Home Blog Page 126

एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक हतबल झाला असून, नाकी नऊ झाला आहे. परंतु, अशातच महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची घडामोड घडली असून, एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना १०० रुपयांचा दिलासा मिळणार आहे. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिडंरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या किमती स्थिर आहेत.

तसेच भारतील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले नाहीत.

व्यवसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर जवळपास १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता १८४४ रुपये मोजावे लागणार आहेत.

गणेशोत्सव मंडळाचा आक्षेपार्ह देखावा कल्याण पोलीसांनी केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पोलीसांनी पहाटे तीन वाजता एका गणेश मंडळाच्या ठिकाणी धाव घेत साकारण्यात आलेला आक्षेपार्ह देखावा जप्त करण्याची कारवाई केली आहे. कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त पक्षनिष्ठा या विषयावर देखावा साकारला होता हा देखावा वादग्रस्त असल्याने पोलीसांनी आज पहाटे तीन वाजता मंडळाच्या ठिकाणी धाव घेत साकारण्यात आलेला देखावा जप्त करण्याची कारवाई केली आहे. तसेच मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय तरुण मित्र मंडळ हे गेल्या ५९ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळाकडून दरवर्षी ताज्या घडामोडी वर देखावा साकारण्यात येतो. या मंडळाचे अनेक देखावे हे यापूर्वी वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरलेले आहेत. यावर्षी शिवसेनेत फूट निर्माण झाली. या विषयावर देखावा साकारण्यात आला होता. पक्षनिष्ठा हा या देखाव्याचा विषय होता. या मंडळाला पोलिसांनी यापूर्वीच भादंवि कायदा कलम १४९ अन्वये या मंडळाला नोटीस दिली होती.

देखावा साकारण्यापूर्वी मंडळाने हा देखावा पोलीसांना दाखविला होता, असे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र पोलीसांनी नोटीस मध्ये असे म्हटले होते की देखाव्याचा विषय आक्षेपार्य नसावा व देखावाचा विषय हा देशभक्तीपर असावा असे आवाहनही केले होते .मात्र पक्षनिष्ठेचा हा देखावा ताज्या घडामोडीवर भाष्य करणारा असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीसांनी आज पहाटे ३ वाजता मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांना फोन करून सांगितले की हा देखावा साकारता येणार नाही. अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल मात्र साळवी हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलीसांनी मंडळाच्या ठिकाणी जाऊन साकारण्यात आलेल्या देखाव्याचे सगळे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. तसेच मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात विजय साळवी यांनी सांगितले की मंडळाने नेहमीच ताज्या विषयावर देखावे साकारले आहेत. यंदा पक्षातील फुट हा विषय घेण्यात आला होता. मात्र पोलीसांनी देखावा जप्त केला आहे तसेच मंडळाचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही एक प्रकारे हिटलर शाही आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पोलीसांच्या या कारवाईमुळे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून एक प्रकारे त्याची गळचेपी केली जात आहे असा आरोप केला आहे. त्याचबरोबर पोलीसांच्या या कारवाई विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. मंडळाचा देखावा गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे तीन वाजता पोलीसांनी जप्त केल्याने यापुढील गणेशोत्सव मंडळाकडून साजरा केला जाणार नाही. या घटनेचा मंडळाकडून तीव्र निषेध केला असल्याचे साळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या वादात मनसे ची सुद्धा उडी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शिवसेने चे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी मागील ५ दशकांहुन अधिक काळ शिवतीर्थावर सुरू केलेला दसरा मेळावा हे काळाचे समीकरण असताना आता याच शिवाजी पार्क वरील याच दसरा मेळावा यंदा उद्धव ठाकरे वा एकनाथ शिंदे गटापैकी कोणी साजरा करावा हा वाद पेटलेला असतानाच आणि या विषयावर कोंडी झालेली असतानाच आता त्यात मनसे नी सुद्धा उडी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ‘गुढी पाडवा ‘ मेळावा शिवतीर्थावर घेणारी मनसे अचानक दसरा मेळाव्याच्या संघर्षात उतरल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडणार असे दिसत आहे.

मनसे चे राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांचे खंदे वारसदार आहेत, त्यामुळे त्यांनीच शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशपांडे लिहितात की, ‘शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे, पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ‘वारसा हा वास्तूचा नसतो, परंतु विचारांचा असतो’, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे लगबग शिवसेनेला टोलाच लगावला आहे.

राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याने याचाही वेगळाच अर्थ काढला जात आहे. बृहन्मुंबई महापालिकेने अद्याप शिवसेनेच्या शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्याला परवानगी न दिल्याने शिवतीर्थावर दसरा मेळावा नक्की कोण घेणार याबाबत उत्सुकता व उत्कंठा असणार आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेना दसरा मेळावा घेण्यावर ठाम असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणारंच अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटात दसरा मेळावा घेण्यावरून दोन गट आहेत. त्यामुळे अध्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट नसून त्यात आता मनसे सुद्धा या वादात उतरल्याने ‘मैदान एक आणि नेते अनेक’ यामुळे आरोप प्रत्यारोपाचेच सीमोल्लंघन होतानाची चिन्ह ठळक रित्या दिसत आहेत.

दीड लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

गेल्या चार दिवसांत २६ ते २९ ऑगस्ट २०२२ दरम्यान राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. राज्य सरकारच्या घोषणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री.चन्ने म्हणाले.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

‘एलआयसी’ ची ‘जीवन शांती’ विमा पॉलिसी देईल वृद्धापकाळात आर्थिक प्राप्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी ‘एलआयसी’ वेळोवेळी लोकोपयोगी योजना आणत असते. वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी ‘एलआयसी’ने एक उत्तम योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणूक करून वृद्धापकाळाचा खर्च सांभाळणे सहज शक्य आहे. या योजनेचे नाव ‘जीवन शांती पॉलिसी’ असे आहे.

जीवन शांती योजना

‘जीवन शांती’ पॉलिसी ही ‘एलआयसी’च्या जुन्या जीवन लक्ष्य योजनेसारखीच आहे. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळतात. पहिली तात्काळ वार्षिकी आणि दुसरी स्थगित वार्षिकी. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. पेन्शनची सुविधा पहिल्या म्हणजेच तात्काळ वार्षिकी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर लगेच सुरू होते. त्याच सेकंदात म्हणजे डिफर्ड ऍन्युइटी, पॉलिसी घेतल्यानंतर ५, १०, १५, २० वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. आपण इच्छित असल्यास, आपण आपली पेन्शन त्वरित सुरू करू शकता.

अशी असेल पेन्शन

जीवन शांती पॉलिसी अंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित नाही, तुम्हाला तुमची गुंतवणूक, वय आणि स्थगिती कालावधीनुसार पेन्शन मिळेल. लक्षात घ्या की गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल तितकी जास्त तुम्हाला पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार ‘एलआयसी’ तुम्हाला पेन्शन देते.

कोणाला होईल फायदा ?

‘एलआयसी जीवन शांती: योजनेचा लाभ किमान ३० वर्षे आणि कमाल ८५ वर्षे वयाच्या व्यक्तींना मिळू शकतो. याशिवाय पेन्शन सुरू झाल्यापासून एक वर्षानंतर या योजनेत कर्ज घेता येते. जर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असेल, तर तुम्ही ती ३ महिन्यांनंतर करू शकता