Home Blog Page 184

मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमने ग्रस्त १५ वर्षीय मुलावर मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

मुंबई: लहान मुलांमध्येही कोरोना वायरस संसर्गानंतर काही दुष्परिणाम, पोस्ट कोविड इंफेक्शन दिसून येत आहेत यापैकी एक म्हणजे मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी). या आजारात अनेक अवयवांवर परिणाम होत आहेत. लहान मुलांच्या हृद्य, किडनी, लिव्हर (यकृत) यावर परिणाम होत असल्याचं दिसून आले आहे. नुकतेच मुंबईतील मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पीटल येथे 15 वर्षांच्या मुलावर मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले, जी कोविड नंतरची एक घातक गुंतागुंत आहे. ज्यामध्ये अनेक अवयवांचा समावेश आहे. आता, रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची दिनचर्या पुर्ववत सुरू झाली आहे.

विरार येथील रहिवासी असलेल्या 15 वर्षीय हर्ष चौहान या मुलाला तीव्र ताप, पोटदुखीच्या तक्रारीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जेथे अल्ट्रासोनोग्राफी करण्यात आली. तपासणीनुसार, रुग्णाला अॅपेन्डिसाइटिस झाला होता आणि त्याने अॅपेन्डेक्टॉमी केली होती, अपेंडिक्सची लागण झाल्यावर ती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि पोटातून मोठ्या प्रमाणात पू बाहेर पडला होता. दुसऱ्या पोस्ट ऑपरेटिव्ह दिवशी रुग्णाची ऑक्सीजन पातळी 40% पर्यंत घसरली जी सामान्यतः 94% इतकी असणे आवश्यक आहे. रुग्णाला श्वासोच्छ्वासात अडचणी येत असल्याने पुढील उपचारासाठी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात पाठवण्यात आले.

मिरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील लीड पेडियाट्रिक क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. अंकित गुप्ता म्हणाले की, रुग्णास रात्री 2:30 वाजता आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची ऑक्सीजन पातळी देखील 30% इतकी खालावलेली होती. त्याला ताबडतोब व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले, त्याच्या सीटी स्कॅनमध्ये सुमारे 70% फुफ्फुसाचा सहभाग दिसून आला आणि रुग्णामध्ये अक्युट रेस्पीरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) दिसून आला.

ओटीपोट, फुफ्फुसे आणि त्याचा रक्तदाब कमी असल्याने, बहु-प्रणालीचा सहभाग असल्याने, आम्हाला मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MIS-C) तसेच हे सारे कोविडशी संबंधित असल्याचा संशय आला. मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम हा एक सिंड्रोम आहे ज्यामध्ये एखाद्याच्या अवयवांना आणि ऊतींना गंभीरपणे सूज येते. यामध्ये हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, त्वचा, मेंदू, डोळे आणि जठरांत्रीय अवयवांचा समावेश असतो. हे कोविडशी संबंधित आहे आणि अनेक मुलांना संसर्ग झाल्यानंतर किंवा त्यांना कोविड संसर्गाचा कौटुंबिक इतिहास असल्यास त्याचा त्रास होतो. या रुग्णाला कोविड संसर्गाचा कौटुंबिक इतिहास असल्याचे दिसून आले.

डॉ गुप्ता पुढे म्हणाले, “त्याच्यावर स्टिरॉइड्स आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन उपचार करण्यात आले. रुग्णाची स्थिती नाटकीयरित्या सुधारली, त्याचा श्वास आणि संपृक्तता सुधारली. 4 ते 5 दिवसांनी तो व्हेंटिलेटरवर होता. त्यानंतर आठवडाभरानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला.

त्याच्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने काही तासांत जीव गमवावा लागला असता. आत्तापर्यंत, 2-3 मल्टी- सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम प्रकरणांवर तिसर्‍या लाटेदरम्यान यशस्वी उपचार केले गेले आहेत. परंतु कोविडची प्रकरणे वाढत असताना, देशात मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम प्रकरणे देखील वाढू शकतात असा संशय आहे. दीर्घकाळापर्यंत ताप येणे, डोळे लाल होणे, मानेवर सूज येणे, अंगभर पुरळ उठणे, पोटदुखी, कमी रक्तदाब, थकवा, उलट्या आणि अतिसार या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे इतर विविध परिस्थितींशी ओव्हरलॅप होतात आणि त्यामुळे मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमसाठी संशयाचा उच्च निर्देशांक महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोविड-19 च्या इतिहासाबाबतही रुग्णाची तपासणी करावी.

अत्यंत पोटदुखी आणि तापामुळे हर्षला त्याच्या अभ्यासावर किंवा इतर कामांवर लक्ष केंद्रित करता आले नाही. त्याला आराम मिळावा म्हणून आम्ही घरगुती उपाय निवडले. पण त्याचा त्रास वाढत गेला आणि आम्ही त्याला स्थानिक रुग्णालयात नेले जिथे त्याला अॅपेन्डिसाइटिस झाल्याचे निदान झाले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर, त्याची ऑक्सिजन पातळी कमी होती आणि त्याला मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमचे निदान झाले. सिंड्रोममुळे त्याचे अनेक अवयव प्रभावित झाल्याचे आम्हाला कळले तेव्हा आमचे जग उद्ध्वस्त झाले. माझ्या मुलावर योग्य निदान करून त्याचे प्राण वाचवल्याबद्दल आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो.

रुग्ण आता पूर्णपणे बरा आहे, त्याने त्याची दिनचर्या पुन्हा सुरू केली आहे आणि तो त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम आहे. मुलांमध्ये कोणत्याही असामान्य लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. फक्त योग्य काळजी आणि उपचार घ्या, अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या वडिलांनी व्यक्त केली.

देशभरातील बँकांमध्ये खातेधारकाला बोगस चेकद्वारे लुटणारी टोळी मानपाडा पोलिसांनी शिताफीने केली जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बँकेतील बचत खात्यात भरपूर पैसे असलेल्या खातेदारांची माहिती काढून त्याच्या खाते क्रमांकाचे बोगस चेक तयार करून त्या खात्यातून दुसऱ्या बोगस खात्यात पैसे जमा करून घेऊन ते पैसे मौज मजेसाठी वापरणाऱ्या एका टोळीच्या हातात मानपाडा पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने देशभरात असे फसवणुकीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.

सचिन प्रकाश साळस्कर (२९ वर्षे, रा. विरार), उमर फारूक (३९ वर्षे, रा. विरार), अनेक अनिल ओतारी (३३ वर्षे, रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (४० वर्षे, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार (४० वर्षे, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (५१ वर्षे, रा. महेश अपार्टमेंट, गोग्रासवाडी, नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) अशी या टोळीतील सात जणांची नावे आहेत.

या संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार एचडीएफसीच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडी शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (४५ वर्षे) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम ४६७,४६८,४६९,४२०,५११,३४ अन्वये ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची चौकशी करताना भावेश नावाचा गृहस्थ बँकांमधील मोठ्या खात्यांच्या माहिती या टोळीस देत. त्यानंतर ही टोळी तेच खाते क्रमांक असलेला बोगस चेक तयार करून त्या ग्राहकांची तंतोतंत जुळणारी सही करत असे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यामध्ये देखील अशा प्रकारची चोरी करत असल्याची कबुली या टोळीने दिली आहे. आतापर्यंत या आरोपींनी ५० पेक्षा जास्त बोगस चेक्स बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अप्पर आयुक्त दत्तात्रय कराळे , उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक उपयुक्त जे. डी. मोरे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे पोलीस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिंदे, दीपक जगदाळे यांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.

विशेष म्हणजे वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकृष्ण गोरे, विरार पोलिस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिवदे, दिपक जगदाळे यांनी केलेल्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी टीम वर्कने काम करतात. यात खातेधारकांचे बँक डिटेल्स गोळा करणे, त्यावर असणारा बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो, वगैरे माहिती घेत असत. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे बोगस चेक बनवण्याचे काम करत असत. एक साधा चेक घेऊन त्यावरील खातानंबर खोडून, नवीन खातानंबर प्रिंट केला जाई. जमविलेल्या माहितीच्या आधारे मग त्यावर डुप्लिकेट सही केली जात असे. त्यानंतर हा चेक वापरून अकाऊंट टू अकाऊंट पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाऊंटचाच वापर केला जात असे. अशाप्रकारे या सात जणांनी मिळून आतापर्यंत कित्ती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशारितीने फसवणूक केली आहे याचा सपोनि श्रीकृष्ण गोरे अधिक तपास करत आहेत.

शालांत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक २० हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही? यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत चालला आहे. त्यातच राज्याचे शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे खरच ढकलण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या ?
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतोय. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात. त्यामुळे विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही बोर्ड, एसइआरटीशी चर्चा करत आहोत. विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर पुढेच निर्णय अवलंबून आहेत.”

काय म्हणाले होते बच्चू कडू ?
दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याच्या सूचना बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. बच्चू कडू यांनी केलेल्या या सूचनांवर आता शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पहावं लागेल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

 

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत तर्फे वाहतूक पोलिसांचा सत्कार

मिरा भाईंदर: युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुणजी बकोलीया आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ व महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. सुवर्णा कदम यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भास्कर बोदडे आणि महाराष्ट्र सहसचिव शामु भिंगारदिवे यांचा प्रमुख उपस्थितीत आणि ठाणे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ स्नेहा नडे यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन वाहतूक नियत्रंण पोलिस अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ शाल आणि मास्क वाटप करून कार्यक्रमास सुरुवात केली तसेच गोरगरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास ASI पवार साहेब ASI कदम साहेब तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक पांढरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी स्थानिक पोलिस पाटील,  घोरपडे, ठाकरे, वाघमारे इ. उपस्थितीत होते. या सर्वांचा युनिव्हर्सल ह्युमन राईट्सच्या जिल्हा सचिव दिपाली महाले यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांना विदेशात जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सौ उषा बोरुडे, वर्षा शेट्टी ठाणे जिल्हा सहसचिव शुभम राय ठाणे शहर अध्यक्ष अमोल पोपलघट ठाणे शहर सचिव संतोष चव्हाण, कासारवडवली ब्लॉक अध्यक्ष सुमित सिंह उपस्थितीत होते.

पोळी-भाजी चा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने जुन्या मैत्रिणीच्या घरी झोपायला आलेल्या मैत्रिणीनेच त्या ५८ वर्षीय महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले असून या महिलेचे शेलार नका येथे स्वतःचे पोळी भाजी केंद्र असल्याचे उघड झाले आहे.

पाथरली येथे राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा खोपडे या महिलेने टिळक चौक येथे राहणाऱ्या विजया बावीस्कर (५८ वर्षे) यांच्याशी दुपारी संवाद साधला असता मी घरी एकटीच आहे तर रात्री तुझ्याकडे झोपायला येते असे विजया बावीस्कर यांना सांगितले. त्यावर विजया बाविस्कर यांनी होकार दिल्यानंतर रात्री आरोपी सीमा खोपडे ही महिला विजया बावीस्कर यांच्याकडे झोपायला आली होती. रात्री त्याचदरम्यान विजया बाविस्कर यांच्या अंगावरचे दागिने चोरून आरोपी सीमा खोपडे हिने विजया बावीस्कर यांचा गळा दाबून हत्या केली आहे.

या प्रकरणाचा शोध अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, प्रवीण बाकले, धोंडे, मुंजाल यांनी या गुन्ह्याचा तपास केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात येत आहे.