Home Blog Page 32

प्रजासत्ताक दिनाच्या या वर्षीच्या परेड मध्ये केवळ महिलाच महिला दिसणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून यंदा २०२३ साली झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही महिला सक्षमीकरणाची झलक दिसली. आता केंद्र सरकारने २०२४ मध्ये होणाऱ्या ‘प्रजासत्ताक दिन परेड २०२४’ संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. लष्करी आणि इतर क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुख प्रयत्नात, २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केवळ महिलाच प्रदर्शन मार्च पास्टमध्ये भाग घेतील.

सूत्रांनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या औपचारिक शाखेने सर्व सुरक्षा दलांना तसेच इतर महत्त्वाच्या भागधारकांना एक नोट पाठवली आहे जी इतर सर्व मंत्रालये आणि विभागांच्या समन्वयाने प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन करते. “तपशीलवार विचारविमर्शानंतर, प्रजासत्ताक दिन २०२४ च्या कर्तव्याच्या मार्गावर परेड दरम्यान दल (मार्च आणि बँड), झलक आणि प्रात्यक्षिकांसह सर्व महिलांचा सहभाग असेल,” असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्रालयाने येत्या वर्षात सर्व महिलांची परेड आयोजित करण्याचा निर्णय गृह, संस्कृती आणि शहरी विकास मंत्रालयासह इतर मंत्रालयांना सुद्धा कळवला आहे.

 

साडेतीन किलो सोने जप्त करत मुंबई विमानतळावर तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने मुंबईत जवळपास ३.३५ किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २.१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली आहे.

काय प्रकरण आहे ?

गुप्तचर माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शोध घेतला. यावेळी त्यांनी एक प्रवासी, ड्युटी फ्री शॉपचे काही कर्मचारी आणि फूड कोर्टचे काही कर्मचारी पकडले. त्याच्याकडूनच ही वसुली करण्यात आली.

असे आहे रॅकेट

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार हे सोने पेस्टच्या स्वरूपात जप्त करण्यात आले आहे. त्याचे वजन सुमारे ३.३५ किलो आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे २.१ कोटी रुपये इतकी आहे. विमानतळाचे कर्मचारी हे तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेऊन विविध ठिकाणी पुढील व्यक्तीकडे सुपूर्द करायचे.

 

कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून बेशुद्धावस्थेत गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी; पोलीसांना पाहून आरोपी फरार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पश्चिम येथे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झालेल्या गोवंशीय जातीची जनावरं स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी सुरु होती. कल्याण बाजारपेठ पोलीसांनी छापा मारून एका आरोपीला ताब्यात घेत २ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. तर ५ आरोपी फरार झाले आहेत. कल्याण पश्चिमेत गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे औषध देत बेशुद्धावस्थेत स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी छापा मारत सोयब निजाम करके या आरोपीला रंगेहाथ पकडत २ गोवांशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. बाजारपेठ पोलीसांनी एक रिक्षा आणि २ स्विफ्ट गाड्या असा एकूण २,६०,००० /- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनानुसार गुन्हा दाखल करत या तस्करीत फरार झालेल्या ५ आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलीसांना कल्याण पश्चिमेकडील रेतीबंदर खाडी परीसरात जीन्स कारखान्याजवळ सार्वजनिक मोकळी जागा आहे. या ठिकाणी गाईंना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप यांना मिळाली होती. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि अरुण घोलप, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल, बाविस्कर, पावसे व पोलीस नाईक कातकडे, फड यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सागर इमारतीच्या शेजारी खाडीकिनारी छापा मारत आरोपी सोयब निजाम करके (वय: ३२ वर्ष) याला रंगेहात पकडत २ गाईंची सुटका केली. तर या छापेमारी दरम्यान १) इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी, २) अरबाज, ३) गोरू, ४) मच्छी, ५) आवली, ६) बारक्या असे सहा आरोपी फरार झाले आहेत. नमूद २ गोवंशीय जातीच्या जनावरांना बापगांव गोशाळा येथे पुढील संगोपनासाठी जमा करण्यात आले आहे.

बाजारपेठ पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी संगनमत करून ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे इंजेक्शन मारायचे आणि नंतर ही जनावर खाली बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना एका चादरीमध्ये गुंडाळून पाच ते सहा जण मिळून त्यांना स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये भरून वाहतूक करून कत्तल  करायचे.

 

विविध उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा एक शैक्षणिक उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दिनांक ६ मे २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. सदर भेट ही महासंघाचे हितचिंतक श्री. अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीय ह्यांच्या तर्फे भालचंद्र वैद्य ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली. ह्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य ऍड.सौ. माधुरी जोशी तसेच विद्यालयाचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतर्फे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे आभार मानले.

लालबावटा रिक्षा युनियनतर्फे शूरवीर आन ठाकूर-मान ठाकूर यांच्या स्मृतीदिनी मोफत जेवण वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील सोनेरी पानावर ठसा उमटवणारे डोंबिवलीतील आन ठाकूर-मान ठाकूर यांच्या २८४ व्या स्मृती दिनानिमित्त ‘लालबावटा रिक्षा युनियन’ आणि ‘प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट’ च्या वतीने मोफत जेवणाचे वाटप बुधवारी दुपारी करण्यात आले. आन ठाकूर आणि मान ठाकूर यांचे वंशज जगदीश ठाकूर यांच्या हस्ते मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले.

यावेळी लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर, मधुकर माळी. कमलाकर पाटील, नितीन पाटील (भोपर गाव), हनुमान पाटील (पडले गाव), जयवंत पाटील (निळजे गाव) इत्यादी ग्रामीण भागातील आगरी समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांसह डोंबिवलीतील नागरिक उपस्थित होते.

पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी ३ मे १७३९ रोजी जुनी डोंबिवली गावातील सुपुत्र शूरवीर आन ठाकूर व मान ठाकूर यांच्यावर किल्ल्याचा बुरुज सुरुंग पेरून उडविण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा सुरुंगाच्या स्फोटात त्यांना वीरमरण आले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील आन ठाकूर व मान ठाकूर हे दोघे एक सोनेरी पान आहे. याचा डोंबिवलीकरांना अभिमान असल्याचे जगदीश ठाकूर यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या शूरवीर बंधूंच्या स्मृतीदिनानिमित्त ‘लालबावटा रिक्षा युनियन’ आणि ‘प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट’ यांच्यावतीने बुधवारी दुपारी मोफत जेवण जेवणाचे वाटप करण्यात आले.