Home Blog Page 87

राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आता चार आठवडे लांबणीवर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुनावणी आता किमान चार आठवडे लांबणीवर पडली असून ती २९ नोव्हेंबर नंतर होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडे दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकत्रित सुनावणीचे मुद्दे सादर करण्यासाठी तीन आठवड्याची मुदत मागितली होती.

त्याआधी कोर्टाने दोन्ही बाजूने एकत्रित बसून सुनावणीचे मुद्दे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर दोन्ही बाजूने वेळ मागण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाने २९ नोव्हेंबर पर्यंत हा अवधी दिला आहे. तोपर्यंत एकत्रित मुद्दे कोर्टासमोर सादर होतील आणि त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख न्यायालय निश्चित करेल, त्यामुळे ही सुनावणी आता पुढील महिन्यात नाताळ सुट्टी आधी होते की नंतर ते पाहावे लागेल.

हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला कोळसेवाडी पोलीसांनी दिला चोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कल्याण सूचक नाका परिसरात आलिया दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये २५ तारखेला सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान या परिसरातील बाबू नसीम शेख उर्फ बाबू जंगली नावाच्या गुन्हेगारानी मोफत जेवण घेण्यासाठी हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला.

हॉटेल चालकांनी या गुन्हेगारांचा काटा काढण्यासाठी युक्तीचा उपयोग करत या गुन्हेगारांना मोफत जेवण दिले. आरोपी चाकू दाखवून धमकावत असल्याचे पोलीसांना सांगितले. व्यापाऱ्याची तक्रार येताच कोळसवाडी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन या आरोपाची चौकशी केली.

आरोपीकडून धारदार हत्यार पोलीसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि परिसरात या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी कोळसेवाडी पोलीसांनी हॉटेल बाहेरच या आरोपीची चांगलीच धुलाई केली. वारंवार पोलीसात तक्रार देऊन फक्त दिखावाची कारवाई पोलीसांकडून होत आहे. प्रत्येक वेळी हा आरोपी दोन दिवसात सुटून येऊन पुन्हा परिसरात दहशत माजवत असल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या पोलीसांनी या आरोपीवर हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

 

ग्राहकांना दोन लाखांपर्यंत होणार फायदा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तुमचे कोणत्याही बँकेत खाते असल्यास, तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मात्र खरे आहे. अनेकांना याची खरी जाणीव नसते. हा फायदा कोणाला आणि कसा मिळेल, याबाबतची माहिती.

तुमचेही बँक खाते असल्यास, तुम्ही दोन लाख रुपयांचा लाभ मोफत घेऊ शकता. जनधन ग्राहकांना बँकेकडून ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना दोन लाखांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. याशिवाय ग्राहकांसाठी आर्थिक सेवा, बँकिंग बचत, क्रेडिट, विमा, पेन्शन अशा अनेक सुविधा आहेत.

जनधन खात्याचे फायदे

* सहा महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा
* दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा कव्हर
* ३० हजार रुपयांपर्यंत लाइफ इन्शुरन्स कव्हर, लाभार्थीच्या मृत्यूनंतर अटी आणि शर्थी पूर्ण करणाऱ्याला ते पैसे मिळतात.
* डिपॉझिटवर व्याज मिळतात
खात्यासह मोफत मोबाइल बँकिंगची सुविधाही दिली जाते.
* जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तीला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, जेणेकरून त्याला खात्यातून पैसे काढता येतील किंवा खरेदी करता येईल.
* जनधन खात्याद्वारे विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे.
* जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रम योगी मानधनसारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाईल.
* देशभरात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा
* सरकारी योजनांच्या लाभाचे पैसे थेट खात्यात येतात.

असं सुरू करता येईल खातं

तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन ते अगदी सहज उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित व्यक्ती, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, पिन कोड इत्यादींची माहिती द्यावी लागेल.

ट्रान्सफर करण्याचाही पर्याय

तुमच्याकडे मूलभूत बचत खाते जन धन योजनेत हस्तांतरित करण्याचा पर्यायदेखील आहे. जन धन योजनेत खाते असलेल्यांना रूपे कार्ड मिळते. २०१८ पर्यंत या खात्यावर विम्याची रक्कम एक लाख रुपये होती. आता ती वाढून दोन लाख रुपये झाली आहे. या खात्यावर ग्राहकाला अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे.

मिरा-भाईंदर शहरात होणार महाराष्ट्रातील पहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन!

ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असणारे वारकरी संप्रदायाचे भवन मिरा-भाईंदर शहरात तयार होणार असून या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भावनांचा भूमिपूजन सोहळा 03 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात संपन्न झाला.

सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मन ओपस सुविधा क्षेत्र भूखंडावर महाराष्ट्रातील पाहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवनाचे निर्माण करण्यात येणार असून पुढील वर्षभरात या भवनाचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपच्या आमदार गीता जैन, आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मनोरकर त्याच बरोबर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मिरा-भाईंदर शहरातील वारकरी संप्रदायाचे अनेक मान्यवर, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह याठिकाणी उपस्थिती दर्शवली. या ठिकाणी अंदाजे 2000 ते 2200 इतक्या वारकरी सांप्रदाय नागरिकांच्या उपस्थितीत ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचा हरीभक्ती कीर्तनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाने संपन्न झाला.

कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी महाराष्ट्रात प्रथमच स्थापन होत असलेले वारकरी भवनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत मिरा भाईंदर शहरातील वारकरी सांप्रदायाला या वास्तूचा भविष्यात मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे महाराजांनी नमूद केले.

ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी वेळात वेळ काढून मिरा भाईंदर शहराच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सर्वप्रथम वारकरी भवन भूमिपूजन कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवली यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपस्थित नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वेळात वेळ काढून संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

उत्तनच्या समुद्रात सापडला दुर्मिळ वाघ्या जातीचा तब्बल 100 किलो वजनाचा पाकट मासा!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमेकडील उत्तन भाटेबंदर येथे अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा वाघ्या जातीचा पाकट मासा मच्छिमारांच्या गळाला लागला असून त्यांचे वजन तब्बल 100 किलो एव्हढे असल्याचे बोलले जात आहे.

उत्तनच्या भाटे बंदर येथील एका इंजिन नसलेली लहान बोट जी फक्त वल्ले मारून खडकामद्ये मिळणारी #lobster (शिवंड) पकडण्यासाठी समुद किनाऱ्या पासून अर्ध्या ऐक तास अंतरावर सकाळी ६ वाजता जाते आणि 9 वाजता परत येते. या लहान बोटीतून समुद्रामध्ये ज्या ठिकाणी उथळ पाणी आणि चिखल असतो अशा ठिकाणी गळ टाकून मासेमारी केली जाते. त्या मच्छिमारांच्या गळाला हा भला मोठा वाघ्या जातीचा पाकट मासा लागला आहे.

ज्या बोटीतून हे मच्छिमार गेले त्या बोटीचे नाव एकवीरा आई आहे तर बोटीच्या मालकाचे नाव सुनील असून तो आणि त्याचा भाऊ हे दोघे दोन दिवसांपूर्वी सकाळी मच्छीमारीसाठी गेले असताना त्यांना हा दुर्मिळ पाकट मासा गळाला लागला.

वाघ्या पाकट हा क्वचित सापडणारा मासा आहे. त्याचा रंग गडद तांबडा असतो आणि त्याच्या अंगावर वाघाच्या कातडी सारखी आकृती असते म्हणून त्याला स्थानिक मच्छीमारांच्या भाषेत वाघ्या पाकट बोलले जाते. या माशाचे वजन जवळपास 100 किलो असल्याचे बोलले जात आहे तर बाजार भावानुसार त्याची किंमत अंदाजे पाच ते सात हजार भरेल असे बोलले जात आहे.

उत्तनच्या समुद्रात कमी खोलीच्या पाण्यात पहिल्यांदाच हा वाघ्या पाकट जातीचा आणि जवळपास 100 किलो वजनाचा हा दुर्मिळ मासा मच्छीमारांच्या गळाला लागल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.