Home Blog Page 306

मनमानी कारभार करणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांकडुन होणार चौकशी?

अवधुत सावंत, प्रतिनिधी :  जागतिक स्तरावर कोरोना सारख्या महाभयंकर महामारीला रोखण्याकरिता लादण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात गेले वर्षभर ऑनलाइन शाळा सुरू असताना वापरण्यात न येणाऱ्या सुविधांचे शुल्क आकारणाऱ्या, शुल्कासाठी पालकांच्यामागे तगादा लावणाऱ्या, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे आठवढयाभरात विभागीय शुल्क नियमन समित्यांवर नियुक्त्या करण्यात येतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी पालकांना सोमवारी दिले.
गेल्या आठवढ्यात राज्यातील पालकांनी शाळांच्या शुल्क वसुलीविरोधात आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानीही धरणे धरले. त्यावेळी पालकांना सोमवारी चर्चेसाठी वेळ देण्यात आली होती. त्यानुसार शालेय शुल्क वाढीबाबत सोमवारी गायकवाड यांनी पालक, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी, राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्याचप्रमाणे मनमानी करणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांकरवी चौकशी करण्याचे आश्वासन गायकवाड यांनी पालकांना दिले.
शासनाने काहीच ठोस भूमिका घेतलेली नाही. शासन अध्यादेश काढू शकते. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे उत्तर ही निव्वळ पळवाट आहे. पालक गेले वर्षभर संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांना दिलासा मिळालेला नाही असे इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनच्या अ‍ॅड.अनुभा सहाय यांनी सांगितले.
राज्यस्तरीय व विभागीय शुल्क नियमन समित्यांची येत्या आठवडय़ात स्थापन करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले. या समित्यांकडे शुल्क वाढीबाबत तक्रारी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी पालकांना दिल्या. शुल्काबाबत इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून राज्यासाठी सुसंगत धोरण, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा संबंधित नियम यांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
शुल्क भरण्यासाठी शाळा सातत्याने तगादा लावतात, अनेक सुविधांचा वापर होत नसतानाही त्याचे शुल्क आकारले जाते, शुल्क भरू न शकणाऱ्या पालकांच्या मुलांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकले जाते, पालकांना दंड आकारला जातो, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या मागील सत्राच्या गुणपत्रिका अडवून ठेवल्या आहेत, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यासही शाळांनी नकार दिला आहे, अशा तक्रारींचा पाढा पालकांनी यावेळी वाचला..

ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशनचा सल्ला देऊ नका! केडीएमसी चे डॉक्टरांना निर्देश

अवधुत सावंत, कल्याण / डोंबिवली प्रतिनिधी : लक्षणं असणाऱ्या आणि सहव्याधी (इतर आजार) असलेल्या वृद्ध रुग्णांना डॉक्टरांनी घरच्या घरी विलगीकरणाचा (Home Quarantine & Isolation) सल्ला न देण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. असे गृह विलगिकरणात (Home Isolation) असणारे रुग्ण गंभीर होऊन ते दगावण्याच्या शक्यतेमुळे खासगी डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला न देण्याचे निर्देश केडीएमसी प्रशासनाने दिले आहेत.

महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांचे निदान लवकर होऊन, त्यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी तापाच्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट केली जाते. काही व्यावसायिक सहव्याधी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणाचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊन हे होम आयसोलेशन त्यांच्या जीववरही बेतू शकते. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला न देण्याबाबतची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बजाविण्यात आली आहे.

तर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पालिकेतर्फे देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. साधा ताप आला तरी नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापाची औषधे आणि गोळ्य़ा घेतात. अशा रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली असल्यास उपचार मिळण्यास विलंब होण्यासह अन्य व्यक्तींनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊ नयेत, औषध विक्रेत्यांनी डॉक्टरचे नाव, पदनाम, रुग्णाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राला देण्याचे औषध विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. एखाद्या औषध विक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्याचे आढळून आल्यास अन्न- औषध प्रशासनाच्या(food and drug) सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध विक्रेत्यांना देण्यात आला आहे..

डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू

अवधूत सावंत, डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे..
आईसोबत खदानीच्या साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना डुबरी नजीकच्या भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. करिष्मा वीरेंद्र यादव (11) असे पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
खदानीत कपडे धुणे बेतले मुलीच्या जीवावर मृत करिष्माचे आई-वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी करिष्माही आईसोबत आज दुपारच्या सुमारास डोंबिवलीनजीक भोपर गावात असलेल्या खदाणीवर गेली होती. मात्र त्यावेळी कपडे धुतानाच तिचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडली. मुलगी खदानीच्या पाण्यात पडल्याचे पाहून आईसह बाजूला कपडे धूत असलेल्या महिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बुडाल्याने महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत, तिला पाण्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भोपर गावात पाण्याची टंचाई असल्याने खदानीत कपडे धुण्यासाठी या परिसरातील चाळीत राहणाऱ्या महिला जात असतात. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभारल्या जात असून या चाळीत राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकंती करावी लागते. सहाजिकच या भागात राहणाऱ्या गरीब नागरिकांना बाजूला असलेल्या खदाणीच्या पाण्याचा कपडे धुण्यासाठी उपयोग करावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे या खदानीत कपडे धुण्यासाठी उतरणार्‍या महिला व मुलींना यापूर्वीही अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भागात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पोलिसांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळापत्रकात बदल

अवधूत सावंत, प्रतिनिधी : दिवसेंदिवस करोनासारख्या महाभयंकर संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी आता आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. राज्यभरात कोरोना संसर्गाच्या संख्येत दुपटीने लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाधिक लोकांनी घरोघरी राहून काम करावे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार, वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ अधिकाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. याशिवाय पोलिस मुख्यालयात कार्यरत ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील कर्मचार्‍यांची उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यापैकी २५ टक्के ‘क’ आणि ‘ड’ श्रेणी कर्मचार्‍यांना सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेच्या शिफ्टनुसार बोलावले जाईल, तर उर्वरित २५ टक्के कर्मचार्‍यांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बोलावले जाईल. पोलिस ठाण्यातील स्टेशन हाऊस अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचार्‍यांना कामावर बोलावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. उर्वरित कर्मचारी घरून काम करतील आणि फोनवर उपलब्ध असतील, जेणेकरून आवश्यक असल्यास त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधता येईल.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील पाटीदार भवन हे कोविड केअर सेंटर पुर्ववत सुरू करा – राजेश कदम

अवधूत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील पाटीदार भवन हे कोविड केअर सेंटर पुर्ववत सुरू करणे बाबत माननीय आयुक्तांना नुकतेच मनसे तुन शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसैनिक राजेश कदम यांनी मागणी केली आहे सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून डोंबिवलीतील सावळाराम क्रिडा संकुल येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरून गेलेले आहे त्यामुळे डोंबिवलीतील रुग्णांना सध्या कल्याणला वर्ग करावे लागते मधल्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आल्यामुळे हळूहळू महानगरपालिकेचे इतर कोविड सेंटर हे बंद करण्यासाठी घेतले होते त्या अनुषंगाने पाटीदार भवन येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर हे सुद्धा जवळजवळ बंद करण्यात आले होते परंतु आता रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सदर पाटीदार भवन कोविड केअर सेंटर हे पूर्ववत सुरु करावे अशी मागणी शिवसेनेकडून होते आहे.