Home Blog Page 85

चंद्र, सूर्य आणि शुक्राविषयी सखोल संशोधनासाठी नव्या भरारीची तयारी करत ‘इसरो’चं नवीन मिशन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आता शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासाच्या तयारीत भारताला चंद्राविषयीची सखोल माहितीही मिळेल. भारत शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासासाठी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणार आहे. ‘इसरो’च्या नवीन मिशनबाबत गुजरातमधील अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक डॉ.अनिल भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, भारत आकाशातील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. १९७५ मध्ये आर्य भट्ट या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर, भारताने अंतराळ विज्ञानात वेगाने प्रगती केली आणि स्वतःचे प्रक्षेपण केंद्र बांधले. आमची चंद्रयान आणि मंगळ मोहीम यशस्वी झाली आहे. भविष्यात आम्ही शुक्र आणि सूर्य ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आमचे तंत्रज्ञान विकसित करणार आहोत. जपानच्या ‘एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ म्हणजेच जाक्साच्या सहकार्याने, आम्ही चंद्राच्या गडद ठिकाणी ‘मून लेन्सर’ आणि ‘रोव्हर’ ठेवण्याच्या मोहिमेवर वेगाने काम करत आहोत. या मिशनबाबत जपानच्या ‘एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’सोबत बोलणी सुरू आहेत.

शुक्र आणि सूर्य ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ‘इसरो’ ‘जाक्सा’सह करणार हातमिळवणी

उत्तरांचल विद्यापीठात आयोजित ‘आकाश तत्व’ या राष्ट्रीय चर्चासत्रात शेवटच्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांनी आकाशाविषयी विविध पैलूंवर आपली मते मांडली. डॉ.अनिल भारद्वाज म्हणाले की, ‘इसरो’ जपानच्या सहकार्याने चंद्रावरील न उलगडलेले रहस्य शोधण्याचे काम करत आहे. ‘आदित्य एल-वन मिशन’वरही वेगाने काम केले जात आहे. अमेरिकेतील जॉर्ज मेसन विद्यापीठाचे प्रा. जे. शुक्ला यांनी हवामान बदल आणि हवामान अंदाजाची सद्यस्थिती सांगितली.

सूर्याच्या आत चालू असलेल्या क्रियाकलापांचे परिणाम डीआरडीओ शास्त्रज्ञ अंकुश कोहली यांनी भारतावर पर्यावरणीय बदल आणि विविध भू-आधारित तंत्रज्ञानाच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

आयआयटी मुंबई प्रा. गीता विचारे यांनी सूर्याच्या आत चालू असलेल्या क्रियांमुळे प्लाझ्माच्या रूपात मोठ्या प्रमाणात रेडिएशन आणि चार्ज केलेले कण आढळून आल्याने सौर वाऱ्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो, याचा भाष्य केले. त्या म्हणाल्या की, त्यात इतकी ऊर्जा आहे की ते आपली कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस, ऑइल प्लांट, इलेक्ट्रिक ग्रीड यांसारख्या यंत्रणा नष्ट करू शकते.

‘नासा’चे शास्त्रज्ञ डॉ.एन.गोपाल स्वामी यांनी सूर्यावरील जगभरातील संशोधन आणि सूर्यावर घडणाऱ्या घटनांचे पृथ्वीवर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

नासिकरोड पोलीसांनी मुंबईहून ट्रेन ने पळून जाणाऱ्या चोरट्यास केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईहून ट्रेन ने पळून जाणाऱ्या चोरट्यास नासिकरोड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पायधूनी पोलीस स्टेशन मुंबई भादंवी कलम ४०८ अनुसार गुन्ह्यातील आरोपी संदीप अशोक कुमार शुक्ला (वय ३२) रा. गोंडा, उत्तर प्रदेश हा २८ लाख रुपये रोख घेऊन पळाला असुन तो ट्रेनने जात असल्याची माहिती पायधूनी पोलीस स्टेशन कडून नासिक रोडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाली. अनिल शिंदे यांनी त्वरित गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना सूचना दिल्या. अंमलदार शिंदे, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे यांनी त्वरित पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस मध्ये जीआरपी इगतपुरी चे पोलीस अंमलदार योगेश पाटील यांच्याशी संपर्क करुन आरोपीची माहिती दिली आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकात गाडी पोहोचताच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलीसांना बघून नागरिक घाबरून हैराण झाले, काय झाले ते लोकांनां समजेना, पोलीसांना बघून आरोपी पळत सुटला तेवढ्यात पोलीसांनी त्याला शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले. आरोपी संदीप शुक्ला याच्या कडे चोरी केलेले संपूर्ण २८ लाख रुपये पोलीसांना मिळाले आहेत. पायधूनी पोलीस ठाण्यात याबाबत नासिक रोड पोलीसांनी कळवले असुन पायधूनी पोलीस ठाण्यातील पथक आल्यावर आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरक्षक यांनी केलेल्या त्वरित हालचालींमुळे आरोपीला पकडण्यास यश आले असे प्रसिद्धी माध्यमांना आले आहे.

 

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात दाखल होणार; स्वागतासाठी मोठे नेते उपस्थिती लावणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या अनेक महिन्यांपासून देशांच्या विविध राज्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ आज ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्या तेलंगणा मध्ये असलेली ही यात्रा तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेनजीक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून इथून पुढे राज्यातील इतर जिल्ह्यात ही पदयात्रा जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हुसेन दलवाई, सचिन सावंत, नसीम खान बाळासाहेब थोरात, मोहन जोशी इत्यादी नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजेरी लावणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा १४ दिवस प्रवास करणार असून, सध्या नांदेडच्या देगलूर येथे या निमित्त जय्यत तयारी करणे सुरु आहे. पदयात्रेच्या सुनियोजनानूसार महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशीम इत्यादी जिल्ह्यातून ही यात्रा पुढे जाणार असून यानंतर पुढील प्रवासाकरिता मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करणार आहे. आज राहुल गांधी यांचा मुक्काम नांदेडच्या देगलूर मध्ये राहणार असून अनेक मोठे नेतेमंडळी त्यांची भेट घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदित्य ठाकरे, राज्य प्रभारी एच. के. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे हेदेखील या यात्रेत सहभागी होणार आहे परंतू या नेत्यांच्या नेमक्या तारखेबाबत अद्याप स्पष्टपणे माहिती पुढे आली नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील पदयात्रेत समावेश होणार असल्याची स्पष्टोक्ती अशोकराव चव्हाण यांनी दिली. एकंदरीतच राज्याचे राजकीय वातावरण राहूल गांधी यांच्या पदयात्रेने ढवळून निघणार असून महाविकास आघाडी नेते यानिमित्ताने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची संधी साधताना दिसणार आहे.

 

महाविकास आघाडी पक्षाचे १२ ते १३ आमदार संपर्कात असल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला बॉम्ब..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. तर, महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला, असा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक दावाही केला.

मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, याउलट महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. भाजप आणि शिंदे यांच्याकडे १७० चा आकडा असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. महाविकास आघाडीत काय समाविष्ट होणार, हे आज उघडकीस आले आहे. सध्या लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यावर मी खोके घेतले होते का ? असा थेट प्रतिप्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला आहे.

 

आमच्या सोबत केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयारच होतो; फडणवीसांचा धक्कादायक खुलासा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही फक्त संधी शोधत होतो. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयार होतो, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना सोडू इच्छित असल्याचे आम्हाला समजले. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आमच्यासोबत झालेली बेईमानी, उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही संधी शोधतच होतो. आम्ही संत नाही, नेते आहोत. जर ते आमच्याशी अप्रामाणिक असतीलल तर आम्ही त्याला उत्तर देऊच. माझ्यासोबत झालेल्या बेईमानीचा बदला मी घेतला, असा खुलासा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्ही बाहेर पडणे चांगले आहे, आम्हालाही आमचा बदला हवा आहे. त्यानंतर अनेक घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेचे संपूर्ण श्रेय उद्धव आणि आदित्यजींना द्यावे लागेल, असे म्हणत शिंदे यांच्याशी केलेल्या वागणुकीमुळे त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला, असा टोमणाही त्यांनी मारला.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यावर सवाल केला की, “मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर तुम्ही सरकारमध्ये दुसरे कोणतेही पद घेतल्यास तुम्ही सत्तेचे भुकेले आहात, अशी तुमची प्रतिमा बनते. पण आपण खुर्चीसाठी नाही तर परिवर्तनासाठी सत्ता बदलली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता हा बदल करण्यात आला आहे. म्हणूनच मी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला समजावून सांगितले की त्यांना महाराष्ट्रात सरकार चालवायचे आहे आणि त्यासाठी माझी गरज आहे, म्हणून मी हो म्हणालो.” अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.