Home Blog Page 115

दुर्लक्षित मतिमंद मुलांच्या शाळेला ‘टीम आम्ही गिरगांवकर’च्या मदतीचा हाथ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शैक्षणिक सायकल स्वारी ह्या मथळ्याची बातमी ८ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये छापून आली होती, त्याला समाजातील दानशूर व्यक्तींचा उत्तम पाठिंबा मिळाला. पेण येथील ‘सूहित जीवन ट्रस्ट’ शाळेतील मतिमंद मुलांच्या शाळेत वरीलपैकी ५ सायकल २४ सप्टेंबर रोजी सुपूर्द करण्यात येणार आहेत. ह्यावेळी शाळेच्या साफसफाई करीता लागणारे वर्षभराचे साहित्य देखील शाळेच्या स्वाधीन करण्यात येईल. सदर मतिमंद मुलांच्या एका वर्षाकरिता शालेय पोषण आहारासाठी आवश्यक असलेले ८०० किलो तांदूळ, २५० किलो गहू ह्यासह सर्व प्रकारच्या डाळी, साखर, कडधान्य, तेल, तिखट- मीठ मिळून अंदाजे २१०० किलो अन्न धान्याची आवश्यकता आहे.

सदर धान्यांची पूर्तता ‘टीम आम्ही गिरगांवकर’ तर्फे करण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच ह्या सत्पात्री शैक्षणिक कार्यात अन्नधान्याची किंवा इतर स्वरूपात मदत करण्याची ईच्छा असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘टीम आम्ही गिरगांवकर’ तर्फे संस्थेच्या मार्फत करण्यात आले आहे.

संपर्क:-
मिलिंद वेदपाठक:- ९८२०७९५५८०
शिल्पा नायक:- ९८३३४३०१९४
दिपक राजपुरकर:- ८३६९८३०३८४

तरुणांनी ‘पोलीस भरती झालीच पाहिजे !’ म्हणत उपमुख्यमंत्र्यांसमोरच केली जोरदार घोषणाबाजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रखडलेली भरती पूर्ण करावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांची भेट घेऊन काहीही न बोलता निघून गेले. विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने पोलिसांनी येथे घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना घेराव घातल्याचे दिसून आले.

दरम्यान, नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना या दिवशी आरोप करून दिवसाला महत्त्व देऊ नका, असे सांगितले. हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल. औरंगाबादमध्ये नेहमीच्या वेळेपूर्वी ध्वजारोहण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचा अवमान केल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

“हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याची काही हौस नाही. आजच्या दिवशी राजकारण करू नये.” असे देवेंद्र फडणवीस येथे बोलताना म्हणाले.

टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती; अवघ्या २२५ रुपयात लाईफटाईम वैधतामुळे जिओनेही ‘या’ प्लॅनपुढे टेकले हात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता दर महिन्याला रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असून तीन महिने किंवा सहा महिन्याच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन करण्यापेक्षा अनेकांना असे वाटते की, लाईफटाईम वैधतेचा रिचार्ज प्लॅन असायला हवा. परंतु, टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लॅन उपलब्ध नाही. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लॅन नसला तरी असा प्लॅन सध्या फक्त एकाचं कंपनी देत आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एमटीएनएल’. या कंपनीच्या २२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्संना लाईफटाईम वैधता मिळते.

एमटीएनएल कंपनी देतेय असा प्लॅन

हो, तुम्ही जे ऐकलं आहे ते खरंच आहे. या प्लॅनमध्ये एमटीएनएल अनेक फायदे देत आहे. एमटीएनएलचा २२५ रुपयांचा प्लॅन यूजर्ससाठी खुपचं मस्त आणि किफायतशीर आहे. जाणून घ्या या प्लॅनसंबंधी सविस्तर माहिती.

‘एमटीएनएल’ कडून २२५ रुपयात अनेक फायदे

या प्लॅनची किंमत २२५ रुपये आहे. यात यूजर्संना एकदा रिचार्ज केल्यानंतर लाईफटाईम दिलासा मिळणार आहे. यात सिम आणि अकाउंटची वैधता लाईफटाईम आहे. यासोबतच १०० मिनिट कॉलिंग मोफत दिली जाते. व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति सेकंद ०.०२ पैस या दराने चार्ज केले जाते तसेच एसटीडी कॉलसाठीही हाच चार्ज केला जातो.

‘व्हीआय’ (वोडाफोन आयडिया) कंपनीचा प्लॅन

वोडाफोन-आयडिया कंपनीचा प्लॅन २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना फक्त २४ दिवसाची वैधता मिळते. कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज मोफत १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना मोफत ‘हॅलोट्युन’ आणि ‘विंक म्यूझिक’ मोफत दिले जाते.

‘ऐअरटेल’ कंपनीचा प्लॅन

ऐअरटेल कंपनीचा हा प्लॅन २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना २४ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत नंबर कॉलवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज मोफत १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना ‘मोफत हॅलोट्यून’ आणि ‘विंक म्यूझिक’ मोफत दिले जाते.

‘जिओ’ कंपनीचा प्लॅन

जिओ कंपनी २२२ रुपयांचा प्लॅन देत आहे. परंतु हा प्लॅन केवळ जिओ फोन यूजर्ससाठी आहे. यात यूजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते त्यासोबत रोज २ जीबी डेटा मोफत दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. मोफत १०० एसएमएस रोज दिले जाते. व त्यांसीबत ‘जिओ ऍप्स’ चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.

 

“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न!

इंडियन स्वच्छता लीग” स्वच्छता मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांच्या उपस्थितीने उत्साही वातावरण

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात स्वच्छ अमृत महोत्सव साजरा केला जात असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्वच्छता लीग रॅली यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख, महानगरपालिका कर्मचारी, शहरातील सुजाण नागरिक, विविध शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, एनसीसी, स्काऊट, एनएसएस यासारख्या संस्थेचे विद्यार्थी इत्यादींचा प्रामुख्याने सहभाग होता.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, प्रभाग समिती क्रमांक 2 अंतर्गत भाईंदर स्थानक पश्चिम, प्रभाग समिती क्रमांक 3 भाईंदर स्थानक पूर्व, प्रभाग समिती क्रमांक 4 आयुक्त निवास, प्रभाग समिती क्रमांक 5 मिरा रोड स्थानक, प्रभाग समिती क्रमांक 6 काशीमिरा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणावरून महानगरपालिका विभागप्रमुख व कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी, सामाजिक संस्था यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची रॅली काढून शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

महाराष्ट्रासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाचे सावट असून देखील आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली. या उपक्रमात नागरिकांनी नियोजित केलेल्या मार्गावरून साफसफाई व प्लास्टिक मुक्त शहर म्हणून स्वच्छता मोहीम राबवली. नागरिकांना/शालेय विद्यार्थ्यांना साफसफाई करण्यासाठी हॅण्ड ग्लोव्हज व कचरा उचलण्यासाठी बॅग देण्यात आली होती. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाला अंदाजे 4000 ते 45000 नागरिक, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली.

प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमेनंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांनी विपश्यना केंद्र, रामदेव पार्क, मिरा रोड येथे उपस्थिती दर्शवली. सदर विपश्यना केंद्रात “इंडियन स्वच्छता लीग” ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव हे देखील उपस्थित राहिले.

सदर ठिकाणी आमदार गीता भरत जैन, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी उपमहापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेता प्रशांत दळवी, तसेच माजी नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते.

उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक संस्था व विविध शाळांचे प्रतिनिधी यांना आयुक्त, आमदार, “इंडियन स्वच्छता लीगचे” ब्रँड ॲम्बेसेडर, सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

सकाळ पासूनच पावासाचे सावट असून सुद्धा मिरा भाईंदर शहरवासीयांनी, विविध शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, एनसीसी, स्काऊट, एनएसएस विद्यार्थी यांनी मोहिमेत उत्स्फूर्तरित्या सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केल्याने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व मिरा भाईंदर शहरास भारतातील सर्वात स्वच्छ शहर करण्याच्या प्रयत्नामध्ये सर्वांचा सहभाग मोलाचा राहणार आहे अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या.

विपश्यना केंद्र येथील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त, सर्व अधिकारी/कर्मचारी व “इंडियन स्वच्छता लीग” ब्रँड ॲम्बेसेडर यांनी वेलंकनी बीच येथे “इंडियन स्वच्छता लीग” स्टार कॅम्पेनर कुमार हर्षद ढगे याच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बीच क्लीनअप मध्ये सहभाग नोंदवून समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत हातभार लावला.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले व या कार्यक्रमास पूर्णविराम देण्यात आला.

गौतम अदानींची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप..

_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी गरुडझेप घेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत थेट दुसरे स्थान मिळवले आहे. यादीतील जेफ बेझोस व बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी पोहचले आहे. सध्या अदानी यांच्या पुढे फक्त एलॉन मस्क आहेत. जर गौतम अदानी यांची अशीच घोडदौड सुरु राहल्यास ते अव्वल स्थानी देखील पोहचू शकतात. सध्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५३.९ बिलियन डॉलर इतकी झाली आहे व एलॉन मस्क यांची संपत्ती २७३.५ बिलियन डॉलर इतकी आहे.

या यादीत दुसरे भारतीय उद्योपती मुकेश अंबानी हे देखील असून त्यांनी देखील नवव्या स्थानावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे. भारतातील अदानी समूह हा तिसरा सर्वात मोठा उद्योग समूह असून या अंतर्गत त्यांचे बंदरे, खाणकाम, ऊर्जा, संसाधने, संरक्षण, गॅस, विमानतळे व एरोस्पेस इत्यादी उद्योग आहेत.