Home Blog Page 291

राज्यसरकारकडून दोन दिवसांची मुदत अन्यथा घेणार कठोर निर्णय!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

कोरोना संसर्गाचे प्रमाण थोडे कमी झाल्यावर आपण गाफील राहिलो, पण त्याने पुन्हा डोके वर काढले. उपनगरी रेल्वे, उपाहारगृहांमध्ये गर्दी होत आहे.

घरगुती कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होत आहे. परिणामी, कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने व दुपटीने वाढत आहे.ती अशीच वाढत राहिली तर रुग्णालये तुडुंब भरतील.त्यामुळे अनावश्यक गर्दी आता टाळावीच लागेल, असे आवाहन राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केले.

टाळेबंदीची लगेचच घोषणा करत नाही

पण दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि टाळेबंदीला पर्याय सापडला नाही तर टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

वर्षांच्या सुरुवातीला कोरोनाचे संकट नियंत्रणात आले असे वाटत होते. या काळात राज्याला पुढे नेणारा-अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.

पण त्यानंतर काही लोकांनी शिमगा सुरू केला. त्याला योग्यवेळी उत्तर देईन, आता कोरोना संकट महत्त्वाचे आहे. असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. कोरोना संकट आता आक्रोळविक्रोळ स्वरुपात परतले आहे. विषाणूचे नवे रूप आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पावणे चार लाख रुग्णांसाठी व्यवस्था सज्ज आहे.

रुग्ण वाढ झपाटय़ाने होत आहे.

महिनाभरात मुंबईतील परिस्थिती बिघडली आहे असंही ते म्हणाली व चिंता व्यक्त केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 60 वर्षीय महाराजला नयानगर पोलिसांनी केली अटक!

मिरा भाईंदर प्रतिनिधी : एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एका ६० वर्षीय महाराजला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. मीरारोडमध्ये राहणारा हा महाराज मूळचा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे.

मिरारोड पूर्वेकडील महामार्गावर दीपक हॉस्पिटलच्या समोर असलेल्या पय्याडे हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरारोडच्या पय्याडे हॉटेलवर धाड टाकून वेश्यागमनसाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती. त्यामध्ये एक १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी देखील होती.

नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची विचारपूस केली असता एका महाराज ने तिच्यावर अनेकदा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खात्री केल्या नंतर त्या ६० वर्षीय महाराजला अटक केली आहे. सदर महाराज हा भगवे कपडे घालून पूजापाठ करण्यासाठी जात असे. त्याच्या राहत्या घरी सुद्धा त्याचा दरबार भरत असे. भक्तमंडळी त्याच्या घरी जाऊन सेवा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या १५ वर्षांपासून हा महाराज शहरात बस्तान मांडून आहे. महाराजाच्या अवतारात हा ढोंगी असले अनैतिक प्रकार करत होता असे समोर आले आहे.

हा महाराज पीडित अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यां पासून लैंगिक अत्याचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या सह संबंधित कायदे कलम नुसार त्या महाराजवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी केली जात आहे.

लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे हा महाराज गेल्या अनेक वर्षांपासून असे अनैतिक कृत्य करीत असल्याचे उघड झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोड ते मुंबई विमानतळ येथे विनाअडथळा पेशंटला सुखरुप पोहचविले! काशीमिरा वाहतूक पोलिसांची कामगिरी!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसांच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर रुग्णवाहिका योग्य त्या बंदोबस्तात पायलट वाहनाच्या मदतीने कोठेही ट्राफीक जॅममध्ये अडकणार नाही व रुग्णवाहिकेला पूर्ण रस्ता मोकळा मिळेल याची खबरदारी घेतली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पीटल पासून ते मुंबईच्या विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे अंबुलन्सने विनाअडथळा पेशंट सुखरुप पोहचविले.

ग्रीन कॉरीडॉर मोहीम, यशस्वी होण्यासाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मिरारोड ते विलेपार्ले यादरम्यान वाहतूक बंदोबस्त लावून घेण्यात आला. त्यांनतर वाहतूक शाखेच्या पायलेटींग कार सोबत सकाळी ०९.१० वाजता ही रुग्णवाहिका वोकार्ड हॉस्पिटल मिरारोड येथून निघून ०९.१७ वाजता रुग्णवाहिकेने दहीसर टोलनाका पार केला व पवनहंस विलेपाले विमानतळावर ०९.४५ वाजता पेशंटला घेऊन सुखरुप पोहचली. वाहतूक पोलीसांनी वोकार्ड हॉस्पिटल, मिरारोड ते विमानतळ केवळ ३५ मिनीटात पेशंटला सुखरूप पोहचवले. पेशंट १०.०५ वा. एअर एम्बुलेन्सने रवाना होऊन ११.४० वाजता हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर पोहचले.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच ग्रीन कोरीडोर मोहीम यशस्वी पद्धतीने हाताळल्याबद्दल मीरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त सदानंद दाते, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, डी.सी.पी मंजुनाथ, CSO जुहू एअरपोर्ट पवार, सांताक्रुजचे पोलिस निरीक्षक घानोरे यांचे आभार मानले तसेच सुर्यकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), रमेश भामे पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच वाहतूक अंमलदार, वाहतूक शाखा मिरा-भाईंदर यांचे विशेष कौतुक केले आहे.

या प्रसंगी वोकहार्ड रुग्णालयाचे डॉ. निलेश सिंग, डॉ. बिपीन व त्यांच्या संपूर्ण टीम नें फार मोलाची जबाबदारी पार पाडली असे मत मा. आमदारांनी यावेळी व्यक्त केले.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या आजाराने पिडित १७ वर्षीय तरूणावर यशस्वी उपचार!

गेल्या काही वर्षात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या असणाऱ्या १८-२५ वयोगटातील साधारणतः १०० मुलांवर उपचार करण्यात आले आहे! – डॉ. हिमांशू शहा

मिरारोड, प्रतिनिधि : गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या पायांच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या १७ वर्षीय तरूणावर मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू शहा यांच्या अध्यक्षतेखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने लेझर शस्त्रक्रियेद्वारे रूग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. या शस्त्रक्रियेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रूग्णाला घरी सोडण्यात आले. आता या तरूणाची प्रकृती उत्तम असून तो पुन्हा आपले दैनंदिन कामे करू लागला आहे.

सांताक्रुझमध्ये राहणारा वर्षिल शहा (१७) हा महाविद्यालयात शिकतोय. या तरूणाला जास्त वेळ एकाच जागी बसायला किंवा उभं राहायला त्रास जाणवत होतो. ऑनलाईन अभ्यासही तो करू शकत नव्हता. स्वतःची दैनंदिन कामे करायला देखील इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. पण वोक्हार्ट रूग्णालयात झालेल्या उपचारानंतर आता तो पुन्हा चालू लागला आहे. पाय दुखणे, थकवा आणि असहय वेदनेतून आता त्याची सुटका झाली आहे.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू शहा यांनी सांगितले की, “या तरूणावर उपचार सुरू करण्यापूर्वी ‘डॉपलर स्कॅन’ ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत तरूणाच्या दोन्ही पायात व्हेरिकोज व्हेन्सची समस्या असल्याचे निदान झाले. मुख्यतः हा पायांना होणार आजार आहे. या आजारात पाय सुजणे, पायात वेदना जाणवणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, थकवा येणं, नसांचा रस निळा पडणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. मुलांमध्ये ही समस्या आढळून येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असू शकते. गेल्या काही वर्षांपासून मी १८-२५ या वयोगटातील जवळजवळ १०० तरुणांच्या यशस्वीरित्या उपचार केले आहे.’’

डॉ. हिमांशू शहा पुढे म्हणाले, “या रूग्णाच्या प्रकरणात पायाच्या नसांच्या बाजूला अनेक अतिरिक्त नसा होत्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नव्हता. नसांमधून रक्तस्त्राव होत असल्याने लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दीड तास शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर रूग्णाला सर्वसामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले.’’

‘व्हेरिकोज व्हेन्स’ची ही समस्या टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास पायातील नसांमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो. याशिवाय वजनावर नियंत्रण ठेवणे, जास्त वेळ एकाच जागी उभं राहणे अथवा बसून राहणे टाळावेत. उंच टाचेच्या चपलेचा नियमित वापर करू नये आणि योग्य आहाराचे सेवन करणे, यामुळे व्हेरिकोज व्हेन्स या आजारापासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकते.

वर्षिल शहा म्हणाला की, ‘‘पायाच्या असह्य वेदनामुळे मी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी दिवसभर अंथरूणावर झोपून असायचो. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मी पुन्हा पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू लागलो आहे. आता मी परत व्यायाम करायला सुरूवात केली आहे.’’

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला राज्यातील जनतेला इशारा!

अवधुत सावंत, प्रतिनिधी :  राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या लागू असणारे निर्बंध राज्य सरकारकडून अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनला उद्योजक तसंच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत विरोध असल्याने निर्बंध अजून कठोर केले जाण्याची शक्यता असून राज्य सरकार कडून यासंबंधीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा, लॉकडाउन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही.

काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहे.
सध्या मुंबईत आय.सी.यू चे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत.
बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली आहे.

राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत.

काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने प्रशासनाला दिल्या आहेत.तसेच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश ही दिले आहेत.

नियम पाळा आणि लॉक़डाऊन टाळा लॉकडाऊनचा कोणताही निर्णय अजूनतरी झालेला नाही,
मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे.
अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल,असे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.