Home Blog Page 36

मिरा भाईंदर शहरातील प्रस्तावित करवाढीला काँग्रेसचा विरोध, आंदोलनाचा इशारा!

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन केले सादर!

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिकेचा कालावधी ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्याने राज्यशासनाने आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर केल्याचे जाहीर करूनही आता नव्याने १०% रस्ता कर, १० ते १५% पाणीपुरवठा लाभ कर, २५ ते ३०% पाणीपट्टी मध्ये करवाढ, अर्धा टक्का अग्निशमन सेवा करवाढ तसेच परिवहन सेवा बस भाड्यात वाढ, अश्या प्रकारचे कर वाढीचे प्रशासकीय निर्णय का व कसे घेण्यात आले? असा सवाल करीत काँग्रेस ने प्रस्तावित करवाढीला विरोध केला आहे.

 

जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी गटनेते जुबेर इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप चे सरकार सत्तेत असताना भाजप च्या माजी आमदार व विद्यमान आमदार यांना करवाढीवर आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याची टीका सामंत यांनी केली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या उपस्थितीत आम्ही आयुक्तांची भेट घेतली तेव्हा सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले होते असे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करू नका अश्या प्रकारचे निवेदन त्यावेळी आयुक्तांना देण्यात आले होते, त्यानंतर अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, आयुक्तांनी तसे जाहीर ही केले होते. तश्या बातम्या विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या, मग आता अचानकपणे करवाढ का केली जात आहे? प्रशासकीय राजवट असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना आयुक्तांनी ज्या पध्दतीने करवाढ केली आहे ती अयोग्य असून याबाबतीत सकारात्मक विचार करून करवाढीचा निर्णय रद्द करून सर्वसामान्य करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनहितार्थ काँग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी माजी नगरसेविका मर्लिन डीसा, रुबिना शेख, गीता परदेशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे ‘आई महोत्सव’ दिमाखात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे गेली १३ वर्ष ‘कै. रिटा पॉल आई महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपला विकास, मुलांचा उत्कर्ष व समाजासाठी आदर्श बनणाऱ्या सामान्यातील असामान्य अश्या १० आई श्रीमती सुनेत्रा चंद्रशेखर पाटील, लता कळसकर, बेन्सी जोसेफ, ललिता अंबादास डोंगरे, लीला शिंगोले, संध्या मंगल अंभोरे, रेणुका नाईक, लीलावती लक्ष्मण म्हात्रे, निर्मला धोत्रे, मोनाबाई काळूराम बांगर यांचा सत्कार रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. कैलाश जेठानी व डॉ. अरुण पाटील यांचे हस्ते झाला.

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन’ अध्यक्ष ऍनी बिजॉय, पॉल पेरापिल्ली, डॉमनिक व जॉन पॉल, डेव्हिड ओमन, सेक्रेटरी निकीता जैन व योगेश झांबरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला तसेच निकीता जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

१२ तासात सव्वा दोन लाखाचे मोबाईल जप्त करत डोंबिवली पोलीसांनी केले चोरट्यांना गजाआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात डोंबिवली पोलीसांना यश आले आहे. मोबाईल दुकानाचे शटर उचलटून मोबाईल चोरणाऱ्यांना डोंबिवली रामनगर पोलीसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान (वय: २५ वर्षे) राहणार: श्री समर्थ सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व आणि सागर श्याम पारखे (वय: २३ वर्षे) राहणार: श्री समर्थ कृपा, कृपा सर्विस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व, असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १२ तासात दोघा चोरट्यांना पकडण्यात डोंबिवली रामनगर पोलीसांना यश आले. चोरट्यांकडून एकूण रुपये २,३७,०६०/- किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. १४ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील उर्सेकर वाडी येथील मधुबन गल्लीतील नव डोंबिवली सोसायटी, डी-विंग, गाळा न.३० येथील ‘प्रिया मोबाईल’च्या दुकानाचे शटर दोन अनोळखी इसमांनी उचकटुन दुकानात प्रवेश करून एकूण रुपये ४,०७,१२०/- किंमतीचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी सुंदरम विश्वनाथ गवंडर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि तडवी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हासगुळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, पोहवा विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड यांनी मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू केला. दोघा चोरट्यांना फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान आणि सागर श्याम पारखे यांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या १२ तासाच्या आत अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांवर मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे सपोनि बळवंत भराडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबीवली विभाग, सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शन व देखरेखी खाली सपोनि वळवंत भराडे, केशव हासगुळे, पोउनि विजय कांबळे, पोहवा सुनिल भणगे, भालेराव, तुळशिराम लोखंडे, विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, राहुल ठाकूर यांनी कामगिरी बजावली आहे.

 

तहसीलदार कार्यालय समोर काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह आंदोलन

“बहुमताच्या जोरावर भाजप कडून हम करे सो कायदा पद्धत राबविली जात असल्याने देशाची राज्यघटना धोक्यात!” – मुझफ्फर हुसैन

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षातील मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या राजवटीत चुकीच्या धोरणांमुळे देश अधोगतीला गेल्याची टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी केली. काँग्रेसने देश घडवला व मोठा केला परंतु आज देश एका उद्योगपतीच्या इशाऱ्यावर चालवला जात आहे हे दुर्दैव आहे.

काँग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले आहे, ” जबाब दो मोदीजी” म्हणत संसद ते सडक अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्याची मागणी करीत भाईंदर येथील तहसीलदार कार्यालयाला घेराव घालत निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सचिव आनंद सिंह, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक राजीव मेहरा, गीता परदेशी, फरीद कुरेशी, अश्रफ शेख, महिला अध्यक्ष रूपा पिंटो यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक, सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुझफ्फर हुसैन पुढे म्हणाले की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशवासियांना “डरो मत” चा संदेश दिला असून जे प्रश्न संसदेत विचारले तेच प्रश्न सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून विचारत आहेत परंतु नरेंद्र मोदी आपल्या उद्योगपती मित्रासाठी काहीही बोलण्यास तयार नाहीत याचा अर्थ हा देश कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, प्रश्न विचारला म्हणून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व तडकाफडकी रद्द केले जाते, ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, आरक्षण हटवून मनुवादाला प्रोत्साहन देत समान नागरी कायदा आणण्याचा डाव आखला जात असल्याचे हुसैन म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर जीएसटी लावून महागाई वाढवली, बेरोजगारी वाढल्याने युवक नाराज, महिला असुरक्षित असल्याने देशाची जनता रस्त्यावर उतरून आगामी काळात मोदींना जाब विचारेल असे प्रदेश सचिव आनंद सिंह म्हणाले. देशाची घटना धोक्यात आली असून धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद असे मुद्दे पुढे करून वातावरण कलुषित करीत मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी सांगितले. यावेळी अनिल सावंत, रुबिना शेख, दिनेश सक्सेना, श्याम शहारे, सिद्धेश राणे, राकेश राजपुरोहीत, महेंद्र सिंह, कुणाल काटकर, साहेबलाल यादव यांनी विचार व्यक्त केले.

कल्याण जिल्हा भाजपा तर्फे परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचावेत व सामाजिक समरसता सर्वांगी रुजावी याकरिता बाबासाहेबांनी केलेले काम जगातील सर्वात लोकशाही मोठी असलेल्या देशाचे लिहिलेले संविधान कायदा हा सर्वात मोठा आहे. सर्वांना समान न्याय मिळावा, कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत हेच विचार बाबासाहेबांनी रुजवले. पूर्वीच्या जातीवादाच्या भिंती मोडून सर्व समाजामध्ये शिक्षण रुजलं पाहिजे समाजातील तळागाळातील घटक मोठा झाला पाहिजे याकरता बाबासाहेबांनी देशातल्या सर्व जातींसाठी काम केले.

यंदाच्या १३२ व्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नाना सूर्यवंशी, मनोज राय, अर्जुन म्हात्रे, विलास खंडी झोड, मुकेश सेंघानी, मोरेश्वर भोईर, अनिरुद्ध जाधव, अर्चना सूर्यवंशी, नितीन शिंदे, संतोष शिंदे, संतोष होळकर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.