Home Blog Page 78

राज्यपालांच्या विधानावर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याची प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी केले आपले मत व्यक्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरगांबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यपालांनी बोलताना जुन्या काळातील आदर्श हे शिवाजी महाराज होते तर आजच्या काळातील आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी आहे असे म्हटले होते. प्रसंगी राज्यपालांनी शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले आहे. अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या विधानावर निषेध नोंदविला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी नुकतीच ‘अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०२२’ च्या समारोपाला पुणे येथे हजेरी लावली होती त्यावेळी राज्यपालांच्या विधानावर सूचक मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा आदर्श नाही. ते सर्वांचेच आदर्श आणि प्रेरणा आहेत. महाराजांच्या शौर्याची आणि कार्याची माहिती सर्व देशाला आहे, राज्यपालांना देखील त्यांच्याविषयी चांगली माहिती आहे. राज्यपालांच्या मनात कुठलीही शंका नाही, मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानाचा विनाकारण विपर्यास करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.” अशा प्रकारे राज्यपालांच्या विधानावर फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपले मत मांडले आहे. पोलीस बदल्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, जे अधिकारी बदलीस पात्र आहे त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत, बाकी बदल्या या अद्याप झाल्या नाही. सर्व बदल्या आजवर नियमांनुसार झाल्या आहेत.

एकंदरतीच राज्यभर राजकीय वर्तुळातून गेल्या दोन दिवसांपासून राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने जी खळबळ माजली होती, त्याला उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण देताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न दिसून आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील फडणवीसांच्या सारखेच विधान केल्याने सत्ताधारी नेत्यांकडून या प्रकरणी राज्यपालांची पाठराखण करण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचे जाणवत आहे.

 

केंद्रीय पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र दौरा सुरु; महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची होणार पुनर्रचना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात पुणे शहरापासून करण्यात आली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र समन्वयक नितीन पुंडे यांची भेट घेतली. पुणे शहरातील विधानभवान येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही महत्वाच्या पत्रकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. या वेळी ‘लोकमत’चे उत्तम पाटील, ‘पुण्यनगरी’चे नितीन पाटील, ‘इंडिया २४ तास’चे नितीन पुंडे, ‘मेकिंग महाराष्ट्र’चे चेतन शिंदे, ‘बारामती टाइम्स’चे मन्सूर शेख, ‘शेतकरी योद्धा’चे योगेश नालांदे, ‘विशाल संविधान’चे श्रीपती खंडागळे, ‘पोलीस वॉरंट’चे संतोष साळवी आणि ‘खादी एक्स्प्रेस’चे अरविंद वाघमारे उपस्थित होते. सभेदरम्यान पत्रकारांना पत्रकारिता करताना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच पत्रकारांच्या आर्थिक विकास हेतू एका नवीन प्रकल्पाची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली.

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन हि एक राष्ट्रीय संघटना असून संपूर्ण भारतात या संघटनेबाबत जागरूकता करून पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्याचा तसेच त्यांना संघटीत करण्याचा मानस असल्याचे संदिप कसालकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे लवकरच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना करण्यात येणार असून फक्त प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामधीलच पत्रकारांचा या संघटनेत सहभाग असेल असेही विधान राष्ट्रीय अध्यक्षांनी यावेळी केले आहे. सोबत केंद्रीय पत्रकार संघटनेच्या नावाने काही बनावट संघटना या महाराष्ट्रात कार्यरत असून, पत्रकारांनी अश्या संघटनांपासून सावधान रहावे तसेच अश्या संघटनांविषयी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करावे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे ‘केंद्रीय पत्रकार संघ’ (CPJA) च्या लीगल सेल विभागातर्फे तर्फे सांगण्यात आले आहे.

 

५५ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झाली. आज झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही सामने मॅटवर झाले.

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळविला. यात सुयश गरगटे २:२० मिनिटे संरक्षण व ५ गुण मिळवत अष्टपैलू खेळी केली. रामजी कश्यपने ३:२० मिनिटे संरक्षण करताना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे सांभाळली. निहार दुबळेने आपल्या धारदार आक्रमणात ४ गुण मिळवले. मध्यप्रदेश कडून विवेक यादव व सागर यांनी प्रत्येकी २-२ गुण मिळवत एकाकी लढत दिली.

महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने धुवा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने तेलंगणा विरुद्ध ७ गुण मिळवताना विजयाची पायाभरणी केली. रेश्मा राठोडने (२:१० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळ केला तर रूपाली बडे व दिपाली राठोड (प्रत्येकी २:५० मि. संरक्षण) व अपेक्षा सुतार (२:४० मि. संरक्षण) यांनी महाराष्ट्राला मोठा विजय मिळेल याची काळजी घेतली. तेलंगणाच्या कृष्णम्माने दिलेली अष्टपैलू लढत अपुरी पडली.

कोल्हापूर व गतविजेत्या रेल्वेचे शानदार विजय

अन्य एका मराठी खेळाडूंचा भरणा असलेल्या पुरुषांच्या सामन्यात गतविजेत्या रेल्वेने मणिपूरला १३-११ असे डावाने पराभूत केले.

कोल्हापूरच्या पुरुष संघाने सुद्धा उत्तर प्रदेशवर १५-१० असा डावाने विजय मिळविला. कोल्हापूरच्या आदर्श मोहितेने आपल्या धारदार आक्रमणात आठ गुण मिळवत १:३० मिनिटे सरक्षणाची खेळी केली, अविनाश देसाईने (२:१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी केली. रामेश्वर यादवने १ मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले.

अन्य निकाल : महिला
तामिळनाडू वि.वि. पुदूचेरी १३-५, पश्चिम बंगाल वि.वि. झारखंड १८-८ डावाने, गुजरात वि.वि. मध्यभारत १०-५ डावाने, केरळ वि. वि. दादरा नगर हवेली २६-१ डावाने, मणिपूर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस १०-७ डावाने, भारतीय विमान प्राधिकरण वि.वि.मध्य प्रदेश १७-१४, कर्नाटक वि.वि. छत्तीसगड ११-५ डावाने, हरियाणा वि.वि. हिमाचल प्रदेश २४-४ डावाने.

अन्य निकाल : पुरुष
कर्नाटक वि.वि. झारखंड १२-७ डावाने, दादरा नगर हवेली वि.वि.अरुणाचल प्रदेश १७-१४, जम्मू काश्मीर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस २५-७ डावाने, तेलंगणा वि.वि. गोवा १७-८ डावाने, तामिळनाडू वि.वि. पंजाब १५-१३ डावाने, आंध्र प्रदेश वि.वि. राजस्थान १२-११ (७.२० मिनिटे राखून), ओरिसा वि.वि. सीमा सुरक्षा बल १३-१२ (६.३० मिनिटे राखून).

 

सत्र न्यायालयाकडून सचिन वाझेला जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ऍन्टिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.

तर दुसरीकडे ‘ईडी’ने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती.

आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान ‘ईडी’ला सांगितलं होतं.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सचिन वाझे याच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ‘ईडी प्रकरणात वाझेला अटक करण्यात आलेली नाही असं सांगत वाझे पुराव्यांशी छेडछाड किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमी वकिलांनी न्यायालयाला दिली.

सत्र न्यायालयाने वाझे यांना जामीन मंजूर केला मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे असे नोंदवले.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यावरून महाविकास आघाडी धोक्यात – खासदार संजय राऊत


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘भारत जोडो’ यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, मात्र भाजपा यावरून राजकारण करीत आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.