Home Blog Page 37

महिला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेण्याचा उपविजेती वैष्णवी पाटील हीचा मोठा गाव यात्रेत निर्धार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील गावदेवी माता यात्रेनिमित्त मोठा गाव देवीचा पाडा येथील ग्रामदेवता श्री गावदेवी आईच्या निमित्त देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने कुस्तीच्या जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून ‘महिला महाराष्ट्र केसरी’ची उपविजेती वैष्णवी पाटील यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आगामी महिला महाराष्ट्र केसरीच्या विजेतीपदाची गदा घेऊन येणार असल्याचा निर्धार कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला. मोठा गाव येथील होत असलेल्या महिला कुस्ती सामन्यांमध्ये वैष्णवी पाटील या सहभागी होत असत.


यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, राजेश मोरे, सुरेश मोरे, एकनाथ म्हात्रे, हरिचंद्र पाटील, मनसेचे प्रकाश भोईर, ‘महाराष्ट्र केसरी’ सईद चौस तसेच मोठा गाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दीपेश म्हात्रे यांनी वैष्णवी पाटील यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना वैष्णवी पाटील म्हणाल्या की, या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये गावातील जत्रा आणि ग्रामस्थ मंडळाचे आणि येथील प्रशिक्षकांचे मी आभार मानते. तसेच राजतातून आलेल्या स्पर्धकांना स्फूर्ती देण्यासाठी महिला महाराष्ट्र केसरी’ची उपविजेती वैष्णवी पाटील हिने गदा घेऊन कुस्तीच्या आखड्याला एक फेरा मारला.

मी ‘महाराष्ट्र केसरी’ची उपविजेती झाल्यानंतर मला सर्व स्तरातून खूप प्रेम मिळाले. मी जरी उपविजेती झाले असले तरी हे मला इतके मिळालेले प्रेम पाहून माझ्या मनात आता अशी भावना निर्माण झाली आहे की, मी आगामी महिला महाराष्ट्र केसरी विजेती पदाची गदा खांद्यावर घेऊन येणार आहे. यासाठी मी अधीक मेहनत घेऊन परिश्रम करत आहे.

तर दीपेश म्हात्रे म्हणाले की तुम्ही पाहिले असेल की, या कुस्ती सामन्यांमध्ये लहान लहान मुलांनी भाग घेतला होता. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. यातून अनेक वैष्णवी पाटील आणि सईद चौस सारखे खेळाडू घडत असतात. हा खेळ अधिकाधिक मुलांपर्यंत जावा यासाठी ट्रस्ट प्रयत्न करीत आहे. या कुस्ती सामन्यात हजार एक कुस्तीगीर सहभागी झाले होते. राज्याच्या गावागावातून स्पर्धेसाठी एक कुस्तीगीर आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. हे सामने पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक रसिक जमा झाले होते.

 

देवेंद्र फडणवीस यांनी ‘बार्टी’च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून शब्द पाळला – अमित गोरखे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यात भाजप व शिवसेना सरकारने अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) च्या सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. या संदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना ८ मार्च २०२३ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून पाळला आहे, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या ८६१ विद्यार्थ्यांची ‘बार्टी फेलोशिप’ मंजुरीसाठी प्रतीक्षेत होती. तसा प्रस्ताव तत्कालीन बार्टीचे महासंचालक यांनी बार्टी नियामक मंडळ यांच्या मान्यतेने २६ डिसेंबर २०२२ आणि १ फेब्रुवारी २०२३ रोजी असे दोन वेळा प्रस्ताव मंजुरीसाठी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे मंत्रालय मुंबई येथे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा आधार घेत ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ च्या धरतीवर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सुद्धा बार्टी कडून सरसकट फेलोशिप देण्यात यावे, असे पत्र अमित गोरखे यांनी दिले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित गोरखे यांना आश्वासन दिले होते की, अधिवेशन संपताच सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्यासोबत चर्चा करून हा विषय मार्गी लावला जाईल. त्यांनी दिलेल्या या आश्वासनाची अखेर पुर्तता झाली आहे.

या संदर्भात अमित गोखे म्हणाले की, बार्टीला फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. फेलोशिपच्या प्रश्नाबाबत फलनिष्पत्ती प्राप्त झाली. याविषयी महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थी आझाद मैदानावर फेलोशिपसाठी उपोषण करीत होते. त्यापैकी काही विद्यार्थी माझ्या संपर्कात होते. उपोषणाला बसण्या अगोदरपासून ते फोन करून प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी विनंती करीत होते.या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्यातील मातब्बर लोकांनी या विषयासंदर्भात आपआपल्या परीने पाठ पुरावा केला. अखेर या लढाईला यश मिळाले. शासनाला प्रथम पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर शासनाने हा विषय निकाली काढला आहे. विद्यार्थ्यांनी देखील भाजप-शिवेसना सरकारचे धन्यवाद व्यक्त केले असून विद्यार्थ्यांच्या वतीने माझ्याकडून देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त करतो असे ते म्हणाले.

केंद्र व राज्य सरकार सदैव जनतेच्या हिताचे कामे करीत आहे. शेतकरी वंचित घटक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न बाबत त्यांच्या समस्येचं निराकरण करून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहे. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत देशाला जो मूलमंत्र दिला आहे. त्याचे सामाजिकरण करून समता प्रस्थापित करण्याचे उदिष्ट साध्य केले जात आहे. समाजातील सामाजिक स्थर उंचावून राष्ट्राची राष्ट्रीय अखंडता साध्य व सिद्ध करण्याचे काम भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेले आहे. हे या निर्णावरून स्पष्ट होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमी वर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिवादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वरात्री दादर येथील चैत्यभूमीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन जयंती सोहळ्याच्या निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जमतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. तसेच आगामी ३ दिवस रात्री वांद्रे वरळी सी-लिंक वरील विद्युत रोषणाई सुरू ठेवण्याचे निर्देश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.

तसेच यानंतर चेंबूर येथील सिद्धार्थनगर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या अशोकस्तंभाचे लोकार्पण केले. तसेच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नागसेन कांबळे तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर नेते आणि भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी आता केवळ एक प्रादेशिक पक्ष..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले असताना भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नसून निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. सीपीआय आता केरळ, मणिपूर आणि तामिळनाडूमध्ये राज्याचा दर्जा असलेला राज्य पक्ष म्हणून गणला जाईल.

हे आहेत राष्ट्रीय पक्षासाठीचे निकष

जो राजकीय लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त मतं प्राप्त करेल अशाच पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या २ टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून ११ जागा जिंकाव्या लागतात.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.

घड्याळाला अन्य राज्यात बंदी

१९६८ सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका ‘घड्याळ’ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा

दरम्यान निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाला ‘झाडू’ नॅशनल पार्टी म्हणून निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

आमच्यासाठी राम मंदीर हा राजनैतिक नव्हे तर अस्मितेचा विषय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि प्रस्तावित मंदीर प्रकल्पाची पहाणी केली. शिवसेनेच्या गटाला ‘धनुष्य आणि बाण’ चिन्ह मिळाल्याचे चिन्ह प्रभू रामाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, असे प्रतिपादन करत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी अयोध्येमध्ये हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य महाराष्ट्र भवन उभारले जाईल. अशी घोषणा केली.

“आजचा हा दिवस माझ्यासाठी अभूतपूर्व असा दिवस आहे. मंदीर हा आमच्यासाठी राजकीय नव्हे तर अस्मितेचा विषय आहे. राममंदीर उभारणी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न होते, ते स्वप्न आज येथे प्रत्यक्षात साकारत आहे. हे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्णत्वास नेत आहेत”. अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दौऱ्याचा काहींना त्रास झाला, कारण त्यांना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर सर्वांच्या घराघरात, मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आले आहेत.