शाहरुख खान मीरा भाईंदर के पूर्व उप महापौर हसमुख गहलोत को कैसे जानते हैं?
शाहरुख खान मीरा भाईंदर के पूर्व उप महापौर हसमुख गहलोत को कैसे जानते हैं?
मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ म्हणजेच संपूर्ण स्वछतेच्या मोहिमेला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत असून ‘डीप क्लीन ड्राईव्ह’चा विस्तार करत मिरा-भाईंदर शहरात ‘मुख्यमंत्री स्वछता अभियान’ मोठ्या प्रमाणात आता राबवले जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या मोहिमेचा शुभारंभ मिरा-भाईंदरमध्ये करणार आहेत.
मुंबई महानगरानंतर ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ राबविणारे मिरा-भाईंदर शहर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्वच्छ व सुंदर मीरा भाईंदर करण्यासाठी व या स्वछता मोहिमेत लोक सहभाग वाढावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या स्वछता मोहिमेत मिरा-भाईंदरच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनानुसार प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर ‘संपूर्ण स्वच्छता’ (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईनंतर या स्वछता मोहिमेचा सर्वत्र विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईनंतर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यास सुरुवात करणारे मिरा-भाईंदर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर राहावे यासाठी ही मोहीम ३० डिसेंबर रोजी सकाळी मिरा-भाईंदरमध्ये सुरु होणार असून निरंतर चालणाऱ्या या स्वछता मोहिमेत मिरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर, हरित करण्यासाठी अनेक उपक्रम, मोहिमा हाती घेतल्या जातील अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
डीप क्लीन ड्राईव्हला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ही मोहीम मीरा भाईंदर शहरात राबवावी अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली व त्यांनी ती मान्य केली. ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाईंदरमध्ये येणार आहेत. ३० तारखेला सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल. हनुमान मंदिर परिसर, येथील मार्केट व तलाव परिसरात स्वछता मोहीम सुरु होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मुख्य रस्त्यावर स्वछता मोहिम राबवली जाणार असून त्यात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होतील.
याच परिसरात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरु होणार असून त्या शाळा इमारतीला मुख्यमंत्री भेट देतील. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन निर्मितीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असून त्या कामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. आमदार सरनाईक यांच्या विशेष निधीतून मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १० घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या गाड्यांचे लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
लोक सहभाग वाढविणार! – आमदार सरनाईक
मिरा-भाईंदर हे आपले शहर आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या स्वछता मोहिमेत आपले योगदान द्यावे. याआधी मिरा-भाईंदर शहराला स्वछतेसाठी राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. आता संपूर्ण स्वछता म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम मीरा भाईंदर मध्ये आणखी व्यापक प्रमाणात प्रभावीपणे राबवली जाणार असून त्यात नागरिकांनी निरंतर व अविरत सहभाग द्यावा, लोक सहभाग वाढविण्यासाठी लोकांचे प्रबोधन व विविध उपक्रम केले जातील, असे आमदार सरनाईक म्हणाले. मुंबईनंतर डीप क्लीन ड्राईव्ह राबविणारे मीरा भाईंदर हे दुसरे शहर असून मुख्यमंत्र्यांचे मीरा भाईंदर शहरावर विशेष प्रेम व लक्ष आहे असेही आमदार सरनाईक यांनी आवर्जून नमूद केले.
आमदार सरनाईक व आयुक्त यांच्यात आज या स्वछता मोहिमेच्या आयोजनाबाबत सविस्तर बैठक झाली. त्यानंतर महापालिका आयुक्त संजय काटकर म्हणाले की, डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत ६८ प्रकारची विविध कामे आम्ही करणार आहोत. शहरातील नागरिकांचे राहणीमान सुधारावे, शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजेच संपूर्ण स्वछता मोहीम मिरा-भाईंदर शहरात राबवावी अशी आमदार सरनाईक यांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेश व सुचने नुसार ही स्वछता मोहीम पुढील ३ महिन्यात आणखी प्रभावीपणे राबवून यशस्वी केली जाईल. स्वछता ही निरंतर व नियमीत चालणारी प्रकिया आहे. पालिका प्रशासन काम करत आहे.
डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यास सुरुवात करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सरनाईक यांची साथ व महत्वाच्या सूचना आहेत. आता नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वछ्तेबाबत जाणीव व जागरूकता निर्माण करून , प्रबोधन करण्यासही पालिका तितकेच प्राधान्य देईल. स्वछता मोहिमेत प्रबोधन आणि लोक सहभाग यावर आम्ही भर देणार आहोत. पुढील ३ महिन्यात स्वछतेच्या कामाला आणखी गती येईल. मिरा-भाईंदर शहरात ८८ बागा अधिक चांगल्या करत आहोत. नागरिकांना राहण्यासाठी शहर कसे अधिक चांगले होईल यासाठी एकत्रितपणे चांगले प्रयत्न सुरू आहेत असे आमदार सरनाईक व आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून शहर कायम स्वच्छ ठेवणे हा उद्देश आहे , तंत्रज्ञानाची मदत हि स्वछता मोहिमेसाठी घेतली जाईल. पुढील 3 महिन्यात 100 टक्के कचरा वर्गीकरण प्रत्यक्षात व्हायला हवे असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बायोगॅस प्लांटही तयार करत आहोत. रस्त्यावर धुळीचा त्रास होतोय तो कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही आयुक्तांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण आराखडा बनवला आहे अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
मिरा-भाइर्दर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील सुरू असलेल्या अनेक विकास कार्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या समवेत शहर अभियंता दीपक खांबीत व इतर अधिकारी यांचा संयुक्त दौरा आज आयोजित करण्यात आला होता.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, भाजपा नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या नावाने होत असलेले कलादालन, तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एका मजल्यावर सुमारे १००० या पध्दतीने तीन मजल्यावर सुमारे ३००० लोकांचा कार्यक्रम होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेले सांस्कृतिक हॉल, घोडबंदर किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा नियोजित पुतळा, घोडबंदर खाडी किनारा, जलवाहतुकीसाठी मेरी टाईम बोर्डाच्या माध्यमातून फाऊंटन हॉटेल समोर निर्माण होत असलेली प्रवासी जेट्टी, साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर चेना रिव्हर फ्रंट या प्रकल्पांची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यावर असताना स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या अंतर्गत सजावटीचे काम पुढील महिन्यात चालू करण्याच्या सुचना ठेकेदाराला देऊन ३ महिन्यामध्ये ते काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला आयुक्तांनी दिल्या आहेत.
तसेच तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी हॉलचे काम ३१ डिसेंबर पुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना ठेकेदाराला दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व घोडबंदर किल्ल्याचे उद्घाटन २६ जानेवारीला करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. तसेच मेरी टाईम बोर्डाची एन.ओ.सी. आल्यानंतर तातडीने घोडबंदर खाडी किनाऱ्यावर सुशोभिकरण करण्याचे काम नगर अभियंता दिपक खांबीत यांना दिले. त्याचबरोबर सागरमाला योजने अंतर्गत चालू होणारी जलवाहतुक पुढील वर्षात केव्हाही चालू होत असल्याने तयार झालेल्या प्रवासी जेट्टीचे सुशोभिकरण व रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सुचना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले.
चेना रिव्हर फ्रंटच्या कामाला वन खात्याची परवानगी मिळालेली असून वाईल्ड लाईफ कमिटीची परवानगी मिळाल्याबरोबर ते काम व नदीशेजारी असलेल्या १८ मिटर रस्त्याचे काम ताबडतोब चालू करून पुढील वर्षी पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे १४०० कोटी रूपयांचा निधी विविध विकास कामांना उपलब्ध करून देण्यात आल्याने सदरची सर्व कामे तातडीने पुर्ण होतील असा विश्वास आयुक्त संजय काटकर यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना दिलेले आहे.
त्यामुळे मिरा-भाइर्दर शहरातील विकास कामांना चालना मिळणार असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर व पालिका अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत आयुक्त संजय काटकर, शहरअभियंता दिपक खांबीत, उपअभियंता यतीन जाधव तसेच महानगरपालिकेचे व वन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. परंतु ही सर्व विकास कार्य नियोजित वेळेवर पूर्ण होतील का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (पु ) प्रभाग क्र. 12 मधील आरक्षण क्र. 230 उद्यानाच्या भूखंडावर 146 विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या “मुलभूत सोई सुविधा निधी” अंतर्गत ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिम्नॅशियम बांधण्याकरिता राज्य शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु या भूखंडावर हजारोंच्या संख्येने झाडे लावण्यात आलेली होती आणि ती काढण्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उद्यान विभागाला पत्र देऊन तरण तलावाच्या बांधकामात बाधित होणारी 3267 झाडे मुळासहित काढून पुनरोपण करण्यासाठी 23 ऑक्टोबर रोजी जाहिर नोटीस सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करून सूचना व हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर मिरा-भाईंदर शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी, पत्रकार, नागरिक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी महानगरपालिकेकडे लेखी व तोंडी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने हा निर्णय रद्द केला आहे.
आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती तर भाजपचे145 विधानसभा प्रचार प्रमुख एड. रवी व्यास यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपला विरोध दर्शविला होता. सामाजिक कार्यकर्ते एड. कृष्णा गुप्ता यांनी देखील लेखी स्वरूपात आपली हरकत नोंदवली होती. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात जवळपास सर्वच प्रसिद्धी माध्यमातून बातम्या प्रसिद्ध करून टीकेची झोड उठवली गेली होती.
या सर्व प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी अखेर आरक्षण क्र. 230 मधील प्रस्तावित तरण तलावाच्या बांधकामाला स्थगिती दिली असून त्याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये पालिके तर्फे सांगण्यात आले आहे की, विकासकामे व पर्यावरण यामध्ये योग्य समतोल राखणे आवश्यक असल्याने महापालिकेमार्फत आरक्षण क्र. 230 येथे होणारे तरण तलाव व जिम्नॅशियम या बांधकामाचे ठिकाण बदलुन अन्य जागा निश्चित करून तरण तलाव बांधण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
मुळात आरक्षण क्र. 230 या भूखंडावर केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत 2017-18 साली “हरित क्षेत्र विकास योजना” राबविण्यात आली होती आणि त्यानुसार या ठिकाणी हजारो झाडे लावण्यात आलेली होती. त्यावेळी या ठिकाणी झाडे लावण्यासाठी महापालिके तर्फे लाखों रुपये खर्च करण्यात आलेले होते. त्याच प्रमाणे गेल्याच वर्षी तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांच्या पुढाकाराने ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविताना एक जाहीर कार्यक्रम आयोजित करून माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उप महापौर हसमुख गेहलोत यांच्या उपस्थितीत ग्रीन यात्रा फौंडेशनच्या सौजन्याने मियावाकी या जापानी तंत्रज्ञानावावर आधारित दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. तेव्हापासून त्या रोपांची देखभाल व निगा राखण्याचे कार्य ग्रीन यात्रा फौंडेशन तर्फे कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता मोफत स्वरूपात केले जात होते. अशा प्रकारे उद्यानासाठी राखीव असलेल्या या भूखंडावर हजारोंच्या संख्येने झाडे लावली गेली आणि त्या ठिकाणी आता ही झाडे चांगल्या पद्धतीने वाढलेली आहेत.
असे असताना कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता आणि पर्यावरणाचा विचार न करता याच भूखंडावर ऑलम्पिक साईजचे तरण तलाव आणि जिमखाना बनविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. विकास कार्यात बाधित होणारी झाडे तोडण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया न करता घाईगडबडीत ठेकेदाराला कार्यादेश देखील देण्यात आला. परंतु या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी जर रातोरात हजारो झाडं कापली तर शहरातील नागरिकांच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागले या भीतीने महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी शाब्दिक खेळ करून 3267 झाडं इतरत्र पुनरोपण करणार असल्याची जाहिरात 23 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करून सात दिवसात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या होत्या. पालिका अधिकाऱ्यांना असे वाटले की नेहमी प्रमाणे कदाचित यावेळी देखील काही मोजकेच नागरिक आपल्या हरकती नोंदवतील आणि सुनावणीचा फार्स करून ही झाडे काढून टाकता येतील. परंतु यावेळी अनपेक्षितपणे महापालिकेच्या या निर्णयावर सामान्य नागरिकां पासून ते पत्रकार, पर्यावरण प्रेमी व लोकप्रतिनिधी यांनी टीकेची झोड उठवली. अनेक सामाजिक संस्थांनी तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर वृक्षारोपण करणाऱ्या संस्थेने थेट कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली होती.
या सर्व घडामोडी पाहून आणि प्रकरण अधिक चिघळत जात असल्याचे दिसून आल्यानंतर महापालिका प्रशासनाने अखेर हा वादग्रस्त निर्णय रद्द केला असून आता तरण तलाव आणि जिमखाना यासाठी इतर ठिकाणी भूखंड शोधून त्या ठिकाणी त्याचे बांधकाम करणार असल्याचे जाहीर केले आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धी पत्रकानंतर आता आपली देखील बदनामी होईल या भीतीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील लगोलग एक पत्र प्रसिद्ध करून जनतेच्या भावनांचा आदर करीत असून पर्यावरणाचा ऱ्हास करून तरण तलाव बांधणार नाही असे जाहीर केले आहे.
आरक्षण क्र. 230 लगत असलेल्या भूखंडावर एका बड्या बिल्डरचा मोठा प्रकल्प येणार आहे आणि त्या बिल्डरला भविष्यात याचा फायदा व्हावा या हेतूनेच याठिकाणी महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर ऑलम्पिक साईज तरण तलाव आणि जिमखाना बनविण्याचा कट रचला होता परंतु शहरातील सजग पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा कट आता फसला गेला आहे अशी चर्चा शहरात केली जात आहे.
या सर्व प्रकारामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिकेची नाचक्की तर झालीच आहे परंतु पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची नियोजन शुन्यता देखील पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणानंतर तरी पालिकेचे अधिकारी भविष्यात काही बोध घेतील आणि पर्यावरणाचा समतोल राखून विकास कार्याचे नियोजन करतील अशी अपेक्षा शहरातील नागरिक बाळगत आहेत.
भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. एकूण 1800 कोटी रुपयांचा या रस्त्यांवर खर्च होणार आहे. 1400 कोटी एमएमआरडीएच्या माध्यमातून तर 400 कोटी मिरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांच्या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. एमएमआरडीएने ठेकेदाराला कार्यादेश दिले असून पुढील आठवड्यात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु होतील. किमान 25 वर्षे हे काँक्रीट रस्ते चांगले राहतील अशा पद्धतीने काम केले जाईल. आता कामाला सुरुवात करून काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील वर्षी मार्च महिन्या पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीप्रमाणे मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी जवळपास 3 हजार कोटींचा विकास निधी शिंदे सरकारने दिला आहे. हि सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, काही कामांसाठी विविध खात्यांच्या परवानगी आणणे बाकी असून या सर्व कामांबाबत आढावा घेण्यासाठी आज आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त संजय काटकर यांच्यात बैठक पार पडली. जो निधी राज्य सरकारने दिला आहे ती सर्व विकास कामे वेळेत पूर्ण व्हायला हवीत. यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत व निधीचा विनियोग करावा, अशा सूचना आमदार सरनाईक यांनी केल्या.
मिरा-भाईंदर शहराला चांगले दर्जेदार रस्ते देण्याचे वचन आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले होते व या कामासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून याच वर्षी मंजुरीही आणली होती. मिरा-भाईंदरच्या सिमेंट रस्त्यांवर 1800 कोटींचा खर्च होणार आहे. एमएमआरडीए 1400 कोटी खर्च करून रस्ते व ब्रिज बांधणार आहे . तर महापालिका 400 कोटी खर्च करून सिमेंट रस्ते करणार आहे. या कामासाठी ठेकेदारांना कार्यादेश दिले असून पुढील आठवड्यात हे काम सुरु होईल अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील 80 टक्के रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. मार्च महिन्या पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा मानस महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे, असेही ते म्हणाले. हे रस्ते चांगले व दर्जेदार असतील आणि किमान 25 वर्षे टिकतील असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु करताना सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी शहरात अंतर्गत जल वाहिनी टाकण्याचे कामही आधी केले जाणार आहे. जेणेकरून पुन्हा खोदकाम होणार नाही. सगळे नियोजन करून सिमेंट रस्त्यांची कामे महापालिकेने सुरु करावीत, अशा सूचनाही आमदारांनी केल्या.
आमदार प्रताप सरनाईक ने केली आयुक्तांशी चर्चा!
आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त यांच्यात शहरातील विकास कामांशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. राज्य सरकार कडून विकास कामे, प्रकल्प यासाठी जो निधी आला आहे, त्यात काही कामात तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या आहेत. विविध परवानगी आणणे व वेळेत कामे पूर्ण करून पुढील एका वर्षात विकास कामांचे लोकार्पण करणे अशा विविध विषयांवर आमदार व आयुक्त यांच्यात चर्चा झाली. आमदार सरनाईक यांनी विकास कामांबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, विविध खात्यांचे अधिकारी यांच्याशीही चर्चा करून आवश्यक परवानग्या मार्गी लावल्या आहेत.
मिरा-भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप यापूर्वी अनेक वेळा करण्यात आले आहेत. भ्रष्टाचारामुळे शहरातील रस्त्यांची कामे निष्कृष्ट दर्जाचे झाले आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे 1800 कोटींच्या सिमेंट काँक्रीटच्या बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करून संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपले खिसे भरणार का? अशी चर्चा केली जात आहे.