Home Blog Page 160

कोळसेवाडी शहर वाहतूक शाखा पोलीसांना रेनकोटचे वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या पावसाळा सुरू झाला असून अत्यावश्यक सेवा मधल्या वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष हा एक विभाग आहे. मानसूनचा सामना प्रत्यक्षात रस्त्यावर उभे राहून करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना खूप अडचण होत आहे व त्यांना पावसाळ्यात रेनकोट असणे गरजेचे आहे.

तसेच या विभागाचे अंतर्गत कोळसेवाडी शहर वाहतूक शाखा यात कार्यरत असलेले वाहतूक कर्मचारी आणि वॉर्डन यांना सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण माननीय श्री. मंदार धर्माधिकारी आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिरसागर यांच्या वतीने पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले.

 

 

सेनेच्या गोटात नेमकं शिजतंय तरी काय ? एकनाथ शिंदे यांची पुन्हा गटनेतेपदी निवड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय. या बैठकीचा अहवाल पत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांना पाठवलं आहे. शिवसेनेच्या या नव्या घटक पक्षाच्या अधिकृत पत्रावर शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या सह्या आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी १२ जणांची आमदारकी रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताना ते न आल्याचं कारण देत शिवसेनेने १२ आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतील, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

 

उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदाराला मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत दिले एकनिष्ठेचे फळ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील कळंब येथे न्यायालय स्थापन।करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही मंत्रिमंडळाची बैठक शेवटची असल्याचे सांगण्यात येत असतानाही त्यामध्ये आमदार कैलास पाटील यांच्यासाठी खास बाब म्हणून या प्रश्नाला स्थान देण्यात आले आहे.

गेली दोन दिवस कैलास पाटील पक्षनिष्ठेमुळे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचा विषय मंत्रिमंडळाने मंजुर केल्याने निश्चितपणे त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट दिल्याचे बोलले जात आहे. कारण विधी व न्याय खात्याचे मंत्री स्वतः उद्धव ठाकरे असल्याने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्याकडून ही भेट देण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील हे त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रयत्न करत होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आज अखेर न्याय मिळाल्याने आमदार कैलास पाटील देखील आनंदीत झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिल्यामुळे मुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार यावेळी आमदार घाडगे पाटील यांनी मानले.

 

डोंबिवली केमिस्ट असोसिएशनची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; “केमिस्ट ने टीबी मुक्त मोहीम यशस्वी करावी – सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांचे आवाहन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सामाजिक जवाबदारी जाणून केमिस्ट ने टीबी मुक्त भारत मोहीमेसाठी सहकार्य करून ती यशस्वी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांनी केले. डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे वतीने औषध विक्री नियम व तरतुदी यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.

मार्गदर्शन कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नितीन आहेर आणि संदीप नरवणे यांची प्रमुख अतिथी म्हणून तर संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे, निलेश वाणी, राजेश कोरपे, महेंद्र चोप्रा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आर पी.चौधरी यांनी सांगितले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून औषध विक्री केली पाहिजे. देशाला टीबी मुक्त करण्याच्या अभियानात केमिस्ट ची महत्वाची भूमिका आहे. टीबी रुग्णाची माहिती उपलब्ध झाल्यास योग्य उपचाराने त्याचे संक्रमण आपल्याला थांबवता येईल. त्याच प्रमाणे दुकानाच्या विक्री भागात आपण सीसीटीव्ही चे निर्देश केंद्राने दिले आहेत त्यावर देखील अंमल करावा. युवा पिढीचे आपण रक्षणकर्ते बनून डोंबिवली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल असे कार्य करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.

औषध निरीक्षक नितीन आहेर यांनी सीसीटीव्ही चे महत्व पटवून सांगितले तर संदीप नरवणे यांनी औषध विक्री करतांना घेण्याची काळजी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले तर केमिस्ट च्या समस्या निलेश वाणी यांनी यावेळी मांडल्या. आभार सचिव विलास शिरुडे यांनी मानले.

सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ व ‘आयशा आयकॉन’ तर्फे डोंबिवली वाहतूक शाखा पोलिसांना ७० रेनकोटचे वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या पावसाळा सुरू झाला असून मानसूनचा सामना प्रत्यक्षात रस्त्यावर उभे राहून करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना खूप अडचण होत आहे व त्यांना पावसाळ्यात रेनकोट असणे गरजेचे आहे. हे ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ चे अध्यक्ष श्री.विशाल शेटे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचे सहकारी चेतन ठक्कर आणि ‘आयशा आयकॉन’ या गृह-संकुलांचे बांधकाम व्यवसायिक श्री.निमेश सेजपाल यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली आणि या संबंधित शहर वाहतूक शाखा डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमचे ७० वाहतूक कर्मचारी असून यांना रेनकोटची गरज आहे. तात्काळ ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष व ‘आयशा आयकॉन’ चे बांधकाम व्यवसायीक यांनी ७० रेनकोट डोंबिवली शहर वाहतूक शाखेला उपलब्ध करून दिनांक २१/०६/०२२ रोजी माननीय श्री.मंदार धर्माधिकारी साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते शहर वाहतूक शाखा डोंबिवली यांच्या उपस्थितीत डोंबिवली शहर वाहतूक शाखा मध्ये कार्यरत असलेले ७० कर्मचारी आणि वॉर्डन यांना सदर रेनकोट चे वाटप करण्यात आले.

सदर रेनकोट वाटपाचा कार्यक्रम वाहतूक पोलीस विभागाचे उप-आयुक्त श्री.मंदार धर्माधिकारी तसेच वाहतूक उपशाखा डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते यांच्या उपस्थितीत श्री.निमेश सेजपाल, श्री.चेतन ठक्कर आणि श्री.विशाल वि.शेटे यांच्या हस्ते शहर वाहतूक शाखा रामनगर डोंबिवली येथे पार पडला.