Home Blog Page 99

हे सरकार धनदांडग्यांचे; अंबादास दानवे यांची टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सरकार हे बोलाची कडी आणि बोलाच भात आहे. कोट्यवधीची घोषणा सरकार करत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही अजून जमा झाला नाही, हे सरकार धनदांडग्यांचे आहे, गुजरातला मदत करणारे आहे. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्याचे सरकार स्थगितीचे सरकार आहे, यामुळे जनतेच्या कामाचा विकास थांबला आहे. जनतेची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

तुम्ही सुद्धा काय काय गमावलं हे चेक करा, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर कसे आले हे चेक करा आणि तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचं बघू असे खडेबोल सुनावत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर दिलंय.

अब्दुल सत्तार ही विकृती आहे, ते कुठेही जातील तिथे असेच वागतील, असा टोला दानवे यांनी सत्तार यांच्या पीए च्या झालेल्या वादावर लागवलाय.

 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज ८२ व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. मागील महिन्यात त्यांना रक्तदाबाच्या विकाराने ग्रासल्याने दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला होता. मुलायम सिंह यादव हे अगदी तरुण वयात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाले. प्रदेशामध्ये नेताजी या नावाने परिचित असलेल्या मुलायम सिंह यांनी १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केली. आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. १९८९, १९९३ आणि २००३ असे तिन वेळा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या निधनामुळे देशातील समाजवादी विचारांनी राजकारणाची मांडणी करणाऱ्या एका मोठ्या चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत आहेत. अखिलेश यांनी २०१२ मध्ये देशातील सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून वयांच्या ३८ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

‘मशाल’ निवडणूक चिन्हं ठाकरेंची तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाची..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना तात्पुरते मशाल हे चिन्हं दिले असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे पक्षाचे नाव दिले आहे तर निवडणूक चिन्हं कोणाचे ते उद्यापर्यंत म्हणणे मांडा असे सांगितले.

शिवसेनेतील अंतर्गत भांडणामुळे दोन दिवसांपूर्वी धनुष्यबाण चिन्हं आयोगाने गोठवले तर शिवसेना हे नाव वापरण्यास ही बंदी घातली होती.आज दुपारी बारा पर्यंत नवीन नावे आणि चिन्हं सुचविण्यासाठी सांगितले होते.

त्यानुसार ठाकरे आणि शिंदे गटाने आपली नावे आणि चिन्हे सुचवली होती, त्यानुसार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नाव ठाकरे गटाला देण्याचे मान्य करीत मशाल हे चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा आदेश आयोगाने संध्याकाळी उशिरा जाहीर केला आहे.

शिंदे गटाने सुचवलेले एकही चिन्हं आयोगाने मान्य केले नसून आणखी चिन्हे सुचविण्यासाठी सांगितले आहे, मात्र पक्षाचे नाव म्हणून बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यास मान्यता दिली आहे.

त्रिशूळ आणि गदा ही चिन्हं आयोगाच्या यादीत नाहीत , तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडू च्या द्रमुक पक्षाचे चिन्हं आहे त्यामुळे ही सर्व चिन्हं आयोगाने नाकारली आणि मशाल हे चिन्हं पुढील आदेशपर्यंत वापरण्यास ठाकरे गटाला परवानगी दिली आहे मात्र शिंदे गटाने आणखी चिन्हे सुचावावित असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

‘इनडोअर क्रिकेट’ विश्वचषकात भारताचा इंग्लंडवर २९ धावांनी विजय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिडनी येथे सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा २९ धावांनी पराभव करून विजयी प्रारंभ करून दिला. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ९९ धावा केल्या तर इंग्लंडला ७० धावाच करता आल्या.

भारताच्या १६ षटकांच्या सामन्यात पहिल्या ४ षटकात पहिल्या जोडीला फक्त ६ धावाच करता आल्या (बाद झाल्यावर प्रत्येक वेळी ५ रन वजा होतात). मात्र नंतरच्या तीन जोड्यांनी अनुक्रमे ३०, २९ व ३४ धावांची भर घातल्याने भारताला ९९ धावांचा पल्ला गाठता आला. तर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या चार जोड्यांना अनुक्रमे १९, १५, १६ व २० धावांवर रोखल्याने भारताला मोठा विजय साजरा करता आला. इंग्लंड फलंदाजीच्या वेळी दुसर्‍या व तिसर्‍या चार-चार षटकात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना १५ व १६ धावांवर रोखले हाच भारतीय विजयाचा टर्निंग पॉइंट ठरला. या षटकांदरम्यान भारतीय क्षेत्ररक्षण कमालीचे चपळ व दक्ष वाटले.

भारता तर्फे दैविक राय (१) व यतीश चन्नाप्पा (५) हि सलामीची जोडी खेळायला उतरली पण या जोडीला काही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१०) व अफ्रोज पाशा (२०) तिसऱ्या जोडीतील गिरीश गोपाल (९) व नमशीद व्हि. (२०) आणि शेवटच्या जोडीतील अरिज अजीज (१६) व सुरज रेड्डी (१८) यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने मोठा विजय संपादन केला.

इंग्लंडच्या पहिल्या जोडीमधील जायडेन शाॅर्ट (९) व माइक गॅलर (१०) दुसऱ्या जोडीमधील नातं रिमिंगटोन (६), टॉम क्लार्क (९), तिसऱ्या जोडीतील मॅट गेलर (२०) लिम ब्रेजर (-४) तर शेवटच्या जोडीतील नव पटेल (१७) व ऑलिवर ग्रीन (३) यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही.

भारताच्या सुरज रेड्डीने तीन फलंदाज बाद केले, तर अफरोज पाशा, गिरीश गोपाल व दैविक राय यांनी प्रत्येकी दोन-दोन फलंदाजांना बाद केले. या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून भारताच्या सुरज रेड्डी ला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

डोंबिवलीतील भोपरच्या खदाणीमध्ये दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील भोपर गावात असणाऱ्या खदाणीमध्ये बुडून दोघा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. आज सकाळी हा प्रकार घडला असून काही मुलं या खदाणीमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. चार मुलांना बाहेर काढले. तर दोघा मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खदाणीबाहेर गावकऱ्यांची गर्दी झाली असून हळहळ व्यक्त झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

डोंबिवलीजवळील भोपर गावातल्‍या गावदेवी मंदिरामागे असणाऱ्या या खदाणीत आयरे गावातील पाच सहा मित्र पोहायला उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले आणि त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. ज्याचा आवाज ऐकून काही गावकऱ्यांनी खदाणीजवळ धाव घेतली. भोपर गावातील खदणीत बुडून दोघे बुडाले तर तिघांना वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.