Home Blog Page 57

ब्रह्मकुमारी संस्थेच्या घाटकोपर विभागाचा ४७ वा वार्षिक उत्सव संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थेचा वार्षिक उत्सव नुकताच डोंबिवली येथील ‘हेरिटेज हॉल’ मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाची ‘सूनहरा बचपन’ या संकल्पनेवर रूपरेषा आखण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली व घाटकोपर उपविभागाच्या ब्रह्मकुमारी केंद्राने केला होता. गेली ४७ वर्ष अध्यातमिक कार्य ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने समाजात सुरू आहे .या वार्षिक दिनाच्या निमित्ताने राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉ.नलिनी दीदी (दीदी मां) यांचा सत्कार करुन त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये ब्रह्मकुमारी नलिनी दीदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाने उच्च पातळी गाठली. दीदीं मां यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले असून वयाची ६५ वर्ष त्यांनी निस्वार्थी, निर्लसपणे मानवाची सेवा आत्मियतने, काळजपूर्वक अध्यातमिक वाढीसाठी केली. डॉ नलिनी दीदी (दीदी मां) या मुंबईतील मध्यवर्ती राजयोग केंद्राच्या संचालक आहेत. या संस्थेच्या वार्षिकोत्सव दिनी लोकप्रिय अध्यातमिक गुरू ब्रह्मकुमारी नियतकालिकेच्या स्तंभलेखिका राजयोगी ब्रह्मकुमार निकुंज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ‘जान्हवी मल्टी फाऊंडशन’चे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, वपोनि सचिन सांडभोर आणि इतर मान्यवरांचा सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाटकोपर उपविभागाच्या सहसंचालक आणि डोंबिवली केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकू दीदी यांनी केले.

 

आगरी वधू-वर परिचय मेळावा डोंबिवलीत मोठ्या उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आगरी वधू-वर मेळावा डोंबिवली येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात आज नुकताच संपन्न झाला. या परिचय मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प प्रकाश महाराज, प्रथम महापौर आरती मोकल, ऍड. तुप्ती पाटील, ठाण्याचे मा. नगरसेवक रमाकांत पाटील, माजी सभापती चद्रकांत पाटील, काळू कोमास्कर, शरद पाटील, बाळासाहेब खारीक, दत्ता वझे, ह.भ.प हनुमान पाटील, इत्यादी मान्यवर या वधू-वर मेळाव्यास उपस्थित होते.

गावांचा विकास झाल्यामुळे आगरी समाजातील अनेकांचे स्थलांतर झाले आहे. लोक एकमेकांना भेटत नाहीत. विवाह जुळणे कठीण बाब झाली आहे. असे ह.भ.प प्रकाश महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले. बहुसंख्य भूमिपुत्र समाज जमीन विकून उध्वस्त झाला आहे. परिणामी त्याची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे मुलांची लग्न करण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे. अश्या समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याचे सगळ्या मान्यवर वक्त्यानी सांगितले.

तर, ऍडव्होकेट तृप्ती पाटील म्हणाल्या कि, आगरी समाजातील तरुण-तरुणींना स्टेजवर जाण्यासाठी संकोच वाटतो. तो दूर व्हावा यासाठी येथे वधू-वरांचा परिचय मेळावा आयोजित केला आहे. मागील वर्षी आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला होता. यंदा देखील आमदार राजू पाटील यांनी प्रत्येक जोडप्याला प्रोत्साहन पर भेट म्हणून प्रति जोडपे एक लाख रुपये देण्याची ग्वाही केली आहे. आगरी समाजात ही एक प्रकारची क्रांती आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मंगळ ग्रह शुभ आहे. त्याची भीती बाळगु नका. मध्यस्थी करणारे फसवणूक करतात. त्यास आळा बसावा यासाठी या परिचय मेळाव्याचे आणि वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यात दोनशे तरूण-तरुणी सहभागी झाले होते. अशी माहिती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजक काळू कोमास्कर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

 

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय संचालक पश्चिम विभाग प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.


अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पध्दतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र, अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.

या भेटीदरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन, यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई केकरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले

उर्वरित निर्वाह भत्ता लवकरच देणार – मंत्री संजय राठोड


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्या डॉ.मनिषा कायंदे यांनी शासकीय वसतिगृहातील समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री राठोड बोलत होते. मंत्री राठोड पुढे म्हणाले राज्यात मागासवर्गीय मुलामुलींचे ४४१ शासकीय वसतिगृहे असून मान्य विद्यार्थी संख्या ४३ हजार ३५८ इतकी आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात येतात. सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या पुरुष आणि महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी “संवाद” उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमामध्ये काही वसतिगृहातील गृहपालांविरुद्ध अनेक बाबी निदर्शनास आल्या. अशा गृहपालांना कारणे दाखवा नोटाला बजावून दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे. असे मंत्री संजय राठोड यांनी उत्तरात सांगितले.

वसतिगृहामध्ये फर्निचर साहित्य पुरवठ्यासाठी ५९ कोटी

राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा आणि साहित्य पुरविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाला ५९ कोटी ४३ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून वसतिगृहात लोखंडी कॉट, ड्युअल डेस्क, साग टेबल, कपाट आदी फर्निचर साहित्य पुरवठा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे असे मंत्री राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.

मागासवर्गीय वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी वर्ग

राज्यातील ३१ शासकीय वसतिगृहांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण ७ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आली असून दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे असेही राठोड यांनी सांगितले.

वसतिगृहातील विनाप्रवेशित विद्यार्थ्यांबाबत चौकशी

शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश नसलेले आणि वर्षानुवर्षे वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. वसतिगृमध्ये विनाप्रवेशित विद्यार्थी राहत असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांची इतरत्र राहण्याची सोय करण्याच्या सूचना देखील देण्यात येईल असे मंत्री राठोड यांनी उत्तरात सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.

हिवाळी अधिवेशनावर केले १०० कोटी खर्च – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दोन दिवसांपूर्वी, नागपूर हिवाळी अधिवेशनात आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार उजेडात आला. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावर एकूण किती खर्च केला जातो याचा खुलासा केला.

कपबशांच्या व्हिडीओनंतर अमोल मिटकरी यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये विधान भवन इमारत परिसरात असलेल्या शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि कापताना आढळले. त्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या सर्वांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जवळपास १०० कोटी रुपये आपण या हिवाळी अधिवेशनावर खर्च करतो. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे, त्यांच्या भल्याची कामे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच आम्ही काम करतो. पण कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा येथे येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसेल, तर ही गंभीर बाब आहे. नुकताच एक गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित यंत्रणा गंभीर झालेली दिसत नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.