Home Blog Page 44

नरवीर तानाजी – सुर्याजी मालुसरेंच्या साखर गावात शिवजन्मोत्सव साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवरायांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज असलेल्या साखर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. उमरठ येथील सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधी स्थळावरुन साखर येथील सूर्याजी मालुसरे यांच्या समाधी पर्यंत शेकडो तरुणांच्या उपस्थितीत पहाटे शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार आणि कीर्तनकार हभप डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील (औरंगाबाद) यांचे शिवकार्याचा वेध घेणारे वीररसपूर्ण कीर्तन झाले. आजची तरुण पिढी बिघडलीय अशी खंत अलीकडे समाजात व्यक्त केली जाते, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरी होणारी शिवजयंती तरुणच साजरी करतात, त्याचबरोबर देशाची सीमांचे सरंक्षण करणारे तरुणच आहेत. मात्र आई वडिल संस्कार करण्यात कमी पडत आहेत. शिक्षण घेण्याच्या अन देण्याच्या पध्दतीत बदल झाला असला तरी महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाचे बाळकडू त्यांना सतत पाजत जा. असे आवाहन कीर्तनातून डॉ. प्रविण महाराजांनी केले. किर्तनास सुप्रसिद्ध स्वरगंधर्व कैलास महाराज पवार, गायन सम्राट संजय महाराज हजारे, रायगड भूषण पखवाज वादक सुनिल मेस्त्री, विठ्ठल मांढरे, जयराम चोरगे, अनिल दाभेकर, आनंद घाडगे यांनी साथ दिली. याप्रसंगी श्री सद्गगुरू भावे महाराज वारकरी समाजाचे गुरुवर्य हभप रामदादा घाडगे, पोलादपूर तालुक्याचे माजी सभापती नारायण अहिरे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळसकर या मान्यवरचा विशेष सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मालुसरे, विनायक मालुसरे, सरपंच पांडुरंग सुतार, प्रमुख संयोजक पांडुरंग शं. मालूसरे, विनायक ज. बांद्रे, पोलादपूर शिवसेना नेते आणि ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णा कदम, भरत चोरगे, दीपेश मालुसरे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम बांद्रे, दगडू शं. मालुसरे, संतोष तु. मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र मालुसरे, सुनिल बांद्रे, नारायण चोरगे, रूपेश सोनाटे, संदीप मालुसरे, राकेश चोरगे, नितेश ल. मालुसरे, वैभव सोनाटे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलादपूर शिवसेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे तर सूत्रसंचालन नारायण चोरगे गुरुजी यांनी केले. पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक आणि शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

 

भाजप नेते किरीट सोमय्यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेते किरीट साेमय्या यांची चाैकशी हाेणार असून किरीट साेमय्या यांची ही न्यायालयीन चाैकशी हाेणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली आहे.

राज्यात विराेधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ही माेहीम सुरू केली आहे. किरीट सोमैय्या आराेप करते आणि ‘ईडी’ चाैकशी करते. असा आराेप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा यांनी यासंदर्भात न्यायालयात जाेरदार युक्तिवाद केला हाेता. यात सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी ही माेहीम उघडली आहे. ते तक्रार करतात आणि त्यानंतर ‘ईडी’ कारवाई करते, असे हे नियाेजनपूर्वक चालू आहे. यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा वकील पोंडा यांनी केला. दरम्यान, आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा दिला. किरीट सोमैय्या यांच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले.

प्रकरण नक्की आहे काय ?

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या काेल्हापुरातील मालमत्तेवर ‘ईडी’ने छापेमारी केली. तसेच मुश्रीफ यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा हेतुपुरस्सर दाखल करण्यात आल्याचा आराेप मुश्रीफ यांनी केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून वेगवेगळ्या घटनांचा विचार करता ‘ईडी’मध्ये अडकवण्याचे प्रकार हाेत आहेत. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा हे षड्यंत्र असल्याचाही दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

यूएस शेअर बाजाराच्या घसरणीचा फटका; शेअर्स मार्केटमध्ये दाणादाण.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या आठवड्यात तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटी दाणादाण उडाली आहे. यूएस शेअर बाजारातील घसरणीचा फटका आज मुंबई शेअर बाजाराला बसला आहे. जागतिक संकेतांमुळे यूएस शेअर बाजारात ही घसरण नाेंदवली गेली. आज बीएसई सेन्सेक्स ८५९.१८ अंकांनी घसरला. म्हणजेच १.४४ टक्के घसरला आहे. ५८,९४७.१० वर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी देखील २३९.२५ अंकांनी घसरला आहे. म्हणजेच १.३६ टक्क्यांनी घसरून १७,३५०.३५ अंकांवर आला आहे.

शेअर बाजारात प्रामुख्याने अदानी समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ ५% आणि ‘एचडीएफसी बँक’ २% नी घसरली आहे. केअर रेटिंगमध्ये ‘अदानी एंटरप्रायझेस’चे रेटिंग स्थिर ते नकारात्मक असे बदल घडले आहेत. तसेच ‘एनएसई’ने ते अल्पकालीन देखरेखेखाली ठेवले आहेत. याशिवाय एचडीएफसी बँकेचा डेटा लिक झाल्याची माहिती समाेर आली आहे आणू तशा बातम्या झळकल्या देखील आहेत. बँकेने मात्र याप्रकाराला नकार दिला आहे. या गाेंधळामुळे एचडीएफसी बँकेचे समभाग दाेन टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहाच्या सूचीबद्ध दहापैकी सात समभाग घसरले आहेत.

मागील सत्रात समूहाचे सहा समभाग उच्चांकी पातळीवर बंद झाले हाेते. त्यापैकी चार समभाग वरच्या वळणावर हाेते. शुक्रवारी बाजार उघडताच ‘अदानी ग्रीन एनर्जी’ आणि ‘अदानी ट्रान्समिशन’चे शेअर्स अपर सर्किटवर पाेहाेचले. याशिवाय ‘अदानी टाेटल गॅस’च्या दरातही वाढ नाेंदवली गेली. पण एसीसी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड), अदानी पॉवर, अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसमध्ये सर्वाधिक ५.४४ टक्क्यांची घसरण नाेंदवली गेली.

 

शब्दांचा सुकाळ असलेला हा राज्याचा अर्थसंकल्प – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. विरोधीपक्षाने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राज्यात सध्या आर्थिक बेशिस्तीचे वातावरण आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी स्थगितीमुळे खर्च झालेला नाही. शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कर्ज काढून शेती केली जात आहे. शेतीचा उत्पादन खर्च निघत नाही अशी परिस्थिती आहे. अवकाळी पाऊस, महापूर अशा आपत्ती आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. सततच्या पावसाचे पैसै अजून मिळाले नाहीत. अशा काळात वर्षाला एका कुटुंबाला सहा हजार रुपये दिले आहेत. एका शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा असून त्यापेक्षा सोयाबीन, द्राक्षे, कांदे आणि अन्य शेतपिकाला दर द्या. दूरदृष्टीचा आभाव आणि स्वप्नांचे इमले, शब्दांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या आधीचे दोन अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने मांडले होते. त्या वेळी कोरोनाचे संकट होते आणि केंद्र सरकार आमच्या बाजूचे नव्हते. २५ हजार कोटींहून अधिक जीएसटी थकबाकी होती. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. आमच्या काळातील योजना नामांतर करून जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे काजूचा हलवा आहे असे त्यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.

 

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे काँग्रेसच्या वाटेवर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे सध्या पक्षात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. झिंजे गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असून माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांच्या अगदी जवळचे मानले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंशी त्यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यातच काळे यांच्या पुढाकारातून माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरातांनी झिंजेंच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चेला शहरात उधाण आले आहे.

झिंजे हे माजी नगरसेवक आहेत. अहमदनगर शहर हॉकर्स संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून सुमारे अडीच हजारहून अधिक हॉकर्स या संघटनेचे सभासद आहे. राष्ट्रवादीचे ते ज्येष्ठ नेते आहेत. माजी मंत्री आमदार थोरात नुकतेच शहर दौऱ्यावर आले असता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातील शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर झिंजे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी गप्पांचा फड रंगला होता. शहरातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे यावेळी झिंजे यांच्यावर मध्यंतरी झालेल्या भ्याड हल्ल्याची विचारपूस थोरात यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना घडलेल्या प्रकाराबद्दल थोरातांच्या समोर व्यक्त करत घडलेला प्रकार हा निंदनीय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्या प्रकरणापासून झिंजे हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये शहरात एकदाही दिसले नाहीत.

काळे यांच्या पुढाकारातून आमदार थोरात व झिंजे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. संजय झिंजे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादीने तसेच आमदारांच्या वतीने अनेकांनी अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिला नसून ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी सर्वत्र शक्यता वर्तवली जात आहे.