Home Blog Page 61

कल्याण-शिळ रस्ता रुंदीकरण कामाने घेतला आणखी एका मोटारसायकल स्वाराचा बळी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण शिळ रोड रस्ता रुंदीकरण करताना कल्याण-शिळरोड वरील शंकरानगर, विलास स्मृती इमारतीच्या समोर सोनारपाडा, दिनांक १८/१२/२०२२ रोजी पहाटे ३:३३ मिनिटाने मोटारसायकलस्वार मनोज कुमार नामक व्यक्ती (राहणार डोबिवली, पलसर गाडी नंबर एमएच०५/सीडी-६९२८) याचा जागेवरच मृत्यू झाला. याच्या मृत्यूस कल्याण-शिळ रोड रूंदीकरण करण्याचे काम घेणारी ‘साकेत इंफ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. गुरुनामे व साईट इंजिनिअर श्री. कमलेश चौधरी हेच जबाबदार आहेत कारण ही जमीन रस्ता बाधित शेतकरी श्री.गणेश म्हात्रे यांच्या मालकीची असून सर्व्हे.नंबर ७७/२ या जमिनी मध्ये विनापरवागी प्रवेश करुन बेकायदेशीर खोदकाम करवून माती चोरून नेली याप्रकरणी दि.१७/१२/२०२२ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता ‘साकेत इंफ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. गुरुनामे व साईट इंजिनिअर श्री. कमलेश चौधरी यांची भेट घेऊन आपण केलेल्या कृत्याचा जाब विचारला असता जोपर्यंत जमीनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या मालकीची जमीनीत कुठलेही काम करु नये व आमच्या मालकीच्या जमीनीतुन माती घेऊन गेला आहात ती माती टाकून जमीन पुर्वरत करा अन्यथा रस्ता रोको अनंदोलन करण्यात येईल असे बजावत सज्जड इशारा श्री गणेश म्हात्रे यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिला होता.

त्यानंतर त्याच खोदकाम केलेल्या रस्त्यावर काही अंतर पुढे रात्रीची वेळी रस्ता बंद असल्याची कोणतीही सिग्नल यंत्रणा न लावल्यामुळे पुढे रस्ता खोदकाम माहिती होत नसल्याने मध्येच अचानक रस्त्यावर सिमेंट ब्लॉक रोडवर ठेवून त्याला रिबीन लावलेली होती त्यावर कुठलेही रेड लाईट अलर्टचा वापर नसल्याने रस्त्यावरील सिमेंट ब्लॉक अचानक समोर आल्याने हा दुदैवी अपघात झाला.

या संपूर्ण घटनेला जबाबदार ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा यामुळेच निष्पाप व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भारतीय दंड संहिता ३०४ नुसार गुन्हा दाखल करावा व जमिनीत बेकायदेशीर प्रवेश केल्याने व माती चोरून नेल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता ४४७ व ३७८ नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री गणेशजी म्हात्रे, सरचिटणीस श्री. जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष श्री. नवनीत म्हात्रे, खजिनदार श्री.महेंद्र म्हात्रे यांनी पोलीस व पालिका प्रशासनाकडे केलेली आहे.

तलवारीने हल्ला चढवत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण पेटले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची काल रणधुमाळी थांबली आहे. प्रचार संपताच अंतर्गत गटबाजी समोर आलेली पाहायला मिळाली आहे. बीडच्या दगडी शाहजानपूर इथे ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय.

पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याअगोदरच पोलिसांनी भाच्याला पकडले. त्यामूळे मोठी दुर्घटना टळली. प्राप्त माहितीनुसार, शिवाजीराव चव्हाण असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तलवारबाजी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मामा चव्हाण आणि भाचा जाधव या दोघांची भेट बीड येथील राजीव गांधी उद्यानासमोर झाली. शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला तेवढ्यात जवळच चौकात उभे असलेल्या दोन पोलीस हवालदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानी तलवार जप्त केल्याने अनर्थ टळला. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

शिंदे गटाचा शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयावर ताबा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर येथील विधिमंडळ पक्ष कार्यालयावर आज शिंदे गटाने रीतसर ताबा घेतला असून त्यातून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाला सिल ठोकण्यात आले होते. मात्र नागपूरच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला असून ठाकरे गटाला नवीन जागी जावे लागेल.

ठाकरे गटाला बराक क्रमांक पाच मधील पाच आणि सहा अशा खोल्या कार्यालयासाठी देण्यात आल्या असून त्यावर ते काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल, सोमवार पासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

महाविकास आघाडीचा निषेध महामोर्चा.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडीकडून भायखळा येथील रिचर्डसन ऍन्ड क्रूडास कंपनी ते आझाद मैदान असा प्रचंड महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएमसह अनेक बडे नेत्यांसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला गोलबोट लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ११ वाजता भायखळा येथील रिचर्डसन ऍन्ड क्रूडास कंपनी पासून सुरू झालेला हा मोर्चा जे.जे मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाईम्स ऑफ इंडिया मार्गी दुपारी आझाद मैदानात दाखल झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, सचिन अहिर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, वंचित चे ऍड प्रकाश आंबेडकर, भाकप चे कॉ. प्रकाश रेड्डी, माकपचे मिलींद रानडे इत्यादी नेते सहभागी झाले होते. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली “भगतसिंह कोश्यारी हटाव महाराष्ट्र बचाव व फुले-शाहू-आंबेडकरांचा विजय असो”, अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएमसह अनेक बड्या नेत्यांची भाषणे झाली.

 

बिल्कीस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. २००२ साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती.

या आधी बिल्किस बानो यांच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर बिल्किस बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांची केलेल्या विनंतीनंतर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील दोषींची चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचे गुजरात सरकारकडून सांगण्यात येत असताना एक मोठा खुलासा झाला होता. तुरुंगातून सुटका झालेल्या एका दोषाीविरोधात तो पॅरोलवर असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब समोर आली आहे.