Home Blog Page 68

४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुणे व ठाण्याची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेला आज सुरवात झाली. या स्पर्धेत पुणे व ठाण्याने विजयी सुरवात केली.

साखळी सामन्याच्या कुमार गटात पुण्याने जालनाचा २२-८ असा एक डाव १४ गुणांनी पराभव केला. पुण्यातर्फे दिनेश म्हस्कर (३.२० मि. संरक्षण, व ३ गुण ), विनायक शिंगाडे (२.३० मी. संरक्षण, व १ गुण ) यांनी चांगला खेळ करत पुण्याला मोठा विजय मिळवून दिला.

मुली गटात ठाण्याने बीडवर १९-९ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. ठाण्याच्या धनश्री कंक (३ मि. संरक्षण), प्रीती बालगरे (३.२० मि. संरक्षण, व १ गुण ), कल्याणी कंक (५ गुण ) असा बहारदार खेळ केला. बीड तर्फे वैष्णवी ने (१ मि. संरक्षण ) एकतर्फी लढत दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. आदित्य तटकरे म्हणाले, “मैदान कौनसा भि हो हम साथ साथ रहेंगे | आता मोठ्या मैदानावर खेळायचं आहे. अनेकवेळा मातीची मैदान टर्फ ची होतं आहे. मातीत खेळण्याची मजा वेगळी असते. क्रिकेट प्रशासन गावोगावी गेलं. त्यामुळे तळातील मुलं पुढे आली. खेळ देशाला एकत्र ठेवण्याचं काम करू शकतो. राष्ट्रीय पातळीवर आपण चांगली काम करा असे आव्हान त्यांनी खेळाडूंना केले. महाराष्ट्र काय आहे, हे राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवून दाखवून द्या. तुम्ही वर्ल्डकप मिळवण्यासाठी लागणारी ताकत ठेवून खेळा, यश तुमचेच आहे. तुमच्या सर्वांची मेहनत तुम्हाला पदक मिळवून देणार आहे”.

यावेळी उद्योजक पुनित बालन, माजी मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड. गोविंद शर्मा, सुरेश मगर, अनिल नवघडे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन’च्या सहयोगी उपाध्यक्षपदी डॉ.चंद्रजित जाधव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी ‘खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया’चे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खो-खो पोचवण्यासाठी डॉ.जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. खो-खो मध्ये नाविन्यपुर्ण प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन’कडून घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी पत्राद्वारे डॉ. जाधव यांची सहयोगी उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. उस्मानाबाद जिल्ह्यातून खो-खो प्रशिक्षक म्हणून त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीला आरंभ झाला. ते स्वतः खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००९-२०१० चा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुध्दा मिळाला आहे.

उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. राज्य खो-खो असोसिएशनच्या सचिवपदी काम करत असताना खो-खो खेळाला वलय मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका आहे. खो-खो सह बेसबॉल, स्क्वॅश रॅकेट, स्विमिंग या खेळाच्या जिल्हा संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तवरावर खेळले आहेत.

देशातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ आणि महाराष्ट्रातील ‘शिव छत्रपती पुरस्कार’ही त्यांच्या खेळाडूंनी मिळवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे यशस्वीरित्या नियोजन केले जाते. क्रीडाक्षेत्रातील त्यांची कामगिरी बहारदार आहे. खो-खो चा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ.जाधव यांच्या निवडीनंतर खो-खो चे आधारस्तंभ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव ऍड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. अरुण देशमुख, माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

 

रोहा येथील ४८ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन व गटवारी जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ८) सायंकाळी ५ वाजता धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील संघ रोहा येथे दाखल झाले आहेत.

स्पर्धेसाठी पाच मैदाने बनविण्यात आली आहे. प्रकाशझोतात होणार्‍या सामन्यांचा थरार चार दिवस चालणार आहे. मुला-मुलींचे ४४ संघ, प्रशिक्षक, पंच व असोसिएशनचे पदाधिकारी दाखल होत आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सत्रात सोळा सामने होतील. त्यानंतर शुक्रवारी सकाळ आणि सायंकाळ सत्रात साखळी सामने होतील. ११ डिसेंबरला सायंकाळी अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. खो-खोचा थरार पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

खासदार सुनिल तटकरे, माजी क्रीडामंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील, श्री. कोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. आमदार अनिकेत तटकरे यांनी मैदानाची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चोविस जिल्ह्यांचे संघ संचलन करणार आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन हाईल. यावेळी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव एड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, उद्योजक पुनित बालन, मधुकर पाटील, सुरेश लाड, श्रीमती उमाताई मुंडे, सुरेश मगर, विनोद पाशिलकर, माजी सचिव संदिप तावडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली असून ती पुढील प्रमाणे आहे

कुमार गट :
अ – गट : अहमदनगर, औरंगाबाद, सातारा.
ब – गट : उस्माबाद, धुळे, जळगांव.
क – गट : ठाणे, परभणी, बीड.
ड – गट : सांगली, रायगड, हिंगोली.
इ – गट : पुणे, मुंबई, जालना.
फ – गट : मुंबई उपनगर, नंदूरबार, लातूर.
ग – गट : सोलापूर, नाशिक, नांदेड.
ह – गट : रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग

मुली गट :
अ – गट : उस्माबाद, रायगड, नंदूरबार.
ब – गट : नाशिक, पालघर, परभणी.
क – गट : पुणे, धुळे, जळगांव.
ड – गट : ठाणे, जालना, बीड.
इ – गट : सोलापूर, मुंबई, हिंगोली. फ – गट : सांगली, मुंबई उपनगर, लातूर.
ग – गट : सातारा, रत्नागिरी, नांदेड.
ह – गट : औरंगाबाद, अहमदनगर,  सिंधुदुर्ग

 

मुलींना मिळणार मोफत स्कूटी, अर्ज करा आणि २ दिवसात मिळवा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. एक काळ असा होता जेव्हा मुलींना फारसे लिहिण्या-वाचण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना घरची कामे करायला लावली जायची, पण आता काळ बदलला आहे. आणि आज मुली केवळ अभ्यासातच नाही तर नोकरीतही मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, आणि हळूहळू त्यांच्या पुढे जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, ज्याचा त्यांना थेट फायदा होत आहे. उत्तर प्रदेश सरकारची ‘राणी लक्ष्मीबाई योजना’ आहे, ज्याचा लाभ राज्यात राहणाऱ्या मुलींना लवकरच मिळणार आहे.

योजनेबद्दल जाणून घ्या

या योजनेचे नाव आहे ‘राणी लक्ष्मीबाई योजना’, जी सरकार लवकरच राज्यातील मुलींसाठी सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या योजनेची माहिती दिली होती.

खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याची गृहिणींसाठी खुशखबर !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खाद्यतेलाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. तसेच वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेलं आहे. मात्र अशातच सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोयाबीन तेलाचे ९०० एमएल चे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले.

हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रती पाऊचे दर १४२ रुपये होते. ते मंगळवारी १२७ रुपये झाले. संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो.

या डब्याचे दर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत २४०० रुपयापर्यंत गेले होते. ते मंगळवारी २५० रुपयांनी कमी होऊन २,१५० रुपयापर्यंत खाली आले. सर्वच खाद्यतेलात काही प्रमाणात पामतेल समाविष्ट केले जाते. त्याचे दर कमी अधिक झाले की सर्वच तेलांच्या दरामध्ये चढ-उतार होतात. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच तेलाच्या दरात वाढ सुरू होती. आता ते पहिल्यांदाच घसरले आहेत.