Home Blog Page 308

ग्रामीण महिलांच्या प्रश्नांवर संशोधन होणे ही खरी गरज! – धर्मराज हल्लाळे

बबलू कदम, वडवणी प्रतिनिधी : ग्रामीण महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबतच्या समस्या अजूनही शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या परिघाबाहेर आहेत, त्यावर शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी अधिक गांभीर्याने संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमत लातूरचे वृत्तसंपादक श्री. धर्मराज हल्लाळे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एम पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना काळात महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. पंजाबराव मस्के पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रस्तुत महाविद्यालयाच्या स्थापनेमागील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय हीच प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले आणि महाविद्यालयाची आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले.

या वेबिनारच्या बीजभाषक म्हणून डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ. निर्मला जाधव यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर प्रखर प्रकाश टाकून शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या पुरुषप्रधान मानसिकतेत बदल होण्याची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी संसाधन व्यक्ती म्हणून जी बी पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उत्तराखंड येथील डॉ. रितू सिंग यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013 ‘यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी दुसऱ्या संसाधन व्यक्ती श्रीमती अशिमा सिंग, माजी संचालिका,भारतीय रेल्वे तंत्रज्ञान आणि परिवहन संस्था, गोरखपूर यांनी भारतीय साहित्यामध्ये रेखाटलेले स्त्री चित्रण यांवर प्रकाश टाकला.
या वेबिनारचे सूत्रसंचालन महाविद्यालयालयीन विशाखा समितीच्या समन्वयक डॉ. मनिषा ससाणे यांनी केले तर डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक- विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

धक्कादायक! हळदी समारंभांतील हत्येचा झाला उलगडा; ‘त्या’ महिलेवर अनैतिक संबधातून केला होता गोळीबार!

अवधुत सावंत, कल्याण, प्रतिनिधी : शेजारी हळदीचा समारंभ सुरू असल्याचा फायदा घेत, अनैतिक संबधातून त्या महिलेवर शेजारच्याच तरुणाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीची आई त्या महिलेला बचावासाठी आली असता आरोपीने स्वतःच्या आईवरही गोळीबार केला. गोळीबारात त्या महिलेचा मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी स्वतःही जखमी होऊन घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला आहे.

ही घटना कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. पवन म्हात्रे (वय 21 वर्षे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव असून त्याने कलेल्या गोळीबारात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीची आई भारती म्हात्रे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हळदी सभारंभात रचला कट!

मृत महिला व आरोपी तरुण शेजारीच राहत असून या दोघांमध्ये काही महिन्यांपासून अनैतिक संबध होते. मात्र, आरोपी पवनचा संशय होता की, तिचे इतरही पुरुषांसोबत अनैतिक संबध आहेत. त्यामुळे त्याने तिचा काटा काढण्याच्या ठरवले होते. त्यातच आरोपीच्या घराशेजारी रात्री बाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरू होता. त्यामुळे गावातील नागरिक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान सुरू असलेल्या हळदी कार्यक्रमापासून काही अंतरावर असलेल्या घरात पवनने महिलेवर गोळीबार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीने रचला होता दरोड्याचा बनाव

आरोपीने कुटूंबाबर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा बनाव करत जखमी झाल्याचे दर्शवत सोमवारी दि. २२ रोजी सकाळी रुग्णालयात आई सोबत तोही उपचार घेत होता. सुरुवातीला पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीत घरातील दागिने अज्ञात दरोडेखोराने लुटल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी घरी तपास केला असता दागिने सुरक्षित असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा जखमी पवनवर संशय अधिक बळावल्याने त्याची कसून दोन तास चौकशी केल्यानंतर अखेर पोलिसांनी या गुन्ह्यांची २४ तासात उकल करत आरोपी पवनला ताब्यात घेतले. तर अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असून या हत्येमागे नेमके काय कारण होते याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र चकोर करत आहेत.

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

बबलू कदम, वडवणी, ता. प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील बिचकुलदरा तांड्यातील एक ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता.चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात शिवरस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली पडुन त्याचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वडवणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्त्या तथा ऊसतोड मजुरांच्या नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे, मोहन जाधव यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी चव्हाण सर, माकपचे कॉ. किरण ढोले, कॉ. रवी उरूनकर, एसएफआयचे जिल्हा सचिव लहू खारगे, तालुका अध्यक्ष ऋषीकेश कलेढोन, विजय टकले, अमोल राठोड आदी उपस्थित होते.

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अनेक ऊस तोड मजुरांचे कुटुंब गाव, घर व नातेवाईक सोडून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यात जातात. वडवणी शहरापासून ३ कि.मी.आंतरावर असलेल्या बिचकुलदरा तांडा येथील विजय खिरू राठोड हा तरुण ऊसतोड मजूर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच जय भवानी साखर कारखाना गडी या ठिकाणी कुटुंबासह ऊसतोड करीत होता. गेल्या 16 फेब्रुवारी रोजी तो मजूर ऊस तोडीचे काम संपवून कुटुंबासह घरी परतत असताना बीड-पिंपळनेर-माजलगाव या मधल्या रस्त्यावरून गावी येत असताना या शिवारात ट्रॉक्टरच्या ट्रॉली खाली सापडल्याने त्याचा चिरडून मृत्यू दुर्दैवी झाला. या दुर्दैवी तरुणाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असून त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.

गरीब कुटुंबातील तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वडवणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या गरीब कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या! चाहत्यांमध्ये पसरली शोककळा!

मिलन शाह, पुणे : प्रसिद्ध टिकटॉक स्टार, अभिनेता समिर गायकवाड यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत घडली आहे. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीरने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडीयावर समिरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या  आत्महत्येमुळे शहरासह राज्यभरातील चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

मिलन शाह, चाकण, पुणे : महाळुंगे येथील एका कंपनीने काही कामगार कमी केले. तसेच काहींना दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केले. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कामगारांना महाळुंगे येथील कंपनीतच कामावर ठेवण्याच्या मागणीसाठी कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढला. याबाबत मनसे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि अन्य ३५० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे पुणे शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे, मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष साबळे, मनसे कामगार सेना सहचिटणीस मनोज खराबी, पिंपरी- चिंचवडचे नगरसेवक सचिन चिखले, रुपेश म्हाळसकर, अंकुश तापकीर, तुषार बवले, गणेश नारायण गायकवाड, ओंकार अरुण इंगवले, तसेच जेबीएम कंपनीमधून कामावरून कमी केलेले, दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केलेले कामगार आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते अशा एकूण ३०० ते ३५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे जेबीएम कंपनी आहे. कंपनी प्रशासनाने मागील काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही कामगारांना कामावरून कमी केले. तसेच काही कामगारांची कंपनीच्या दुस-या प्लांटमध्ये बदली केली. यावरून मनसे पक्षाच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी कंपनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

जेबीएम ऑटो लिमिटेड कंपनीने कमी केलेल्या तसेच दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केलेल्या कामगारांना महाळुंगे येथील प्लांटमध्येच कामावर घ्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असताना तसेच मोर्चासाठी परवानगी नसताना आरोपींनी मोर्चा काढला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 143, 188, साथीचा रोग प्रतिबंधक कायदा सन 1897 चे कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.