Home Blog Page 235

ठाणे जिल्ह्याला खासदार कपिल पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागण्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकत्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. ठाणे जिल्ह्याचा विचार करता केंद्रीय मंत्रीमंडळात अद्याप पर्यंत जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळालेले नव्हते. कपील पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.

ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाचे असलेले राजकीय वर्चस्व आणि दि.बा.पाटील यांच्या नामकरणाचा प्रस्ताव सर्वात आधी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत मांडला. तसेच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेनेसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपने आगरी समाजाच्या रूपात भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड केली आहे.

अनेक भाजपा नेत्यांचे खासदार कपिल पाटील निकटवर्ती

विशेष म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खा.कपिल पाटील यांना मंगळवारीच दिल्लीला बोलावून घेतले होते. तेव्हापासूनच भिवंडी मतदारसंघात मंत्रीपदाबद्दल भाजपच्या गोटात चर्चा सुरु झाली होती. खा.कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यातच अल्पावधीतच खा.कपिल पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन केली असल्याने अनेक भाजपा नेत्यांचे खा. कपिल पाटील हे निकटवर्ती मानले जातात.

व्यासपीठावरून शिवसेनेच्या शिंदे पिता पुत्रांवर अनेक वेळा टीका

ठाणे जिल्ह्याचा विचार करता केंद्रीय मंत्रीमंडळात अद्याप पर्यंत जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळालेले नव्हेत. त्यातच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढत असून मराठा समाजाचे आक्रमक नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी खा.कपिल पाटील यांना केंद्राची ताकद दिल्यास जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न भाजपचे खासदार कपिल पाटील हे करतील म्हणून त्यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले. खा.कपिल पाटील यांना शिवसेनेच्या शिंदे पिता पुत्रांकडून आडकाठी येत असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यातच खासदर कपिल पाटील यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमांमध्ये व राजकीय व्यासपीठावरून शिंदे पिता पुत्रांवर अनेक वेळा टिका देखील केल्या आहेत.

दि. बा. पाटील यांच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव

खा.कपिल पाटील हे आगरी समाजाचे असून नवी मुंबई विमानतळाला स्व.लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आगरी समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यातच शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपदेखील या आंदोलनांमध्ये आपली राजकीय पोळी भाजत असल्याने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा.कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू दिली. तसेच नवी मुंबई विमानतळाला जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय खासदार दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी काही दिवसापूर्वीच हजारो भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव असल्याची खंत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली होती.

२०१५ सालीच नामांतराचा विषय मांडला होता

खासदार कपिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार २०१५ सालीच विमानतळाला जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तसेच २०१६ साली दिल्लीतील संसद अधिवेशनात केंद्र सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दिल्लीला पक्षाच्या कामासाठी जावे लागल्याने आपण नवीमुंबईतील घेराव आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही. याबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. तसेच पालघर, ठाणे, रायगड, या तीन जिल्ह्यात आगरी – कोळी समाजाचे राजकीय प्राबल्य असल्याने त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आहे असे म्हटले जात आहे.

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लसीकरणाच्या वादतून जोरदार हाणामारी; हाणामारी ची घटना सीसीटीव्हीत कैद..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

लसीकरणाच्या वादतून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगर पालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

राजकीय श्रेयातून हाणामारी

काही महिन्यांत बदलापूर कुळगाव नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात सध्या लसीकरण केंद्रांवर सर्वच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. सेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशाच लसीकरणाच्या वादातून पालिकेच्या दुबे रुग्णालयात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका कार्यकर्त्याने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी बेंच टाकला. त्यात एक जण जखमी झाला आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल

याप्रकरणी भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांकडून बदलापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारे लसीकरणावरून राजकीय संघर्ष यापुढेही वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुमच्या गाड्या पेट्रोल-डिझेलवर चालतात, पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते; राहुल गांधींचा घणाघाती टोला..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे अशी बातमी शेअर त्यांनी केली आहे. यासोबतच ‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर याआधीही कित्येकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं होतं. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू’ असं ट्विट केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी ‘मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत तर ती जास्त मोठी बातमी होते’ असं देखील म्हटलं होतं.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या एमएसपी ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत, असं म्हटलं आहे.

सोनसाखळी चोर गजाआड; २,२१,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या एकास बोईसर पोलिसांनी अटक करून एकूण ३ चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणून ३ मंगळसूत्र जप्त करून एकूण रुपये २,२१,७००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी कॉलोनी समोर बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले म्हणून दिलेल्या फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून एका इसमास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ३ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्या ताब्यातून २,२१,७००/- रुपये किंमतीचे ६२.०० ग्रॅम सोने (३ मंगळसूत्र) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.

किराणा दुकानात आढळला २० लाखांचा प्रतिबंधित गुटखा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना बातमी मिळताच एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सीवूड येथे असलेल्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मधील लक्ष्मी किराणा स्टोअर्स आणि प्लाझो अपार्टमेंट, रूम नं. ००१, शांताराम विठ्ठल स्मृती या दोन ठिकाणी छापा टाकला असता २० लाख ४६ हजार रु. किमतीचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल आढळून आला.

सदर गुन्ह्यात राजू आसाराम देवासी (२० वर्षे) याला अटक करून एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.