Home Blog Page 60

‘जिओ’ कंपनीने लाँच केला १० हजार रुपयात ‘जिओ बुक’ स्वस्त लॅपटॉप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आतापर्यंत ‘जिओ’ कंपनी स्वस्त टेलिकॉम सेवांसाठीच सगळ्यांना माहिती असेल. आता ‘जिओ’ कंपनीने स्वस्त लॅपटॉप ‘जिओ बुक’ लाँच केला आहे. या लॅपटॉपची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, सध्या हा लॅपटॉप सर्वांसाठी उपलब्ध नाही.

‘जिओ बुक’ ची किंमत आणि जिओच्या स्वस्त ५ जी स्मार्टफोनची अनेक जण वाट पाहत असतील. या ब्रँडचे स्वस्त लॅपटॉपही अनेकदा बंद करण्यात आले आहेत. जिओ बुकची झलक यंदाच्या एजीएम मध्येही पाहायला मिळाली. आता कंपनीने गुपचूप आपला लॅपटॉप लाँच केला आहे. ‘जिओ बुक’ याच काळापासून लीक झालेल्या अहवालांचा एक भाग आहे.

कंपनीने स्वस्त किंमतीत लाँच केले आहे. तथापि, हे उत्पादन कोणत्याही सामान्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. जिओ बुकला सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) वेबसाइटवरून खरेदी करता येईल.

रिपोर्ट्स नुसार, हा ब्रँड ‘जियो बुक’ येत्या दिवाळीत हे प्रोडक्ट सर्व युजर्ससाठी लाँच करू शकतो. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. अपेक्षेप्रमाणे जिओचं हे प्रोडक्ट परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.

जीएसटी कौन्सिल ने निश्चित केली ‘एसयूव्ही कार’ची व्याख्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एसयूव्ही’ म्हणजे काय, याची एक मानक व्याख्या तयार केली आहे.

भारतात विकल्या जाणार्‍या कारच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी ‘एसयूव्ही’ हा एक प्रकार आहे. आत्तापर्यंत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ‘एसयूव्ही’ कशामुळे बनते याच्या वेगवेगळ्या व्याख्या होत्या ज्यामुळे ऑटोमेकर्स आणि कार खरेदीदारांमध्ये ‘एसयूव्ही’ म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो.

आता, स्वत:ला ‘एसयूव्ही’ म्हणवता येण्यासाठी कारची मानक आवश्यकता अशी आहे की, वाहनाची इंजिन क्षमता १५०० सीसी पेक्षा जास्त असावी, त्याची लांबी ४००० मिलिमीटर पेक्षा जास्त असावी आणि १७० ग्राउंड क्लिअरन्स असावा असे ठरविले गेले आहे.

एकनाथ शिंदेची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाणार ? बावनकुळेंचे सुचक विधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेनं चालल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यावर आता बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

वाबनकुळेंच्या त्या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून आता त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याबाबत बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे. एवढचं बोलून ते थांबलेले नाहीत तर यापुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आली आहे. असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच सध्याचे सरकार हे फेब्रुवारीपर्यतच असल्याचे सुचक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच आता बावनकुळे यांनी फडणवीस यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संत जगनाडे महाराज यांच्यावर आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना बावनकुळे म्हणाले, आता सर्व जातीच्या लोकांनी फडणवीसांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. येणाऱ्या आगामी निवडणूकांमध्ये पुन्हा कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित नागरिकांना विचारला होता. त्यावेळी लोकांकडून फडणवीस असे उत्तर आल्यानंतर बावनकुळेंनी आता आपण त्यांच्यापाठीमागे उभी राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

 

“मराठा आंदोलनातील केसेस मागे घेतल्या तसं ‘भीमा कोरेगाव’ प्रकरणातील केसेसही मागे घ्या”; रामदास आठवले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसवर भाष्य केलंय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार आहे. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या आंदोलकाच्या केसेस मागे घेतल्या तसंच भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस देखील मागे घ्या, अशी विनंती करणार आहे”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

“सभेला परवानगी द्या”

१ जानेवारीला भीमा कोरेगाव हा संघर्षशिल दिवस आहे. याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती. महार समाजाच्या इतिहासाची ती आठवण आहे. लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी तिथे जमतात. आधी फक्त आमची सभा तिथं होत असंत पण आता खूप जणांची होते. पण प्रशासनाने निर्णय घेतला आहे की त्या परिसरात आता सभा घेता येणार नाही तो योग्यच आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण बाहेर सभा घ्यायला परवानगी द्या, अशी मागणी आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही आठवले बोललेत. चंद्रकांतदादा राज्यातील सिनियर नेते आहेत. पण त्यांच्या या वक्तव्याशी कुणीही सहमत नाहीये, असं आठवले म्हणाले. चंद्रकांतदादांनी भीक हा शब्दप्रयोग केला. त्यामुळे लोकांना त्याबद्दल रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की ३०७ मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणं योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे, असंही आठवले म्हणाले.

मविआच्या महामोर्चावर आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी ही सध्या एकत्र आहेत. निवडणुकीदरम्यान एकत्र राहतील का नाही माहीत नाही. त्यांना आमदार सांभाळता आले नाहीत. म्हणून आता मोर्चे काढतात. राज्यपाल यांच्या वक्तव्यबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली आहे, असंही आठवले म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अल्पसंख्याक समुदायाच्या योजनांच्या पुस्तीकेचे प्रकाशन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॅा.अनुपकुमार यादव उपस्थित होते.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समूहांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थींना व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. पुस्तिकेत विविध योजनांची माहिती, लाभार्थींची पात्रता आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.