Home Blog Page 291

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोड ते मुंबई विमानतळ येथे विनाअडथळा पेशंटला सुखरुप पोहचविले! काशीमिरा वाहतूक पोलिसांची कामगिरी!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसांच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर रुग्णवाहिका योग्य त्या बंदोबस्तात पायलट वाहनाच्या मदतीने कोठेही ट्राफीक जॅममध्ये अडकणार नाही व रुग्णवाहिकेला पूर्ण रस्ता मोकळा मिळेल याची खबरदारी घेतली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पीटल पासून ते मुंबईच्या विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे अंबुलन्सने विनाअडथळा पेशंट सुखरुप पोहचविले.

ग्रीन कॉरीडॉर मोहीम, यशस्वी होण्यासाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मिरारोड ते विलेपार्ले यादरम्यान वाहतूक बंदोबस्त लावून घेण्यात आला. त्यांनतर वाहतूक शाखेच्या पायलेटींग कार सोबत सकाळी ०९.१० वाजता ही रुग्णवाहिका वोकार्ड हॉस्पिटल मिरारोड येथून निघून ०९.१७ वाजता रुग्णवाहिकेने दहीसर टोलनाका पार केला व पवनहंस विलेपाले विमानतळावर ०९.४५ वाजता पेशंटला घेऊन सुखरुप पोहचली. वाहतूक पोलीसांनी वोकार्ड हॉस्पिटल, मिरारोड ते विमानतळ केवळ ३५ मिनीटात पेशंटला सुखरूप पोहचवले. पेशंट १०.०५ वा. एअर एम्बुलेन्सने रवाना होऊन ११.४० वाजता हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर पोहचले.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच ग्रीन कोरीडोर मोहीम यशस्वी पद्धतीने हाताळल्याबद्दल मीरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त सदानंद दाते, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, डी.सी.पी मंजुनाथ, CSO जुहू एअरपोर्ट पवार, सांताक्रुजचे पोलिस निरीक्षक घानोरे यांचे आभार मानले तसेच सुर्यकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), रमेश भामे पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच वाहतूक अंमलदार, वाहतूक शाखा मिरा-भाईंदर यांचे विशेष कौतुक केले आहे.

या प्रसंगी वोकहार्ड रुग्णालयाचे डॉ. निलेश सिंग, डॉ. बिपीन व त्यांच्या संपूर्ण टीम नें फार मोलाची जबाबदारी पार पाडली असे मत मा. आमदारांनी यावेळी व्यक्त केले.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या आजाराने पिडित १७ वर्षीय तरूणावर यशस्वी उपचार!

गेल्या काही वर्षात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या असणाऱ्या १८-२५ वयोगटातील साधारणतः १०० मुलांवर उपचार करण्यात आले आहे! – डॉ. हिमांशू शहा

मिरारोड, प्रतिनिधि : गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या पायांच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या १७ वर्षीय तरूणावर मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू शहा यांच्या अध्यक्षतेखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने लेझर शस्त्रक्रियेद्वारे रूग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. या शस्त्रक्रियेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रूग्णाला घरी सोडण्यात आले. आता या तरूणाची प्रकृती उत्तम असून तो पुन्हा आपले दैनंदिन कामे करू लागला आहे.

सांताक्रुझमध्ये राहणारा वर्षिल शहा (१७) हा महाविद्यालयात शिकतोय. या तरूणाला जास्त वेळ एकाच जागी बसायला किंवा उभं राहायला त्रास जाणवत होतो. ऑनलाईन अभ्यासही तो करू शकत नव्हता. स्वतःची दैनंदिन कामे करायला देखील इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. पण वोक्हार्ट रूग्णालयात झालेल्या उपचारानंतर आता तो पुन्हा चालू लागला आहे. पाय दुखणे, थकवा आणि असहय वेदनेतून आता त्याची सुटका झाली आहे.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू शहा यांनी सांगितले की, “या तरूणावर उपचार सुरू करण्यापूर्वी ‘डॉपलर स्कॅन’ ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत तरूणाच्या दोन्ही पायात व्हेरिकोज व्हेन्सची समस्या असल्याचे निदान झाले. मुख्यतः हा पायांना होणार आजार आहे. या आजारात पाय सुजणे, पायात वेदना जाणवणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, थकवा येणं, नसांचा रस निळा पडणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. मुलांमध्ये ही समस्या आढळून येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असू शकते. गेल्या काही वर्षांपासून मी १८-२५ या वयोगटातील जवळजवळ १०० तरुणांच्या यशस्वीरित्या उपचार केले आहे.’’

डॉ. हिमांशू शहा पुढे म्हणाले, “या रूग्णाच्या प्रकरणात पायाच्या नसांच्या बाजूला अनेक अतिरिक्त नसा होत्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नव्हता. नसांमधून रक्तस्त्राव होत असल्याने लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दीड तास शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर रूग्णाला सर्वसामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले.’’

‘व्हेरिकोज व्हेन्स’ची ही समस्या टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास पायातील नसांमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो. याशिवाय वजनावर नियंत्रण ठेवणे, जास्त वेळ एकाच जागी उभं राहणे अथवा बसून राहणे टाळावेत. उंच टाचेच्या चपलेचा नियमित वापर करू नये आणि योग्य आहाराचे सेवन करणे, यामुळे व्हेरिकोज व्हेन्स या आजारापासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकते.

वर्षिल शहा म्हणाला की, ‘‘पायाच्या असह्य वेदनामुळे मी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी दिवसभर अंथरूणावर झोपून असायचो. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मी पुन्हा पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू लागलो आहे. आता मी परत व्यायाम करायला सुरूवात केली आहे.’’

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला राज्यातील जनतेला इशारा!

अवधुत सावंत, प्रतिनिधी :  राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या लागू असणारे निर्बंध राज्य सरकारकडून अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनला उद्योजक तसंच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत विरोध असल्याने निर्बंध अजून कठोर केले जाण्याची शक्यता असून राज्य सरकार कडून यासंबंधीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा, लॉकडाउन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही.

काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहे.
सध्या मुंबईत आय.सी.यू चे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत.
बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली आहे.

राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत.

काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने प्रशासनाला दिल्या आहेत.तसेच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश ही दिले आहेत.

नियम पाळा आणि लॉक़डाऊन टाळा लॉकडाऊनचा कोणताही निर्णय अजूनतरी झालेला नाही,
मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे.
अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल,असे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८६ मधील धक्कादायक प्रकार उघड.. गोलवली समता नगर मधील कचरा कुंडीत टाकले जात आहेत वापरलेले पीपीई कीट आणि रुग्णांसाठी वापरलेले साहित्य…

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र (आय) मधील प्रभाग क्र. ८६ गोलवली समता नगर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस वापरलेले पीपीई किट्स तसेच रुग्णांसाठी वापरलेले साहित्य टाकले जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरीकांत आश्चर्य व संताप व्यक्त केला जात असून रात्रीच्या अंधारात टाकण्यात येणाऱ्या वस्तुंमुळे परिसरात कोरोना सारख्या संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता स्थानिक नागरीकांत व्यक्त करण्यात येत आहे .

या परिसरातील माजी ग्राम पंचायत सदस्य श्री. भरत जाधव यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार प्रभाग क्षेत्र (आय) मध्ये असलेल्या समता नगर गोलवली वार्ड क्रमांक ८६ मध्ये असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस रात्रीच्या वेळी अज्ञात कंपनी, रुग्णालय यांनी रुग्णांसाठी वापरलेले पीपीई कीट, हॅन्ड ग्लोव्ह्ज, मास्क, याच बरोबर रुग्णांना वापरून झालेले अन्य साहित्य टाकले जात आहे. या कचऱ्यावर पाळीव तसेच बेवारस कुत्रे, मांजरी यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, हेच प्राणी नागरी वस्ती मध्येही येत असतात अशा गंभीर स्वरुपाच्या प्रकारामुळे परिसरात कोरोना सह अन्य रोगजंतूही पसरण्याची शक्यता आहे. यासाठी या ठिकाणी कोणती अज्ञात व्यक्ती हे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक साहित्य टाकत आहे त्याचा स्थानिक पालिका प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेनेही शोध घेउन संबंधीतांवर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून होऊ लागली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा दणका! सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश जारी; मेस्मा कायदाही लागू

अवधुत सावंत, मुंबई प्रतिनिधी : कोरोना रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

खासगी रूग्णालये एकेका रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.
सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती.
अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.

या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.
या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.

सध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांनी एका दिवसांत स्वतः टाईप करून या आदेशाचा तब्बल १८ पानांचा मसुदा तयार केला. वांद्र्यावरून स्वतः गाडी चालवत ते आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्याकडे गेले. त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर रात्री शिंदे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.