Home Blog Page 20

समाजाचा विरोध झिडकारून मुस्लिम मुलीने ने NEET परीक्षेत मिळविले ७२० पैकी ६९६ गुण! माजी आमदार मुझफ्फर हुसैन ने केला सत्कार!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: रूढीवादी मुस्लिम समाजातील मुलींना उच्च शिक्षण देण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लिम समाजातील मुलींना तर लहान वयातच लग्नाच्या बेडीत अडकवून तिच्या संसारात गुंतवून टाकले जाते. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु समाजाच्या रूढीवादी विचार धुडकावून लावत विपरीत परिस्थितीत देखील काही मुली दैदिप्यमान यश मिळवून आपले आणि आपल्या आई-वडिलांचे नाव लौकिक करतात. अशीच एक कहाणी आहे मुस्लिम समाजातीलच मिरारोड पूर्वेकडील नया नगराच्या रुहीन खानची जिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET परीक्षेत ७२० पैकी ६९६ गुण मिळविले असून मीरा-भाईंदर शहरात सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. हि गोष्ट जेव्हां काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांना समजली तेव्हां त्यांनी देखील रुहीन खान व तिची आई यांना आपल्या निवासस्थानावर सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला.


यामध्ये रुहीन खान हिचे विशेष परिश्रम तर आहेतच परंतु तिच्या ह्या यशामध्ये तिच्या आईचे खूप मोठे योगदान आहे. यामागचे कारण म्हणजे रुहीनचे वडील नोकरीनिमित्ताने परदेशात राहतात व तिची आई आपल्या मुलांसोबत मिरारोड येथील नयानगर परिसरात राहते. रुहीनच्या आईची इच्छा आहे कि तिने डॉक्टर व्हावे म्हणून तिने आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरु केले परंतु रुहीन खान हिला उच्च शिक्षण देण्यासाठी तिच्या नातेवाईकांचा प्रखर विरोध होता. त्यांचे म्हणणे असे होते कि मुस्लिम मुलींनी एव्हढे शिकून काय करायचे आहे? परंतु रुहीन खानाच्या आईने हा विरोध न जुमानता आपल्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण देण्याचे तिला चांगले कोचिंग क्लासेस पासून हवे ती सर्व मदत केली. रुहीनने देखील आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवत दैदिप्यमान असे यश मिळविले असून तिच्या या यशामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मिरा-भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविणाऱ्या अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचा यथोचित सन्मान करून प्रोत्साहन देत असतात. मुझफ्फर हुसैन यांनी रुहीन खानचा व तिच्या आईला सन्मानपूर्वक आपल्या निवासस्थानावर बोलावून त्यांचा सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार, नगरसेविका रुबिना फिरोज, गीता परदेशी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 13 अपक्षांसाह एकूण 24 उमेदवार रिंगणात! कोण मारणार बाजी?

ठाणे, प्रतिनिधी: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्‍याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यत संभाजी जगन्नाथ जाधव या एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 24 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही दि. 3 मे 2024 पर्यत होती, तर छाननी दि. 4 मे 2024 रोजी पार पडली. छाननी प्रक्रियेत 11 उमेदवार अवैध ठरले, तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज हे वैध ठरले होते. वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार संभाजी जगन्नाथ जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. ‍चिन्हवाटपाची संपूर्ण प्रक्रिया 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे. श्यामला राव (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांचे चिन्ह जाहीर केले व अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले.

25-ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे चिन्ह

1. नरेश गणपत म्हस्के – शिवसेना – धनुष्यबाण(एकूण 4 अर्ज )

2. राजन बाबूराव विचारे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – मशाल(एकूण 4अर्ज )

3. संतोष भिकाजी भालेराव – बहुजन समाज पार्टी – हत्ती

4. उत्तम किसनराव तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) – फळांची टोपली

5. सुभाषचंद्र झा – सरदार वल्लभभाई पटेल पार्टी – माईक

6. भवरलाल खेतमल मेहता – हिंदू समाज पार्टी – ऑटो रिक्षा

7. मुकेश कैलासनाथ तिवारी – भीम सेना – गॅस सिलेंडर

8. राजेंद्र रामचंद्र संखे – भारतीय जवान किसान पार्टी – भेटवस्तू

9. राहूल जगबीरसिंघ मेहरोलिया – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – नागरिक

10. विजय ज्ञानोबा घाटे – रिपब्लिकन बहुजन सेना – शिट्टी

11. सलिमा मुक्तार वसानी – बहुजन महापार्टी – बॅट

12. अर्चना ‍दिनकर गायकवाड – अपक्ष – किटली

13. इरफान इब्राहिम शेख – अपक्ष – हिरा

14. खाजासाब रसुलसाब मुल्ला – अपक्ष – अंगठी

15. अँड. गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी – अपक्ष – बॅटरी टॉर्च

16. चंद्रकांत विठ्ठल सोनावणे – अपक्ष – खाट

17. डॉ.पियूष के. सक्सेना – अपक्ष – बासरी

18. प्रमोद आनंदराव धुमाळ – अपक्ष – स्टेथस्कोप

19. मल्लिकार्जुन सायबन्न्ना पुजारी – अपक्ष – सफरचंद (एकूण दोन अर्ज)

20. राजीव कोंडिंबा भोसले – अपक्ष – तुतारी

21. सिध्दांत छबन शिरसाट – अपक्ष – टिव्ही रिमोट

22. दत्तात्रय सिताराम सावळे – अपक्ष – रोडरोलर

23. सुरेंद्रकुमार के. जैन – अपक्ष – फोन चार्जर

24. संजय मनोहर मोरे – अपक्ष – जेवणाचे ताट

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टकडून मुंबईत विविध ठिकाणी बसवणार १८८ ‘एईडी मशिन्स’

हदयविकाराबात जनजागृती करण्यासाठी “दिल की बातें” संकल्पनेवर आधारीत संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने रविवारी “दिल की बातें” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “ट्यूनिंग फोल्क्स” नावाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा समूहाने खास निधी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्डिॲक अरेस्टबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ८८ रेल्वे स्थानक आणि १०० मेट्रो स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी निधीची व्यवस्था करणे आणि १८८ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AEDs) स्थापित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AEDs) मशीनचा वापर हा अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांना त्वरीत सीपीआर मदत मिळावी यासाठी केला जाणार आहे. ही उपकरणे एखाद्याला जीवघेण्या परिस्थितीतून वाचवून त्या व्यक्तीच्या हदयाचे कार्य सुरळीपणे पार पाडण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळण्यापुर्वी एईडी मशीनद्वारे हृदयविकाराची समस्या असलेल्या व्यक्तीला त्वरीत वैद्यकिय मदत पुरविली जाते.

सार्वजनिक ठिकाणी जनजागृती जसे की, विमानतळ, शॉपिंग मॉल्स, शाळा आणि क्रीडा सुविधांमध्ये मोहिम आणि उपक्रमांमुळे आणि एईडी मशीन्सची संख्या वाढत आहे. या उपकरणांचा वापर आणि त्याच्या कार्यातील सुलभता यामुळे जवळच्या व्यक्तींना आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अवरमध्ये वेळीच उपचार मिळविणे शक्य होते. सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) आणि गंभीर परिस्थितीत एईडी मशीनद्वारे उपचारामुळे अधिक जीव वाचविणे शक्य होत आहे.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय मेहता म्हणाले की, सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत एईडी मशीनचा वापर केला जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी एईडी मशीन उपलब्ध करुन देण्याचा वैद्यकिय तज्ज्ञांचा प्रयत्न सुरु आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि एईडी मशीनची उपलब्धता आणि वापर हा अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरीकांमध्ये जगण्याचा दर वाढवण्यासाठी आशेचा किरण ठरत आहे.

डॉ. मेहता म्हणाले की, एईडी हे ऱ्हदयविकारासंबंधीत आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे जीव वाचवणारे उपकरण आहे जे हृदयाला कार्यरत करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले आहे. रोटरी क्लबने याआधीच सुमारे १० एईडी मशीन दान केले आहेत. या उपक्रमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील ८८ उपनगरीय रेल्वे स्थानके आणि १०० मेट्रो स्थानके यांसारख्या आणखी १८८ ठिकाणी एईडी मशीन उपलब्ध करुन देण्याचे आमचे ध्येय आहे.

अपघातात पाय चिरडलेल्या ३३ वर्षीय महिलेचे दोन्ही पाय वाचविण्यात वोकहार्डच्या डॉक्टरांना आले यश!

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार!

मुंबई: ऑफिसमधून घरी परतताना गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात हँडलबारवरून हात निसटल्याने ३३ वर्षीय महिला बसच्या चाकाखाली आली. तिचे दोन्ही पाय चाकाखाली आल्याने त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशावेळी प्रसंगावधान राखत मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक सर्जन डॉ श्रद्धा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली टिमने यशस्वी उपचार करुन या महिलेचे प्राण वाचविले.

33 वर्षीय महिला किंजल शाह या ऑफिसमधून घरी परतत होत्या. गर्दीच्या बसमध्ये चढत असताना तिचा हात हँडलबारवरून निसटला आणि ती अचानक बसच्या चाकाखाली सापडली. त्यानंतर ड्रायव्हरने तातडीने बस थांबवली आणि तिच्या सहप्रवाशांनी तिला पटकन बाहेर काढले. तिच्या दोन्ही पायांवर बसचे चाक गेले होते, त्यामुळे तिला तातडीने मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिरावल्यानंतर एमआरआय करण्यात आला, ज्यामध्ये तिच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यामुळे तिच्या मांड्या आणि पायांवरील त्वचा आणि स्नायू पूर्णपणे चिरडले गेले होते आणि 800 मिली पेक्षा जास्त रक्तस्राव झाला होता.

 

डॉ श्रद्धा देशपांडे पुढे सांगतात की, रुग्णाला तात्काळ शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी नेल्यानंतर, नेक्रोटिक टिश्यू काढून टाकण्यात आले आणि विशेष थेरपी देण्यात आली. रक्त संक्रमण तसेच प्रतिजैविक देण्यात आले. खालच्या अंगांची पुनर्बांधणी करण्यासाठी तिच्यावर 3 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यादरम्यान अतिदक्षता विभागाने तिचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले. त्वरित उपचारामुळे रुग्ण पूर्णपणे बरी झाली आणि तिला अपघातानंतर महिनाभरातच घरी सोडण्यात आले.

डिग्लोव्हिंग जखमेवर त्वरीत उपचार करणे महत्वाचे आहे कारण यामध्ये त्वचा सोलवटली गेल्याने ऊतींचे नुकसान होते. अशा जखमा दुर्मिळ असतात आणि वेळेत ओळखल्या नाहीत तर गंभीर संसर्ग, सेप्सिस होऊ शकतो आणि ते जीवघेणे ठरु शकते. जखमांवर वेळीच उपचार केल्याने जलद पुनर्प्राप्ती होते.

डॉ श्रद्धा देशपांडे पुढे सांगतात की, रुग्णाने दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे. आता तिच्या शरीरीवल चट्टे दूर करुन त्याचे व्यवस्थापन केले जात आहे.

मिरारोडचे वोक्हार्ट हॉस्पिटल्स हे अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपचार प्रदान करते. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि तज्ञांच्या टीमचा सहभाग असलेल्या या हॉस्पिटलमध्ये त्वरित आणि अचूक उपचार मिळतात. प्राथमिक मूल्यांकनापासून ते ट्रॉमा सर्जरी आणि गंभीर परिस्थितीतील व्यवस्थापन यासारख्या प्रगत उपचारांपर्यंत सर्वसमावेशक आणि विशेष काळजी यावर भर दिला जातो. प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करत गंभीर परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालय सदैवर तप्तर असल्याचेही डॉ श्रद्धा देशपांडे यांनी स्पष्ट केले.

नेहमीप्रमाणेच त्या दिवशीही ॲाफीसवरुन घराच्या दिशेने प्रवास करत होती. बसमध्ये चढली तेव्हा मला एक भयंकर अपघात होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. बसच्या चाकाखाली माझे हातपाय चिरडले गेले आणि पुन्हा कधीही चालता येणार नाही या विचारानेच माझ्या पायाखालची जमीन सरकली. अनेक शस्त्रक्रियांद्वारे रुग्णालयातील कुशल टीमने माझे पाय तर वाचवलेच पण मला पुन्हा हालचाल सक्षम केले. आज मी माझ्या पायावर उभी राहू शकते. डॉक्टरांच्या या सर्व टीमची मी सदैव ऋणी आहे ज्यांनी मला नव्याने आयुष्य दिले अशी प्रतिक्रिया रुग्ण किंजल हिने व्यक्त केली.

प्राण्यांसोबत साजरा करणार व्हॅलेंटाईन डे!

ठाण्यात रविवारी दिलवाले पॉज ले जायेंगे
रविवारी ठाण्यात होणार आगळावेगळा ‘व्हॅलेंटाईन डे’

ठाणे, प्रतिनिधी: १४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण अलिकडच्या वर्षांत प्राण्यांवरही प्रेम करा असा सांगणारा संदेश त्यात फाउंडेशन कडून दिला जाणार आहे. यावर्षी व्हॅलेण्टाईनडेचे निमित्त साधून सुटका केलेल्या आणि उपचारातून बरे झालेल्या प्राण्यांना दत्तक घेतले जावे म्हणून लग्नाच्या थीमवर आधारीत दिलवाले पॉज ले जाएंगे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कधी: रविवार ११ फेब्रुवारी
वेळ: Time : 10:30 Am to 6:30 Pm
स्थळ: कॅप फाउंडेशन, वाघबीळ