Home Blog Page 305

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे शहरात मनाई आदेश!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.26 : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरू आहेत दि.११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री, छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, दि.१२ मार्च २०२१ रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व ( ३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश देत आहे.

१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.
२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.
५) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे.
७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे इ. कृत्यांनामनाई करण्यात आली आहे.

खालील व्यक्तींना मनाई आदेश लागू राहणार नाहीत

जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दि.०१ मार्च २०२१ रोजी ००.०१ वाजेपासून दि.१५ मार्च २०२१ रोजी २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील.वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

मिलन शाह, प्रतिनिधि : पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाना हंडाळ (वय ४०) असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते.

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, नाना हंडाळे शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीतील डी इमारतीत रहात होते. त्यांना एक मुलगी आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता गळफास घेतलेल्या अवस्थेत ते दिसून आले. नाना हंडाळे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

माजी नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनधि : व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ त्यांचे हस्तक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

याप्रकरणी अपक्ष नगरसेवकासह ८ ते १० हस्तकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि त्यांचे ७ ते ८ हस्तक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहे.

नगरसेवकाच्या हस्तकाचा सावकारीचा व्यवसाय आहे. रिक्षा चालक सुमितने रिक्षा दुरुस्तीसाठी नगरसेवकाचा खास हस्तक असलेल्या रोहित राठोड व राजन दुबे यांच्याकडून व्याजाने ३० हजार घेतले होते. ही रक्कम ६०० रुपये महिना देण्याचे ठरवून रिक्षा चालकाने त्या सावकाराला रक्कम दिल्याचे सांगितले. तरीही आणखी ६ हजार व्याजाचा त्याच्यामागे तगादा लावला असता, रिक्षाचालकाने देण्यास नकार देताच आरोपी सावकार व त्याच्या साथीदारांनी मिळून रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करीत त्याला रस्त्यावर फरफट नेले. त्यामुळे सुमित गंभीर जखमी झाला.

नगरसेवकाच्या घरी नेऊन मारहाण

मध्यरात्री अडीच वाजता पुन्हा काही आरोपी सुमितच्या घरी आले. आणि त्याला घरातून एका वाहनात जबरदस्तीने बसवून माजी नगरसेवकाच्या घरी नेले. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यानी सुमितच्या तोंड काळ्या बुरख्याने झाकून नगरसेवकाच्या घरी आणले. याठिकाणी नगरसेवक कुणाल पाटील आणि त्याच्या हस्तकाने त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. तर नगरसवेकाने तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे सुमितने सांगितले. त्यांनतर कसाबसा आरोपींच्या तावडीतून सुटून सुमित घरी पोहोचला. घरच्यांनी त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात दखल करून मानपाडा पोलीस ठाण्यात नगरसेवकासह १० ते १२ हस्तकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय वादातून माझे नाव गोवण्यात आले!

या बाबत नगरसेवक कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, राजकीय वादातून माझे नाव या गुन्ह्यात गोवण्यात आले असून घटना घडली त्यादिवशी मी शहरातच नव्हतो असे सांगत या गंभीर गुन्ह्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.

कामातील अनियमितता सरपंचाला भोवली अप्पर विभागीय आयुक्तांकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई

बीड, ता. वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीचे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले व कामात अनियमितता दाखवुन शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर राठोड त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली असल्याने वडवणी तालुक्यातील सरपंचात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता व कामात गैरप्रकार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य संतोष अभिमान शिंदे व धनंजय माणिकराव शिंदे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. सदरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन 2018- 19 या खर्चाबाबत कोणतेही पुरावे सरपंच परमेश्वर राठोड यांनी सादर केले नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड यांचा दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजीचा प्रस्ताव अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी मान्य करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार सरपंच श्री परमेश्वर दगडू राठोड, रा. हरिश्चंद्र पिंप्री, ता. वडवणी, जि. बीड यांना उर्वरीत कालावधीसाठी अपात्र ठरवले आहे. सदरील या निकालाने वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदरील सरपंच परमेश्वर राठोड यांना निर्णयविरुध्द संबंधितांस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 (3) नुसार 15 दिवसांचे आत राज्य शासनाकडे अपील करता येईल. याप्रकरणी तक्रारदार संतोष शिंदे यांच्याकडून अँड. एस.जे साळुंखे व अँड. अमर लवटे यांनी काम पाहिले

तालुक्यातील अनेक सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार!

दरम्यान वडवणी तालुक्यातील हरीचंद्र पिंपरी येथील सरपंच परमेश्वर राठोड यांच्यावर प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या व पात्रतेच्या कार्यवाही ने वडवणी तालुक्यातील सर्व सरपंचांनी मध्ये एकच खळबळ उडाली असून दरम्यान आपल्या ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता व इतर कारणामुळे अपात्र ठरविण्याची कार्यवाही झाल्याने अशाच प्रकारे वडवणी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये नेहमीच अनियमितता दिसून येते आता त्यांचेही धाबे दणाणले असून भ्रष्टाचाराला पाठराखण करून कामात अनियमितता करणाऱ्या सरपंचांना घाम फुटला असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार दिसून येत आहे.