Home Blog Page 305

माजी नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ त्यांचे हस्तक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

याप्रकरणी अपक्ष नगरसेवकासह ८ ते १० हस्तकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि त्यांचे ७ ते ८ हस्तक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहे.

नगरसेवकाच्या हस्तकाचा सावकारीचा व्यवसाय आहे. रिक्षा चालक सुमितने रिक्षा दुरुस्तीसाठी नगरसेवकाचा खास हस्तक असलेल्या रोहित राठोड व राजन दुबे यांच्याकडून व्याजाने ३० हजार घेतले होते. ही रक्कम ६०० रुपये महिना देण्याचे ठरवून रिक्षा चालकाने त्या सावकाराला रक्कम दिल्याचे सांगितले. तरीही आणखी ६ हजार व्याजाचा त्याच्यामागे तगादा लावला असता, रिक्षाचालकाने देण्यास नकार देताच आरोपी सावकार व त्याच्या साथीदारांनी मिळून रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करीत त्याला रस्त्यावर फरफट नेले. त्यामुळे सुमित गंभीर जखमी झाला.

नगरसेवकाच्या घरी नेऊन मारहाण

मध्यरात्री अडीच वाजता पुन्हा काही आरोपी सुमितच्या घरी आले. आणि त्याला घरातून एका वाहनात जबरदस्तीने बसवून माजी नगरसेवकाच्या घरी नेले. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यानी सुमितच्या तोंड काळ्या बुरख्याने झाकून नगरसेवकाच्या घरी आणले. याठिकाणी नगरसेवक कुणाल पाटील आणि त्याच्या हस्तकाने त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. तर नगरसवेकाने तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे सुमितने सांगितले. त्यांनतर कसाबसा आरोपींच्या तावडीतून सुटून सुमित घरी पोहोचला. घरच्यांनी त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात दखल करून मानपाडा पोलीस ठाण्यात नगरसेवकासह १० ते १२ हस्तकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय वादातून माझे नाव गोवण्यात आले!

या बाबत नगरसेवक कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, राजकीय वादातून माझे नाव या गुन्ह्यात गोवण्यात आले असून घटना घडली त्यादिवशी मी शहरातच नव्हतो असे सांगत या गंभीर गुन्ह्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.

कामातील अनियमितता सरपंचाला भोवली अप्पर विभागीय आयुक्तांकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई

बीड, ता. वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीचे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले व कामात अनियमितता दाखवुन शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर राठोड त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली असल्याने वडवणी तालुक्यातील सरपंचात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता व कामात गैरप्रकार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य संतोष अभिमान शिंदे व धनंजय माणिकराव शिंदे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. सदरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन 2018- 19 या खर्चाबाबत कोणतेही पुरावे सरपंच परमेश्वर राठोड यांनी सादर केले नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड यांचा दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजीचा प्रस्ताव अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी मान्य करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार सरपंच श्री परमेश्वर दगडू राठोड, रा. हरिश्चंद्र पिंप्री, ता. वडवणी, जि. बीड यांना उर्वरीत कालावधीसाठी अपात्र ठरवले आहे. सदरील या निकालाने वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदरील सरपंच परमेश्वर राठोड यांना निर्णयविरुध्द संबंधितांस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 (3) नुसार 15 दिवसांचे आत राज्य शासनाकडे अपील करता येईल. याप्रकरणी तक्रारदार संतोष शिंदे यांच्याकडून अँड. एस.जे साळुंखे व अँड. अमर लवटे यांनी काम पाहिले

तालुक्यातील अनेक सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार!

दरम्यान वडवणी तालुक्यातील हरीचंद्र पिंपरी येथील सरपंच परमेश्वर राठोड यांच्यावर प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या व पात्रतेच्या कार्यवाही ने वडवणी तालुक्यातील सर्व सरपंचांनी मध्ये एकच खळबळ उडाली असून दरम्यान आपल्या ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता व इतर कारणामुळे अपात्र ठरविण्याची कार्यवाही झाल्याने अशाच प्रकारे वडवणी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये नेहमीच अनियमितता दिसून येते आता त्यांचेही धाबे दणाणले असून भ्रष्टाचाराला पाठराखण करून कामात अनियमितता करणाऱ्या सरपंचांना घाम फुटला असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यातील पुसरा येथील बाबासाहेब जाधव यांना मराठी विषयात अलिगढ विद्यापीठ येथे पीएचडी पदवी प्रदान

बीड, ता. वड‌वणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पुसरा गावचे विद्यार्थी बाबासाहेब सुखदेव जाधव यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना देखील जिद्द अणि चिकाटीच्या बळावर विश्व दारिद्र्याशी संघर्ष करत देशात चौथ्या स्थानावर आसलेल्या अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय अलिगढ उत्तरप्रदेश येथील आधुनिक भारतीय भाषा विभाग, मराठी संकुल येथे मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘वडार समाजाचे मराठी साहित्यातील चिञ एक अभ्यास. या विषयावर आपले संशोधन कार्य पुर्ण केली आहे.

जाध‍व यांना मार्गदर्शक म्हणून डॉ़ ताहेर पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. बाबासाहेब सुखदेव जाधव हे महाराष्ट्रातले पहिलेच संशोधक आहेत. ज्यांनी मराठी विषयात अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय, अलिगढ. येथून डाॅक्टरेट मिळवली. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. उत्तर प्रदेश मधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ अलिगढ येथील आधुनिक भारतीय भाषा विभागाचे चेअरमन प्रो. क्रांती पाल, मराठी विभाग प्रमुख डॉ. ताहेर पठान, कश्मीरी विभागाचे प्रमुख प्रो. एम.ए झरगर. बेंगाली विभाग प्रमुख डॉ. अमिना खातून, प्रो. ए नुजूम, प्रो. सतिशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथी मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रो. सतिश बडवे यांनी कौतुक केले. तसेच प्रा.दासू वैद्य, प्रा. रमेश जाधव, डॉ. कैलास अंभूरे यांनी ही कौतुक केले व पुसरा गावचे सरपंच हरी पवार व गावातील ग्रामस्तांनी देखील जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

नव्या कोरोना रूग्णांची फुफ्फुसं होतायेत लवकर खराब! रूग्णांच्या छातीच्या एक्स-रे ची स्थिती अतिशय वाईट!

मुंबई, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. रूग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे केला जात आहे.

२०२० मध्ये कोरोना व्हायरस या विषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जगभरात या विषाणूंने अनेकांना प्रभावित केले होते. या विषाणूच्या भितीपायी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. परंतु, कालांतराने रूग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेच पुन्हा एकदा भर पडली आहेत. त्यातच आता उपचारासाठी येणाऱे रूग्ण अतिशय नाजूक अवस्थेत असल्याचेही दिसून येत आहेत. याचाच अर्थ आताचा कोरोना विषाणू हा कित्येक पटीने शक्तिशाली असून झपाट्याने मानवी शरीरावर घातक करू लागला आहे.

यासंदर्भात बोलताना कोहिनूर रूग्णालयातील छातीरोग तज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितले की, ‘‘आधी रूग्णाच्या फुफ्फुसात हळुहळु बदल दिसून येत होतो. परंतु, आता फुफ्फुस लवकर खराब होत आहेत. हे विषाणू सर्व आजारांपेक्षा भयंकर असून फुफ्फुस खराब झाल्यावर रूग्ण उपचारासाठी येत आहेत. अशावेळी रूग्णांवर उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड होत आहे. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचे एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यातील बहुतेक रूग्ण वयोवृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.’’

‘‘ताप, सर्दी, घशात खवखव हिच लक्षणं कोरोना रूग्णांमध्ये दिसून येत आहे. परंतू अजूनही लोक या लक्षणांमध्ये दुर्लक्ष करतात. अनेक लोक विनामास्क रस्त्यांवर फिरत आहे. फक्त लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार वाढतोय. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदय आणि किडनीचे विकार असणाऱ्या रूग्णांना या विकाराचा धोका सर्वाधिक असल्याने या नव्या कोरोना विषाणूंपासून वाचवण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे,’’ असेही डॉ. सदावर्ते म्हणाले.