Home Blog Page 38

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची करडी ‘नजर’ ; मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणार भाजपचे तीन नेते..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौ-यावर जात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार, खासदार, मंत्री तसंच शिवसेना पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. पण या अयोद्धा दौ-यावर भाजपाची नजर असणार असुन भाजपाचे तीन मंत्री देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे भाजपाचा एकनाथ शिंदे यांच्यावर कायम वॉच राहणार आहे.

राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आहेत. पण राजकारणात काहीही होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून भाजपा कायमचं एकनाथ शिंदे यांच्यावर नजर ठेऊन असते. मुख्यमंत्र्याच्या काही कार्यक्रमात तर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसतो पण भाजपाचा कोणतातरी नेता किंवा आमदार कायम असतो त्यामुळे भाजपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वॉच ठेवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते.

आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी जात असताना भाजपचे नेतेदेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही अयोध्येमध्ये जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते गिरीश महाजन आणि संजय कुटे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जातील. संजय कुटे यांची ओळख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर भाजपाचे लक्ष असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते, कार्यकर्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत.

शरयू नदीवर महाआरती करून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सांगता होणार आहे. शिवसैनिक याआधीच स्पेशल ट्रेनने अयोध्येला पोहोचले आहेत. राज्यात यशस्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भाजपाकडून मंत्री रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज हे देखील गेले होते. त्यावेळी यावरुन बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते.

 

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथे पार्किन्सन्स रुग्णांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी: देशभरात लाखो लोकांना पार्किन्सन्स रोगाने (पीडी) बाधित केले आहे. या प्रगतीशील न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल जागरूकता पसरवणे आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने पार्किन्सन रोगाने पिडीत ४० हून अधिक रुग्णांकरिता मनोरंजक उपक्रमाचे आयोजन केले आहे. या रुग्णांना त्यांची मोटर आणि नॉन-मोटर कौशल्ये सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या यामागचा मुख्य उद्देश होता.

पार्किन्सन रोग (पीडी) हा एक न्यूरोडिजेनेरेटिव्ह डिसऑर्डर आहे जो हळूहळू वाढतो आणि काही काळानंतर त्याची लक्षणे दिसून येतात. एखाद्याला हा आजार असल्यास मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे एखाद्याच्या मोटर कौशल्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. थरथरणे, स्नायुंमधील कडकपणा , चालताना हालचाल करताना अडचणी येणे ही त्याची लक्षणे आहेत. हा रोग डोपामाइन-उत्पादक न्यूरॉन्सवर परिणाम करतो आणि नैराश्य, चिंतेशी संबंधित आहे आणि एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यत्यय आणतो. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने रूग्ण आणि काळजीवाहूंना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी एक सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. रूग्णांना आणि काळजीवाहूंना मोटर समन्वयाचे महत्त्व आणि रोगाचे पुढील व्यवस्थापन करण्याविषयी शिक्षित केले जावे हे सुनिश्चित करण्यासाठी हॉस्पिटलद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डॉ पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड, म्हणाले, पार्किन्सन्स रोग (PD) मुळे देशात उच्च मृत्यू आणि विकृती दर कारणीभूत आहेत. जरी तो बरा होऊ शकत नसला तरी डॉक्टरांच्या त्वरित मार्गदर्शनाने त्याचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. रुग्णाला कुटुंबातील सदस्य आणि काळजीवाहू यांच्या मदतीची देखील आवश्यकता असेल. रुग्णाचे आरोग्य, व्यायाम आणि पोषणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रुग्णाप्रमाणेच त्याचे/तिचे कुटुंबही खूप तणावातून जात असते. त्यामुळे या आजाराची सखोल माहिती असणे अत्यावश्यक आहे. रुग्णांना हातपाय आणि बोटांच्या समस्या येतात. स्नायू कडक होतात आणि चालण्याची क्षमता खराब होते. मुद्रा, भाषण आणि लेखन समस्या आणि हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता येते.

डॉ शीतल गोयल, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट वोक्हार्ट हॉस्पिटल पुढे म्हणाले, आमचा सपोर्ट ग्रुप हा संदेश पाठवतो की आम्ही रुग्णांची काळजी घेण्यासाठी तिथे आहोत. सुधार, संतुलन, तग धरण्याची क्षमता, सहनशक्ती, लवचिकता आणि हात-डोळा समन्वय आणि स्नायूंचा ताण आणि कडकपणा कमी करण्यासाठी मजेदार चित्रकला स्पर्धेसह फिजिओथेरपी क्रियाकलाप केला आहे. रेखाचित्रे एखाद्याला आनंदी बनवू शकतात आणि मनःस्थिती वाढवू शकतात. चालणे, संतुलन, पकड मजबूत करणे आणि मोटर स्किल्स सुधारण्यासही मदत करतील. पार्किन्सन रोगाच्या व्यवस्थापनात अलीकडील झालेली प्रगती देखील रुग्णांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल. त्यामुळे घाबरू जाऊ नका आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात रहा.

पार्किन्सन्समुळे माझे हात सतत थरथर कापत आहेत आणि मला लिहिता किंवा एखादी वस्तू धरता येत नाही. डॉक्टरांनी आम्हाला अनेक व्यायाम दाखवले आहेत ज्यामुळे मला या समस्या सुधारण्यास मदत होईल. सपोर्ट ग्रुपसह आम्हाला अनेक रुग्ण भेटतात आणि आम्हाला एकमेकांसोबत राहून बरे वाटतेअशी प्रतिक्रिया एका रुग्णाने व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून खेळाडुंचा सत्कार व कौतुक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकत्याच तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे सपन्न झालेल्या ४ थ्या आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवत भारतीय खेळाडूंनी भारताचे नाव उज्ज्वल केले. मुंबई येथे आशियाई खो-खो स्पर्धेत खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडुंचे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते, भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडु अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, सुयश गरगटे, अपेक्षा सुतार, प्रियांका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार, प्रशिक्षक महेश पलांडे, डॉ. अमित रावेट यांचा सत्कार करण्यात आला या वेळी डॉ. चंद्रजित जाधव, ऍड. गोविंद शर्मा , सुरेंद्र विश्वकर्मा, पंकज दळवी, तुषार मोरे, विजय बनसोडे उपस्थितीत होते.

यावेळी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या खेळाडुंचे कोडकौतुक तर केलेच व त्याचवेळी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुध्दा दिल्या. तसेच भविष्यात महाराष्ट्राचे व भारताचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले.

डोंबिवलीतून शिवसैनिकांचे ‘जय श्रीराम’ नावाचा जयघोष देत अयोध्येला प्रस्थान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येला जाण्यासाठी निघाले असून डोंबिवलीतूनही असंख्य शिवसैनिक अयोध्येला जाण्यासाठी रवाना झाले. डोंबिवलीतील शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेत शहरप्रमुख राजेश मोरे, संजय पावशे, संतोष चव्हाण, सागर दुबे, अमोल पाटील, वैभव राणे, समीर कवडे, तुषार शिंदे, गजानन व्यापारी, सुदाम जाधव, पांडुरंग चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक जमा झाले. मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डोंबिवली स्टेशनला जाताना शिवसैनिकांनी “जय श्रीराम, प्रभू रामचंद्रजी की जय” जयघोष करत अयोध्येला जाण्यासाठी प्रस्थान केले.

प्रस्थानाच्या वेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने निघाले असून येत्या ९ तारखेला मुख्यमंत्री शिंदे हे शरयू नदीजवळ महाआरती करणार आहेत व त्यानंतर मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेणार आहेत.

डाव्या विचारसरणीला चिरडून टाकण्याची गरज आहे – कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा नेहमीच गौरव केला आहे. परंतु ही डाव्या विचारसरणीचे मंडळी आपल्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना खिजवण्याचे काम करीत आहे. म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन ही डावी विचारसरणी चिरडून टाकण्याची गरज असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी वीर सावरकर गौरव यात्रे च्या समारोप प्रसंगी डोंबिवली येथील आप्पा दातार चौकात सांगितले.

काँग्रेसचे नेते आणि निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल डोंबिवली येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एका गौरव यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर नामदार रवींद्र चव्हाण यांच्यासह लोकसभा खासदर डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रमेश पाटील माजी राज्यमंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली शिवसेना शहर शाखेचे प्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.

यावेळी नामदार चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या वर्तमानपत्रात जे काही लिहून येत होतं. त्याचा राग विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात होता. नऊ महिन्यापूर्वी एक उठाव होऊन, हा मनातील राग बाहेर उफाळून आला. शंभर कॅरेट असलेलं सोन्यासारखं हिंदुत्वाचं ईडी सरकार या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आले. त्यामुळेच या डाव्या विचारसरणीच्या मंडळींमध्ये पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. आता यावर एकच औषध आहे ‘जो हिंदू हितकी बात करेगा, वही देश पे राज करेगा’ संपूर्ण राज्यामध्ये हेतू पुरस्सर अशी वक्तव्य केली जातात. अशामुळे विकास कामे भरकटली जात आहे. त्यासाठी हिंदुत्वाचा आणि उजव्या विचारसरणीचा विचार हा घराघरात पोहोचवण्याचे काम आपण केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नव्हे तर जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने आपण जात आहोत. त्यामुळे हिंदुत्व आणि उजवी विचारसरणी पुढे नेण्याचे काम आपणच केले पाहिजे. हाच विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितला होता. उजवी विचारसरणी दाबण्याचे काम डावी विचारसरणी करीत आहे. त्याविरोधात आपण पेटून उठून काम केले पाहिजे.

खासदर डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, की रविवारी सकाळी नाशिक भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म गावी गेलो होतो. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी. सावरकरांचे विचार हे तरुण मंडळींनी आत्मसात केले पाहिजे. १४ वर्ष त्यांनी जन्मठेप भोगली. ते स्थळ मी पाहिले असून १४ मिनिटे देखील आपण तिथे काढू शकत नाही. अशी त्या सेल्युलर जेल ची अवस्था आहे असे ते म्हणाले.