Home Blog Page 307

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकास धावती भेट! रेल्वेच्या आणि महापालिका अधिकाऱ्यांना केल्या सूचना!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामाची पाहणी रेल्वे व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, आमदार गीता जैन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सुरेश वाकोडे तसेच पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल इंजीनियर राजेश अग्रवाल, इस्टेट विभागाचे सीनियर डिव्हिजनल इंजीनियर सुधीर दुबे, ब्रिज प्रकल्पाचे डिव्हिजनल इंजीनियर अनुप अवस्थी, इलेक्ट्रिकल सीनियर डिव्हिजनल इंजीनियर मोहन पपनोई, चीफ कमर्शिअल इंजिनियर मनोज मिश्रा, आरपीएफ शिंदे त्याचबरोबर एम आर व्ही सी चे जॉईंट एम डी कन्हैया शहा व इतर अधिकारी व उपशहर प्रमुख पप्पू भिसे, छगन चव्हाण व इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्‍चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर महानगरपालिकेचे सुरु असलेल्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. खासदार विचारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना व महापालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी २ मिनिटात रेल्वे स्थानकाबाहेर पडली पाहिजे. त्यामुळे स्थानका बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे असावे याची आठवण करून दिली. तसेच या सुरू झालेल्या कामाचे रेल्वे, महानगरपालिका व वाहतूक शाखा यांनी एकत्र बसून रिक्षा स्टॅन्डची जागा निश्चित करून नियोजनबद्ध सुधारित आराखडा तयार करावा मगच काम सुरु करावे. खा. विचारे यांनी स्थानकाबाहेर वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच स्थानकाबाहेरील फेरीवाले रोखण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस स्टेशन च्या मदतीने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या कामासाठी राज्य शासनाचे विशेष अनुदान निधीतून 2 कोटी व महानगरपालिका निधीतून 6 कोटी असे एकूण 8 कोटी खर्च होणार आहे. त्यासाठी रेल्वेने पश्चिम रेल्वे कडून मंजूर झालेले पूर्व व पश्चिमेस सुरु असलेली लिफ्ट व सरकत्या जिन्यांचे काम सुरु करण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. तसेच अतिरिक्त वाढणाऱ्या लिफ्ट व सरकत्या जिन्यांचे काम महापालिकेने रेल्वेमार्फत करून घ्यावे असे निर्देश यावेळी देण्यात आले.

छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्या दिनेश जैनला स्थायी समिती सभापती पदाचे बक्षीस?

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर रोड येथे शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य ३० फूट उंचीच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करणाऱ्या भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांना स्थायी समिती सभापती पदाची भाजपा कडून बक्षिसी देण्यात आल्याची चर्चा शहरात केली जात असून अनेक राजकीय नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिनेश जैन हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक असून आज स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांची सभापती पदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत घोडबंदर ते जेसल पार्क या 60 मीटर रस्त्याच्या चौकात राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 येथे शहराच्या प्रवेशद्वारावर 2 कोटी 95 रुपये खर्च करून ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता परंतु भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य दिनेश जैन यांनी कोणतेही कारण नसताना सुधारित निविदा सादर करावी असा ठराव मांडून या प्रस्तावाला विरोध केला आणि सत्ताधारी भाजपने बहुमताने सदर निविदा मंजुरीचा प्रस्ताव रद्द केला.

भाजप नगरसेवक दिनेश जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध केल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आदर हे फक्त निवडणुकी पुरते दिखाऊ असते मुळात भाजपच्या नेत्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल अजिबात आदर नाही त्यासाठी आता शहरातील जनताच त्यांना योग्य उत्तर देईल दिनेश जैन यांनी आपल्या टक्केवारीसाठीच या प्रस्तावाला विरोध केला आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.

28 फेब्रुवारी रोजी तत्कालीन सभापती अशोक तिवारी यांचा एक वर्षाचा कालावधी संपणार असून नवीन सभापती पदासाठी भाजप तर्फे दिनेश जैन, राकेश शहा आणि सुरेश खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेने तर्फे कमलेश भोईर एकमेव उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपचे संख्याबळ पाहता स्थायी समितीचा सभापती त्यांचाच होणार हे जवळपास निश्चित असले तरी सद्ध्या भाजप मध्ये दोन गट सक्रिय असून भाजपच्या निष्ठावंतांचा ए ग्रुप आणि माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांचा बी ग्रुप झालेले आहेत. नरेंद्र मेहता गटाचे राकेश शहा आणि दिनेश जैन हे दोन उमेदवार स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवार होते तर त्यांच्या विरोधी बी गटातील सुरेश खंडेलवाल हे देखील सभापती पदाच्या शर्यतीत उतरले होते.

नरेंद्र मेहातांच्या विरोधी गटातील भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आणि रवी व्यास यांनी सुरेश खंडेलवाल यांना स्थायी समितीच्या सभापती पदासाठी आपला उमेदवार घोषित केल्याने बहुमताने सुरेश खंडेलवाल यांची निवड होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती आणि त्या निमित्ताने भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे सोबतच विरोधी गटाचे नेतृत्व करणारे रवी व्यास यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाची हीच खरी कसोटी लागणार होती परंतु नरेंद्र मेहता गटाचे दिनेश जैन यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने रवी व्यास आणि हेमंत म्हात्रे यांना एक प्रकारे मोठा धक्काच बसला असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तूळात केली जात आहे.

स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत माजी आमदार नरेंद्र मेहता गटाची पुन्हा एकदा सरशी झाली असून मीरा-भाईंदर शहरात भारतीय जनता पक्षावर अजूनही नरेंद्र मेहता यांचेच वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करून दिनेश जैन यांनी निविदेचा प्रस्ताव रद्द केला आणि त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना स्थायी समितीचे सभापती पद दिल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणामुळे आता शहरातील राजकारण चांगलेच तापले असून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजप विरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आता यापुढे हे प्रकरण काय वळण घेते आणि त्यामुळे शहराच्या राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांना ठाऊक होते की पुढचे स्थायी समितीचे सभापती तेच होणार आहेत आणि म्हणून 2 कोटी 95 लाखाची ही निविदा आपल्या कार्यकाळात मंजूर करून घ्यावी आणि त्याची टक्केवारी आपल्यालाच मिळावी या उद्देशाने दिनेश जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत!” – प्रवीण पाटील (विरोधी पक्षनेते, शिवसेना)

डोंबिवलीतील काटई नाक्यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले दीड टन गोमांस

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : रविवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० चा सुमारास बजरंग दल कार्यकर्ते श्री उत्तेकर हे काटई येथून डोंबिवलीच्या दिशेने येत होते त्या वेळेस एक बोलेरो पिकअप ट्रक त्यांना दिसला त्यातून लाल रंगाचे पाणी पडताना त्यांना दिसले म्हणून संशय आल्याने त्यांनी ती गाडी मानपाडा पेट्रोल पंप जवळ थांबवली आणि ड्रायव्हरला विचारलं की गाडीत काय आहे? तर ड्रायव्हर ने त्यांना पहिले उलटसुलट खोटी उत्तरं दिली व नंतर कबुली दिली की गाडी मध्ये जवळपास १०-१२ गाई बैलांचे मटन आहे व तो ते घेऊन मालेगाव वरून गोवंडी, मुंबईला नेत आहे. हे समजल्या वर उत्तेकर ह्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज गिरी ह्यांना संपर्क साधला.

मग घटना स्थळी बजरंग दल जिल्हा संयोजक करण उल्लेंगल, अजीत विश्वकर्मा, निखील म्हात्रे,
मनीष चव्हाण, गणेश मिश्रा, मिथिलेश पासवान, प्रकल्प चव्हाण, अश्विन पवार, शेरा ताक, संतोष गुप्ता व इतर कार्यकर्ते पोहोचले व पोलिसांना संपर्क करून सदर गाडी घेऊन मानपाडा पोलिस स्टेशनला गेले व पशुसंवर्धन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदर प्रकरणात टेम्पो चालक आरोपी अटक केलेला आहे. व सदर गाडी चा मालक हा सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सध्या तो दुसऱ्या एका गोमांस तस्करी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात अटक आहे.

अकोला शहरात लॉकडाऊनच्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

शोएबुद्दीन, पातूर, प्रतिनिधी : अकोला शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्देश जारी केले आहेत. या प्रमाणे तीन चाकी वाहनात चालक अधिक दोन प्रवासी व चारचाकी वाहनात चालक अधिक तीन प्रवासी ह्यांना प्रवास करण्यास परवानगी असून दुचाकी वर फक्त दोन लोकांना हेल्मेट व मास्क सह प्रवास करण्यास परवानगी आहे. ह्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहनचालकां विरुद्ध धडक कारवाई शहर वाहतूक शाखेने सुरू केली असून गेल्या चार दिवसात जवळपास दीडशे वाहन चालकांवर गुन्हे व दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा नुसार दिलेल्या निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याने वाहन चालकांनी विनाकारण बाहेर फिरू नये व आपली वाहने बाहेर काढताना प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे अन्यथा शहर वाहतूक शाखा अश्या वाहन चालकांवर दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करेल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे।

काेमल रहिवाशी साेसायटीबाबत महाराष्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना मुक्त पत्रकार जगदीश काशिकर यांचे निवेदन! त्वरीत कारवाई करण्याची केली विनंती!

काेमल गृहनिर्माण सहकारी संस्था या साेसायटीच्या पदाधिकाऱ्याची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारांवर कायदेशिर कारवाई त्वरीत करावी अशी मागणी जगदीश काशिकर,
कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना केली आहे.

काेमल रहिवाशी साेसायटीच्या आजी व माजी पदधिकारयांची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारयांवर कायदेशिर कारवाईबाबत निवेदन फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला देऊन अजुन कारवाई झालेली नाही व काेमल रहिवाशी साेसायटीबाबत श्री जगदीश काशीकर पाठपुरावा निगडीत सरकारी प्रशासनाशी/यंत्रणेशी सुध्दा सतत सहा महीन्यापासुन ते करत आहेत व गेल्या तीन वर्षापासुन या साेसायटीबाबत असलेली समस्या ते जनतेसमाेर व मिडीयासमाेर मांडत आलेले आहेत.

आता तात्पुरती जबाबदारी घेऊन व ज्यांनी श्री शांतीलाल जैन यांचे ईतर कमीटी सदस्यांच्या सहाय्याने व्याज माफ केले व ताेच न्याय श्री जगदीश काशीकर यांना ईतर कमीटी व सभासदांच्या सहाय्याने दयायला नकार देऊन श्री शांतीलाल यांचे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आहे ते साेसायटीचे माजी चेअरमेन श्री विनेश शहा आता आपले घर विकुन दुसरीकडे स्थलातंर करण्याचा प्रयत्न करत आहेत व साेसायटीची आर्थिक परीस्थीती वाईट असतानासुध्दा जगदीश काशीकर यांच्याकडुन दाेन वर्षाचा मेन्टेनन्स बिनव्याजी घ्यायला नकार दिला त्यांनी साेसायटीतील सभासद श्री विनीत चाेक्सी
यांच्या मुलाच्या लग्नासाठी तीन दिवस चालणाऱ्या (२० ते २२ फेब्रुवारी २०२१) लग्न सामारंभासाठी साेसायटीच्या आवारात मंडप घालण्याची परवानगी दिली.

जवळपास ३०-३५ वर्ष जुन्या काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण पुर्वीची ईमारत दुरूस्ती (श्री विनेश शहा कुटुंबीय व श्री विनीत चाेक्शी कुटुबियांवर काही कमीटी सभांसदाकडुन (श्री स्वप्नील सालसकर)/रहीवाश्यांचा आराेप व श्री धर्मेश शहा व श्री जगदीश सटाणेकर – सटाणेकर ज्वेलल्सचे मालक/भागीदार, गिरगाव यांच्या लीगल नाेटीसीला ऊत्तर न देता कमीटी सदस्यांकडुन राजीनामा जी नुकतीच १-२ महीन्यापुरवी बनली हाेती) व साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन (अंदाजे २-४ वर्ष) श्री शांतीलाल जैन (यांचे खाते बंद/हिशेाब करताना अंदाजे १५ ते २० वर्षाचे व्याज घेतले नाही) व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी मी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) हा फेसबुक ग्रुप मी बनविला आहे ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती व हाच न्याय मलासुध्दा मिळावा व इतर गरजु सभासदांना मिळावा किंवा व्याज माफीचा निर्यय बदलण्यात यावा ही साैसायटी कमीटीकडुन श्री जगदीश काशीकर यांची अपेक्षा कारण हया परीस्थीत ते आपल्या पुढच्या आयुष्याबाबत सन्मानाने जगण्याचा निर्यय घेऊ शकत नाहीत !!

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २५ वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आजही ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे तेच साेसायटी चालवत असुन काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी अजुन पुढेे येत नाहीत कारण या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला आहे (अजुन काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नाही) व आज जवळपास पाच महीन्यापासुन साेसायटी कमीटीशिवाय चालत असुन या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटी बनविने हया सर्व घटनेचा खुलासा झाल्यावर बनविणे शकय आहे व हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

टीप : ह्या बातमीचे संकलन जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी केले असून याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच आहे.