे कलम नुसार त्या महाराजवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी केली जात आहे.

लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे हा महाराज गेल्या अनेक वर्षांपासून असे अनैतिक कृत्य करीत असल्याचे उघड झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.