Home Blog Page 125

मिरा-भाईंदर शहरातील दीड दिवसांच्या विसर्जन सोहळयात 7878 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप!

संपादक: मोईन सय्यद/मिरा
-भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर श्रीगणरायाच्या 7878 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले.

महानगरपालिकेच्या वतीने मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसाचा विसर्जन सोहळा शांततेने पार पडला.

मिरा-भाईंदर शहरात दीड दिवसांच्या विसर्जन प्रसंगी एकूण 7878 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

प्रभाग क्रमांक १ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 302 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक २ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 796 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 1673 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 2738 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये कृत्रिम तलावात एकूण 82 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 2287 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

अशाप्रकारे एकूण 7878 दीड दिवसीय श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार व आमदार गीता भरत जैन यांनी शहरातील ठराविक विसर्जन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.

सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते.

सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती.

यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन अशाच प्रकारे सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी १ ते ६ प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज असणार आहे.

तरी शहरातील सर्व नागरिकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनास या पुढेही पुढील श्रीगणेश विसर्जन वेळेस सुध्दा पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.

विमानतळावर आता ‘चेक इन’ करण्याकरिता नवीन कार्य प्रणाली सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘चेक इन’ ची प्रक्रिया अनेकदा मनस्ताप देणारी होती. आता मात्र नवीन कार्य प्रणाली मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ तर्फे बीटा प्रणालीवर आधारित ‘डिजीयात्रा ऍप’ लाँच केले आहे. हा ऍप ‘अँड्रॉइड युजर्स’ आणि विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आला आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) नुसार एकदा का नोंदणी करून या ऍप ची सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र आणि बोर्डिंग पास कागदोपत्री बाळगण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे या ऍपच्या मदतीने प्रवाशांना पेपरलेस आणि अखंडपणे विमानतळावर प्रवेश घेता येणार आहे. (डीआयएएल) नुसार विमानतळावर प्रवाशांचा प्रवेश पेपरलेस आणि अखंडपणे करणे हाच उद्दिष्ट आहे. ज्यामुळे वेळेची बचत होईल म्हणजेच आता ऍपच्या मदतीने प्रवाशांना ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाद्वारे विमानतळावर प्रवेश दिला जाईल. हा ऍप प्रवाशांना चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाद्वारे ओळखेल जे त्यांच्या बोर्डिंग पासशी जोडलेले आहे.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) कडून एका निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे की, मोबाईल मधील ऍपच्या मदतीने चेहऱ्याच्या ओळखीच्या आधारावर सर्व चेकपॉईंट्सवर प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी याच ऍपवरूनच प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर, टी-३ टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी ही कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दिल्ली विमानतळ आणि बंगळुरू विमानतळाच्या देशांतर्गत प्रवाशांच्या चेहऱ्याच्या ओळखीसाठी हा ऍप कार्यरत करण्यात आला आहे. या ऍपमुळे प्रवाशांची विमानतळावर होणाऱ्या सर्व त्रासांपासून मुक्तता होणार आहे. सध्या ह्या ‘डिजीयात्रा ऍप’चे बीटा व्हर्जन कार्यरत करण्यात आले आहे आणि लवकरच ते फुल स्केलवर ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. निवेदनात म्हटले आहे की, या ऍपच्या साहाय्याने चेहऱ्याच्या आधारावर प्रवाशांची प्रवेश प्रक्रिया सर्व चेकपॉईंट्सवर केली जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी याच ऍपवरून प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर टी-३ टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठीच हा ऍप सुरू करण्यात आला आहे. एअर एशिया इंडीया, एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट आणि विस्तारा या टर्मिनलवरून हा ऍप चालणार आहे.

बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएएल) कडून त्यांच्या एका वेगळ्या निवेदनामध्ये ‘डिजियात्रा बायोमेट्रिक सिस्टम’च्या बिटा कार्यप्रणालीची ‘विस्तारा’ आणि ‘एअर एशिया’ च्या फ्लाईट्सवर चाचणी घेण्यात आली आहे. तर त्यांनी सांगितले की, ‘डिजियात्रा ऍप’ ची बीटा आवृत्ती ‘अँड्रॉइड ओएस’ साठी ‘गुगल प्ले स्टोअर’ वर उपलब्ध आहे. ‘ऍपल च्या आयओएस’ प्लॅटफॉर्मवरही हा ऍप पुढील काही आठवड्यात उपलब्ध होणार आहे. (डीआयएएल) कडून जाहीरपणे सांगण्यात आले आहे की, हा काळ एका बायोमेट्रिकच्या अखंड प्रवासाचा आहे जो चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणी आणि कागदपत्रांशिवाय विमानतळावर प्रवेश मिळवून देणे हाच या पाठीमागचा मुख्य उद्देश्य आहे. त्याचवेळी, (बीआयएएल) ने सांगितले की ऍपच्या मदतीने, प्रवाशांना यापुढे विमानाने प्रवास करण्यासाठी स्वतः जवळ कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. आता प्रत्येक चेक पॉईंट्स बायोमेट्रिक तंत्रज्ञानप्रणाली द्वारे प्रवाशांची ओळख पटवली जाणार असून ही सगळी प्रक्रिया देखील अतिशय सुरक्षित आहे.

सध्या ‘डिजियात्रा बीटा ऍप’ वापरणे पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्या प्रवाशांना तो ऍप वापरायचा आहे ते तो ‘गुगल प्ले स्टोअर’ मधून डाउनलोड करू शकतात. ऍपच्या नोंदणीसाठी प्रवाशांना त्यांचा आधार तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय, त्यांना कोविड-१९ लसीकरणाबाबत माहितीसह सेल्फी अपलोड करणे गरजेचे असणार आहे. या चाचणी दरम्यान आतापर्यंत सुमारे २० हजार प्रवाशांनी या ऍपद्वारे पेपरलेस आणि सीमलेस विमानतळ एन्ट्री केली आहे. या ऍपच्या मदतीने प्रवाशांना बायोमेट्रिक आणि इतर तपशील एकदाच सादर करावे लागतील. मग या तपशीलाच्या मदतीने विमान प्रवासी त्याच्या आगामी सहली करू शकतो. याचाच अर्थ प्रवाशांना प्रत्येक वेळी बायोमेट्रिक तपशील सादर करावा लागणार नाही.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) नुसार ‘डिजीयात्रा ऍप’ ची बीटा आवृत्ती ‘गुगल प्ले स्टोअर’ वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे. ‘डिजियात्रा ऍप’ ची आयफोन साठी ‘आयओएस’ आवृत्तीही आठवडाभरात उपलब्ध करून दिली जाईल. ‘डिजियात्रा ऍप’वर तुम्हाला फोन नंबर आणि आधार तपशीलांच्या मदतीने नोंदणी करावी लागेल. यानंतर फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यातून सेल्फी देऊन सबमिट करावी लागेल व शेवटी लसीकरण तपशील आणि बोर्डिंग पास स्कॅन करून ‘डिजियात्रा ऍप’मध्ये जोडावे लागतील.

बंगळुरू आणि दिल्लीच्या विमानतळांवर ‘डिजियात्रा बोर्डिंग सिस्टम’ आणि ‘इ-गेट’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र भारतातील सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ही सेवा टप्प्या-टप्प्याने सूरु करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आता प्रवासी त्यांची ओळख आणि बोर्डिंग पास प्रमाणीत करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यानंतर, सहज सुलभतेने चेक-इन आणि सुरक्षा तपासणीनंतरच ते त्यांच्या फ्लाईटमध्ये चढू शकतील.

 

आई ‘पाओला माइनो’ यांच्या निधनाने सोनिया गांधी यांना मातृशोक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे निधन झाले आहे. शनिवारी २७ ऑगस्ट रोजी त्यांचे इटली मध्ये निधन झाले आणि मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या सोनिया गांधीही परदेशात असून काँग्रेस चे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी २४ ऑगस्ट रोजी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत प्रियांका वाढरा व राहुल गांधीही होते.

जयराम रमेश यांनी सांगितले की, सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या असून यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका वाढरा ही त्यांच्यासोबत असतील. आपल्या आजारी आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्या जाणार आहेत. त्यानंतरच त्या दिल्लीत परतणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले होते. याचा अर्थ सोनिया गांधी बहुदा आपल्या आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटल्या होत्या आणि त्यांची प्रकृती जाणून घ्यायची होती. मात्र, आतापर्यंत सोनिया गांधी यांच्या आईचे निधन आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबद्द्ल फारशी माहिती समोर आलेली नाही असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

मोदी सरकारच्या व्यापारीवृत्तीमुळे ३० कोटी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात!- सुरेशचंद्र राजहंस

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई: मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणाऱ्या कंपन्या कवडीमोल भावाने खाजगी भांडवलदारांच्या घशात घालत आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC मधील सरकारी हिस्साही मोदी सरकारने बाजारात विकण्यास काढला परंतु यात करोडो गुतंवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

नोकरदार, मध्यवर्गीय, छोटे, मध्यम व्यापाऱ्यांनी आपल्या कष्टाचा पैसा एलआयसीमध्ये गुंतवला आहे त्यावरही मोदी सरकारचा डोळा आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते राजहंस म्हणाले की, एलआयसीचे (LIC) ३० कोटी पॉलिसीधारक आहेत तर १३.९४ लाख कर्मचारी आहेत आणि एलआयसीची संपत्ती ३९ लाख कोटी रुपये आहे.

या संपत्तीवर नरेंद्र मोदी सरकारची वक्रदृष्टी पडली असून यातील हिस्सा विकून २१ हजार कोटी रुपये कमावण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे.

एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात ९४९ रुपये किमतीला आणला पण ८६७ रुपयाला तो लिस्ट झाला.

यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता नुकसान भरून काढण्यासाठी डिव्हिडंड देण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा आहे परंतु हा गुंतवणुकदारांशी केलेला धोका आहे.

सर्वसामान्य जनतेचा LIC तील पैसा, गुंतवणूक, जोखीम हमी सुरक्षित राहावी म्हणून भांडवली बाजारातील अनिश्चिततेमुळे यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी ७० वर्षांत LIC ला विशेष कायद्याचे संरक्षण दिलेले होते.

मोदी सरकारने कर्मचारी संघटना, तज्ञ आणि जनसामान्यांना न जुमानता एलआयसीचा पैसा शेअर बाजारात आणला.

केंद्रातील भाजपा हे सरकार सामान्यांचे हिताकडे दुर्लक्ष करून व्यापारीवृत्तीने वागत आहे पण यात करोडो गुंतवणूकदारांची फसवणूक होते आहे असे राजहंस म्हणाले.

भाजपा की सिमा पात्रा ने अपने नौकरानी के साथ अत्याचार करते हुए तोडी हैवानीयत की सारी सिमाये..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

घरेलू सहायिकाओं के साथ अत्याचार की मामले तो अक्सर सामने आते हैं, लेकिन झारखंड में बीजेपी की नेता सीमा पात्रा ने जो अत्याचार अपनी नौकरानी के साथ किया वो रोंगटे खड़े कर देने वाला है। सीमा पात्रा ने २९ साल की अपनी नौकरानी को पिछले ८ साल से घर के एक कमरे में कैद करके रखा था। इस दौरान उसके साथ सारी हदें पार कर दी गईं। महिला ने बताया कि उसे गर्म तवे से दागा गया, लोहे की रॉड से उसके दांत तोड़े गए। यही नहीं, जीभ से पेशाब तक साफ करवाया गया। अपनी घरेलू सहायिका पर जुल्म ढाने वाली सीमा पात्रा के बारे में जानिए.

सीमा पात्रा बीजेपी की महिला विंग की राष्ट्रीय कार्यसमिति की सदस्य थीं। इसके साथ-साथ वो बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ की राज्य संयोजक भी थीं। सीमा के पति महेश्वर पात्रा एक रिटायर्ड आईएएस अधिकारी हैं। बीजेपी ने झारखंड में पार्टी की नेता सीमा पात्रा को निलंबित कर दिया है। उनपर आरोप है कि उन्होंने एक विकलांग आदिवासी लड़की को अपने घर में बंधक बनाकर रखा था और आठ सालों से लगातार उसपर अत्याचार कर रही थीं। झारखंड बीजेपी के प्रमुख दीपक प्रकाश ने सीमा पात्रा को पार्टी से निलंबित करने का आदेश जारी किया था।

गुमला की रहने वाली आदिवासी पीड़ित महिला का वीडियो सामने आया है, जिसमें वह अस्पताल की बिस्तर पर लेटी हुई है और अपने ऊपर हुए जुल्म को बयां कर रही है। बेजान शरीर पर दर्जनों जख्म लिए पीड़िता ने बताया कि सीमा पात्रा के यहां उसे बंधक बनाए जाने के दौरान उसे गर्म तवे से कई जगहों पर दागा गया था। इस दौरान उनसे घरेलू सहायिका के काम कराए जाते थे। इस वीडियो में साफ देखा जा सकता है कि पीड़िता की हालत बेहद खराब है। उसके कई दांत टूटे हुए हैं और वो बैठने की भी स्थिति में नहीं हैं। वह रोते हुए अपना दर्द बयां कर रही है। महिला ने बताया कि उससे जीभ से फर्श की सफाई कराई गई, पेशाब चटाया गया और रॉड से उनके दांत तोड़े गए थे।

बेटे ने की उजागर की मां की करतूत

कहा जा रहा है कि सीमा के बेटे की वजह से महिला को मुक्त कराया जा सका है। दरअसल, सीमा के बेटे ने सचिवालय में काम कर रहे अपने दोस्त विवेक बस्के को इस बात की जानकारी दी थी कि उनकी मां घरेलू सहायिका सुनीता को कैद किए हैं और उसे प्रताड़ित करती हैं। विवेक ने इसकी सूचना रांची डीसी को दी थी, जिसके बाद पुलिस सीमा पात्रा के अशोक नगर स्थित आवास पर पहुंची और सुनीता को मुक्त कराया। सीमा पात्रा के खिलाफ अरगोड़ा थाने में केस दर्ज किया जा चुका है, जिसमें एससी/एसटी एक्ट १९८९ की धाराओं के अलावा आयपीसी की धारा ३२३ (जानबूझ कर स्वेच्छा से चोट पहुंचाना) भी शामिल है। डीएसपी हटिया को इस मामले की जांच करने के लिए निर्देश दिया गया है।

बीजेपी ने किया सस्पेंड, पुलिस ने किया गिरफ्तार

महिला का वीडियो वायरल होने के बाद झारखंड बीजेपी के प्रमुख दीपक प्रकाश ने सीमा पात्रा को पार्टी से निलंबित करने का आदेश जारी किया था। गिरफ्तारी के डर से सुनीता पात्रा भाग गई थीं। पुलिस ने बुधवार की सुबह तड़के उन्हें गिरफ्तार कर लिया है।