Home Blog Page 35

कल्याण खडकपाडा येथे अद्यावत ‘ओएसिस हॉस्पिटल’ चा उद्घाटन समारंभ संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण शहराचा विकास होत आहे तशी लोकवस्ती देखील वाढताना दिसत आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर काही गोष्टींची आपल्याला गरज पडत असते ज्या मधली एक गरज म्हणजे वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटल. प्रत्येकाची इच्छा असते की हॉस्पिटलची पायरी कधीही चढायला लागू नये पण काही वेळा एक अद्यावत हॉस्पिटल परिसरात जवळ उपलब्ध असावे जेणेकरून इमर्जन्सी च्या वेळी कुठेही लांब जायला लागू नये.


कल्याण आधारवाडी डीबी चौक येथे अद्यावत सुसज्ज असे ४० बेडचे ‘ओएसिस हॉस्पिटल’ आता सुरू झाले आहे. ज्यामध्ये अकरा बेड चे आयसीयू, २ ओ टी व १ लेबर ओ टी, भाजलेल्या रुग्णासाठी स्पेशल वॉर्ड, २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब अशा अत्याधुनिक सर्व सुविधा येथे उपलब्धअसणार आहेत. हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर तर ओ टी चे उद्घाटन आयएमए एक्स प्रेसिडेंट डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक सुनील वायले, आयएमए प्रेसिडेंट डॉ. ईशा पानसरे, उद्योजक दीपक भंडारी, उद्योजक मच्छिंद्र जाधव आणि अनेक नामवंत डॉक्टर यांच्या उपस्थित झाले.

हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. फिजिशियन डॉ. दयानंद ढेकणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेश पाखरे, प्लास्टिक सर्जन डॉ. पराग तेलवणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गणेश शिरसाठ अशा कल्याण मधील चार सुप्रसिद्ध डॉक्टरांनी मिळून ‘ओएसिस हॉस्पिटल’ सुरू केले आहे. विशेष सांगायचं झालं तर गरीब रुग्णांसाठी खास १० बेड राखीव ठेवून कमीत कमी खर्चात त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.

 

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांच्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निरीक्षक पदाची जबाबदारी

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायचूर जिल्ह्यातील सिंद्धनौर विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सध्या हुसैन प्रचारात सहभागी झाले असून राष्ट्रीय महासचिव एच. के पाटील, सचिव बी.एम. संदीप यांची भेट घेतली. उमेदवार हंपी गौडा , जिल्हा, ब्लॉक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांकडून मतदारसंघातील बूथ कमिटी, मतदान केंद्र आदी कामाचा आढावा हुसैन यांनी घेतला.

महाराष्ट्राच्या राजकारणात मुझफ्फर हुसैन यांचे मोठे योगदान असून पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी त्यांनी विविध पदांवर कार्य करत ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहूनच केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उतरवले आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल ( धर्मनिरपेक्ष) व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये येथे थेट लढत होत असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील ५८- सिंद्धनौर विधानसभा मतदारसंघात थोडा शहरी तर जास्त ग्रामीण भागाचा समावेश असून दोन लाख चाळीस हजार मतदार असून १०७ गावांचा समावेश आहे तर याठिकाणी ८० ग्रामपंचायती आहेत.

प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हंपी गौडा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केला आहे.

अनैतिक संबंधाच्या वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपींना मानपाडा पोलीसांनी केली ०३ तासात अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली येथील पुलाची वाडी येथे राहणारे मारूती लक्ष्मण हांडे (वय ५५ वर्षे) यांचे संध्या सिंग नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी दर्शन चाळ, कोळेगाव, डोंबिवली (पूर्व) येथे ०१ वर्षांपासून राहत होते. संध्या सिंग हिचे सदर भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याचेसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याचेत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सदरची बाब मारुती हांडे यास माहिती झाल्यानंतर त्याच्यात व संध्या सिंग यांचे वाद होवू लागले. त्याने अनेक वेळा संध्या सिंग हिला समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांच्यातील प्रेम सबंध सुरूच होते. त्यामुळे मारुती हांडे हा नेहमी संध्या सिंग हिच्याशी वाद घालू लागला, त्यामुळे संध्या सिंग व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांनी त्यांच्या प्रेमतील अडसर दूर करण्यासाठी मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याचा प्लान आखला. त्याचप्रमाणे दिनांक २२/०४/२०२३ रोजी मारुती हांडे हा दुपारी त्याच्या घरात जात असताना, वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याने मारुती हांडे याच्या डोक्यात, हातावर, पायावर, स्टंम्पने मारहाण केली त्यावेळी संध्या सिंग हिने मारुती हांडे यास मारण्यासाठी वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याला प्रोत्साहन दिले. वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याने मारुती हांडे याच्या डोक्यात स्टंम्पने जोरजोरात उपट घालून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर संध्या सिंग हिने वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याच्या मदतीने मारुती हांडे यास कोळेगावातील ‘ज्ञानदेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ येथे दवाउपचारसाठी दाखल केले असता त्यावेळी त्यास कोणी मारले याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना काहीही माहिती दिली नाही, मारुती हांडे यास झालेल्या जखमा ह्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्यास पुढील उपचारासाठी कळवा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय’ येथे पाठविण्यात आले. त्यावेळी संध्या सिंग हिने मारुती हांडे याच्या पत्नीस फोन करून मारुती हांडे यास कोणीतरी जबर मारहाण केली असून, त्यास आम्ही कळवा येथे हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याची माहिती देवून सदर ठिकाणी बोलावुन घेतले. त्यावेळी मारुती हांडे याची पत्नी, मुलगा व भाऊ असे हॉस्पीटलमध्ये आले असता, संध्या सिंग हिने मारुती हांडे यास कोणी मारले याची काहीएक माहिती न देता जखमीचे केस पेपर मारुती हांडे याच्या पत्नीकडे देवुन हॉस्पीटलमधून गपचुप पोबारा केला.

जखमी मारुती हांडे यास झालेल्या जखमा ह्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने, त्यास पुढील उपचारासाठी मुंबई येथील ‘सर जे.जे.रुग्णालय’ येथे पाठविण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना तो दिनांक २३/०४/२०२३ रोजी पहाटे ०५.१५ वा. मयत झाला. त्याच्या मृत्युबाबत मानपाडा पोलीस ठाण्याला माहिती मिळताच सदर गुन्ह्याचा प्रकार हा गंभीर असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या ०३ टिम तयार करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. संध्या सिंग व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांचा त्यांच्या पत्त्यावर शोध घेतला असता ते त्यांचे घरी सापडले नाहीत. सदर आरोपींचा वेगवेगळया पध्दतीने शोध घेण्यात आला असून, सदर आरोपी यांचा कोणताही सुगावा किंवा मागमूस नसताना त्यांचा अथक प्रयत्नांनी व कसोशीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केली असता सदर दोन्ही आरोपी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधात मारुती हांडे हा अडथळा निर्माण करीत असल्याने, त्यांनी त्याचा काटा काढल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि (कल्याण) दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, सपोनि. सुरेश डांबरे, अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहेकाँ. सोमनाथ टिकेकर, सुनिल पवार, संजय मासाळ, शिरीष पाटील, पोना. प्रविण किनरे, अनिल घुगे, गणेश भोईर, पोकाँ. अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

डोंबिवली सांडपाणी उदंचन प्रकल्पास अधिक दर्जा प्राप्त होणार ; ‘निरी’ संस्थेच्यावतीने पहाणी अहवाल सादर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता उद्योजकांची कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) संघटना कायम कटिबद्ध राहिल असे संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. निरी संस्थेने डोंबिवली येथील सामान्य उदंचन प्रक्रिया प्रकल्पास (सीईटीपी ) मार्च २०२३ मध्ये भेट दिली होती. या प्रकल्पाच्या कार्याबाबत ‘निरी’ ने समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प अधिक अद्यावत तंत्रज्ञान युक्त करण्यासाठी ‘कामा’ संघटनेने विकास आराखड्याचा प्रस्ताव ‘निरी’ ला दिला होता. याबाबतचा अहवाल ‘निरी’ ने ‘कामा’ संघटनेकडे दिला असून आता डोंबिवली सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास अधिक दर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्वास कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कारखान्यातून सोडण्यात येणारे सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया दर्जेदार होईल आणि सांडपाण्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण कमी होईल.

‘कामा’ संघटनेचा पर्यावरण संरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांना विषद केला. ‘कामा’ संघटनेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.५ जून या पर्यावरण दिनानिमित्त एकल वापर प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी २०२२ साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने एका जागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. दर पावसाळ्यात डोंबिवली आणि इतर परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. भारतातील विविध राज्यांतील पर्यावरण संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ‘कामा’ चे सदस्य किंवा पदाधिकारी सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे उद्योजकांच्या विविध संघटनांनी आयोजित केलेल्या पर्यावरण विषयक उपक्रमात सहभागी होत असतात. या सहभागातून पर्यावरण संरक्षणासाठी नेमके काय कार्यक्रम राबविण्यात यावे याचं मौलिक विचार ऐकायला मिळतात.

नागपूर येथे ‘निरी’ (नॅशनल एनव्हायरोमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात याचा अनुभव आला. असे देवेन सोनी यांनी सांगितले. ‘निरी’ संस्थेने डोंबिवली येथील सामान्य उदंचन प्रक्रिया प्रकल्पास (सीईटीपी) मार्च २०२३ मध्ये भेट दिली होती. या प्रकल्पाच्या कार्याबाबत ‘निरी’ने समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प अधिक अद्यावत तंत्रशुद्ध तंत्रज्ञान युक्त करण्यासाठी ‘कामा’ संघटनेने विकास आराखड्याचा प्रस्ताव ‘निरी’ ला दिला होता. याबाबतचा अहवाल ‘निरी’ ने ‘कामा’ कडे दिला असून आता डोंबिवली सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास अधिक दर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्वास ‘कामा’ चे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर झालेल्या वार्तालापात व्यक्त केला आहे.

‘कामा’ संघटनेच्या पर्यावरण संरक्षण विषयक उपक्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते द्वितीय वसूंधरा पारितोषिकाचा मान मिळाला होता.

 

जन्मजात दुर्मिळ आजार असणाऱ्या महिलेवर वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार!

मुंबई, प्रतिनिधी: डिप वेन थ्रोम्बोसिस या विकाराने पिडीत असलेल्या एका ५९ वर्षीय महिलेवर मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या आजारामुळे महिलेच्या डाव्या पायाला मोठी सूज आली होती. आता महिलेची प्रकृती उत्तम असून तिला घरी सोडण्यात आले आहे.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रुग्णालयातील कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशिष मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.
विरारमध्ये राहणाऱ्या वंदना देसाई (नाव बदललेले आहे) यांना पायात असहय वेदना जाणवत होत्या. पायाला सूज असल्याने त्यांना चालतानाही येत नव्हतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचणी केली असता त्यात डिप वेन थ्रोम्बोसिस असल्याचं निदान झालं.
डीप वेन थ्रोम्बोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे. विशेषतः पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. ही समस्या संसर्ग व जळजळ किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते. डीवीटी विविध कारणांमुळे होऊ शकतो. ज्यामध्ये शस्त्रक्रिया, दुखापत, गर्भधारणा, हार्मोन थेरपी, कर्करोग आणि काही अनुवांशिक किंवा शारीरिक विकार यांचा समावेश होतो.

डीवीटीच्या लक्षणांमध्ये प्रभावित भागात वेदना, सूज, उबदारपणा आणि लालसरपणा यांचा समावेश होतो. याशिवाय डीवीटी असलेल्या काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही. डीवीटीच्या निदानामध्ये सामान्यतः अल्ट्रासाऊंड, सीटीस्कॅन यांसारख्या इमेजिंग चाचण्यांचा समावेश असतो. रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ नयेत आणि फुफ्फुसात जाण्यापासून रोखण्यासाठी अंटीकोआगुलंट औषधे (रक्त पातळ करणारे) समाविष्ट असतात.

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशिष मिश्रा म्हणाले की, “रूग्णाच्या पायाची सूज डाव्या मांडीपर्यंत वाढली होती. इकोकार्डियोग्राफी हे सौम्य पल्मोनरी हायपरटेन्शन सह हृदयाचे सामान्य कार्य सूचित करते. शस्त्रक्रियेनंतर पुढील ३ दिवसांत डाव्या खालच्या अंगावरील सूज ५०% पेक्षा जास्त दूर झाली आणि रूग्णाला वैदयकीयदृष्ट्या सुधारित स्थितीत ओरल अँटीकोग्युलेशन आणि सपोर्टिव्ह थेरपीने सोडण्यात आले.

रूग्ण महिलेनं आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “माझ्या पायाला सूज आली होती. ज्यामुळे मला चालणे, उभे राहणे किंवा बसणे देखील कठीण होत होते. दैनंदिन कामे करण्यासाठीही कुटुंबियांवर अवलंबून राहावे लागत होते. शिरांशी संबंधित दुर्मिळ जन्मजात शारीरिक विकार असल्याचं निदान झाल्यावर मी घाबरून गेले होते. पण वेळीच निदान व उपचार करून माझे प्राण वाचविल्याबद्दल मी वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानते. आता मी ठीक झाली असून माझी दैनंदिन कामे करू लागली आहे.”