Home Blog Page 124

नारायण राणेंनी थेट उंदराशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर केली जहरी टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद तसा जुनाच आहे, अनेकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व राणे व त्यांचे दोन पुत्र यांच्यादरम्यान शाब्दिक चकमकी घडतच असतात. महाविकास आघाडी असतानापासून नारायण राणे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका करत आहेत. आता नारायण राणे यांच्या नव्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच केलेल्या विधानात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांची तुलना थेट उंदराशी करून टाकली सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष बांधणीसाठी विविध भागात शिवसंवाद यात्रा करत आहे, नेमके याच मुद्द्याला धरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहाय्याने टीव टीव करत हा उंदीर राज्यभर फिरत असल्याची जहरी टीका राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ते स्वकर्तृत्वावर राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, दसरा मेळावा आयोजित करण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदे यांना असून, त्यांनी बोलावल्यास मी नक्की या मेळाव्याला येईल.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले की, केवळ बाळासाहेबांच्या नावावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळाले होते, परंतु आता निवृत्त झालेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी घरी बसावे. अशा लोकांची स्वकर्तृत्वावर सरपंच देखील होण्याची लायकी नाही, असा खरमरीत टोला देखील नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

गुरुजन गौरव पुरस्कारासाठी SNDT चे प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांची निवड

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: वृंदावन फाऊंडेशन विवेक व्यासपीठ, पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘गुरुजन गौरव सोहळा’ २०२१ – २२ येत्या १८ सप्टेंबर रोजी पुणे येथे पार पडणार आहे.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांची यंदाचा ‘गुरुजन गौरव’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांचा तब्बल २० वर्षांपेक्षा जास्त काळ शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा अनुभव आहे.

शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सई ताम्हणकरला शेफाली वैद्य देणार का दणका ? गणेशोत्सवाच्या जाहिरातींवरून वादाला सुरुवात


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गणपती उत्सवाच्या औचित्यावर रिलायन्स मार्टतर्फे करण्यात आलेल्या एका जाहिरातींवरून वादंग निर्माण झाला आहे. रिलायन्स मार्टकडून विविध वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीवर हिंदुत्त्ववादी मंडळींनी टीका करायला सुरुवात केल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटलॆ आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका जाहिरातीत सईने टिकली न लावता गणपती बाप्पांचे स्वागत केल्याचे ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले असून त्या ट्विटसोबत #nobindinobusiness असा हॅशटॅग लावला आहे. शेफाली वैद्य यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला असून पूर्वीचा अनुभव पाहता शेफाली वैद्य आता सई ताम्हणकरला दणका देणार का ? याची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे #nobindinobusiness प्रकरण ?

मागील वर्षी २०२१ च्या दीपावलीच्या काळात काही मोठ्या ब्रँडनी त्यांच्या जाहिरातीसाठी बिंदी न लावलेल्या मॉडेल्सचे फोटो जाहिरातीसाठी वापरले होते. त्यावर शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेत हिंदू सण उत्सवांच्या जाहिरातींमध्ये वापरण्यात येणाऱ्या मॉडेल्सनी बिंदी लावलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली होती. शेफाली वैद्य यांनी घेतलेल्या या भूमिकेला सर्व स्तरांमधून मिळणार मोठा पाठिंबा पाहता अखेर सर्व संबंधित कंपन्यांनी जुन्या जाहिराती मागे घेत बिंदी लावलेल्या नव्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सला दणका देणाऱ्या शेफाली वैद्य आता सई ताम्हणकरला देखील दणका देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितली म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक वर लाचखोरीचा गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात आपल्या वरिष्ठांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढे ते करतील. त्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागेल, अशी मागणी करणाऱ्या एका पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या विरोधात त्याच मानपाडा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितिन राठोड असे या पोलीस नाईकचे नाव आहे. नाईक पदावर कार्यरत असलेला हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांचा लेखनिक आहे. पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्याकडे एक गुन्हा तपासासाठी आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला आणि त्याच्या पत्नीला पोलीस उप निरीक्षक मुसळे यांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही करतील, असे पोलीस नाईक नितिन राठोड याने या प्रकरणातील आरोपीला सांगितले. मात्र त्यासाठी साहेबांना ५० हजार रुपये द्यावे लागतील, असेही त्याने सांगितले.

या पैशांसाठी पोलीस नाईक राठोड यांनी आरोपीकडे तगादा लावला होता त्यामुळे आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक शहानिशा केली. चौकशीदरम्यान पोलीस नाईक राठोड याने आरोपीकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आणि पोलीस नाईक राठोड यांच्यात झालेल्या तडजोडी नंतर ४० हजार रुपये देण्याचे ठरले. तपासादरम्यान ४० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दिड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी पालिका प्रशासनापेक्षा पोलीसांवर ताण तर शिवसेनेकडून व्यवस्थापन व नियोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

डोंबिवली येथे गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात वाजतगाजत घराघरात दाखल झालेल्या गणरायाला दिड दिवसांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र विसर्जन स्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वाणवा असल्याने विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी काळजी घेत असल्याचे चित्र दिसत होते. डोंबिवलीत विविध विसर्जन स्थळी सायंकाळ पर्यंत ७५५० घरगुती तर २ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ठाकुर्ली येथील शिवसेना शाखेच्या वतीने चोळे विसर्जन स्थळी गणेश भक्तांना सहकार्य करण्यात येत होते.

यंदा सगळे निर्बंध हटविण्यात आल्याने डोंबिवलीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काल सायंकाळी बेंजो, ढोल ताश्याच्या जल्लोषात, गुलाल उधळीत दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. डोंबिवली चोळे गाव येथे पारंपरिक पद्धतीने तलावात विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल दिसून येत होता. येथे कुत्रिम विसर्जन साठी पालीकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गणेश भक्त तलावात विसर्जन करण्यास पसंती देत होते. दरवर्षी तलावाभोवती गणेश भक्तांची गर्दी होउन गोंधळ उडत असल्याने यंदा तलावाजवळ गणेश मूर्ती सोबत फक्त दोनच गणेश भक्तांना पोलीस परवानगी देत होते. त्यामुळे पोलीसांना गणेश भक्तांची समजूत काढतांना नाकीनऊ होत होते. तर विसर्जनासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ थोपविण्यासाठी पोलीसांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत होते.

शिवसेनेचे ठाकुर्ली येथील शाखाप्रमुख सचिन जोशी आणि त्यांचे बंधू चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी आणि त्यांचे कार्यकर्ते गणेश भक्तांना सहकार्य करीत होते. तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने तलावाचे पाणी अतिशय खराब अवस्थेत आहे. पालिकेचे लक्ष वेधून सुध्दा पालिका लक्ष देत नसल्याची तक्रार सचिन जोशी यांनी केली.

मोठा गाव रेती बंदर येथे दिड दिवसांच्या गणेश मूर्ती सोबत वाहनातून आलेल्या जेष्ठ नागरिकांना विसर्जन स्थळापासून दिड किमी अंतरावर रोखण्यात आल्याने त्यांनी माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे युवा जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांना तक्रार केली. दिपेश म्हात्रे यांनी तातडीने बंदी हटविण्याची विनंती पोलिसांना केली. यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला. मोठागाव येथे देखील दरवर्षी प्रमाणे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालीकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी योग्य नियोजन करत सहाय्यक पोलीस उपयुक्त सुनील कुराडे यांच्या सोबत काल संध्याकाळी पाहणी करुन योग्य सूचना दिल्या.