Home Blog Page 258

संभाजीराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट; मराठा आरक्षणा संबंधित केली चर्चा

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.

तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे असं मी शरद पवारांना सांगितलं असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा होणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल, असं संभाजीराजेंनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं.

योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा”; आय.एम.ए.चं पंतप्रधान मोदींना पत्र

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्यची चिन्हं काही दिसत नाही. अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आय.एम.ए ने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आय.एम.ए ने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीलं आहे. योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

“योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हि.डि.ओ त त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”,
अशी मागणी आय.एम.ए ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

आय.एम.ए च्या उत्तराखंड शाखेनेही योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे.
अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल,
असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.

लसींवरून केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत कोरोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे.

१ जूनपासून कशावर असेल बंदी, कशात सूट? मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाचा सध्या कमी होऊ लागलेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी हा लॉकडाउन अधिक वाढवण्याचसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

त्यासंदर्भात आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे की “जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात लसीकरण ५० टक्क्यांच्या वर जात नाही,
तोपर्यंत लॉकडाउनमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
तसं केल्यास ते करोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखं आहे”,
असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे १ जूनपासून लॉकडाऊन मागे घेतला जाणं कठीण वाटत असलं,
तरी त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाण्याचे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत.
कोणत्या गोष्टींसाठी मुभा मिळणार?
दरम्यान, मुंबईसंदर्भात विचार करता लसीकरणाचा आकडा अजूनही कमी असल्यामुळे नियमांमधून
कोणत्या गोष्टींना मुभा देण्यात येईल,
याविषयी देखील अस्लम शेख यांनी संकेत दिले आहेत.
“लॉकडाउनमघ्ये कोणते बदल करायचे,
कोणती दुकानं उघडायची, ए.सी.ची दुकानं, सलून, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना निर्बंधांतून वगळता येईल का?
अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी असणाऱ्या सेवांमध्ये अजून वाढ करता येईल का?
याची चाचपणी सुरू आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोविड टास्क फोर्सकडून अभ्यास करून शिफारशी केल्या जातील.
त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल”,
असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.
तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकार जबाबदार!
यावेळी बोलताना अस्लम शेख यांनी तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.
“तिसरी लाट येणारच.

मीरा भाईंदर महापालिकेच्या दोघां कार्यकारी अभियंत्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळले; कांदळवनाचा ऱ्हास करणे पडले महागात

संपादक: मोईन सय्यद / मीरारोड, प्रतिनिधी

मिरा भाईंदर शहरातील कांदळवन क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून मोठे काँक्रीट नालेचे बांधकाम केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित आणि सुरेश वाकोडे यांचा जामीन अर्ज मंगळवारी ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला . महापालिकेला न्यायालयाने दिलेला चांगलाच दणका आहे . पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात महापालिका आघाडीवर असून पालिका अधिकारी – ठेकेदारांवर आता पर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत .

कांदळवन व कांदळवन पासून ५० मीटर पर्यंतच्या बफर झोन मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम , भराव आदी करण्यास मनाई आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने कांदळवन हे अतिशय महत्वाचे असल्याने त्याच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.

तसे असताना मीरा भाईंदरमध्ये मात्र महापालिके पासून खाजगी विकासक , राजकारणी , झोपडी माफिया आदीं कडून सर्रास कांदळवनाचा ऱ्हास केला जातो . कांदळवन तोडणे , जाळणे , भराव करणे , विविध बांधकाम करणे , भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद करणे आदी प्रकार सर्रास केले जातात . या प्रकरणी अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असले तरी पोलीस मात्र ह्या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहण्या ऐवजी आरोपीना सोयीची भूमिका घेत असल्याचे चित्र आता पर्यंत पहायला मिळाले आहे .

त्यातच मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स व पालिका पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवनाचा ऱ्हास करून कांदळवन आणि ५० मीटर क्षेत्रात महापालिकेने काँक्रीट मोठ्या नाल्यांची बांधकामे चालवली होती . खाडीच्या नैसर्गिक प्रवाहाचे स्तोत्र बंद करून काँक्रीट नाल्या द्वारे कांदळवनात थेट सांडपाणी महापालिका सोडत आहे . त्या आधी ८ फेब्रुवारी २०१९ रोजी कोकण विभागीय कांदळवन उपसमितीने पाहणी करून कारवाईचे आदेश देऊन सुद्धा पालिकेने कार्यवाही केली नाही .

या प्रकरणी पर्यावरणा साठी कार्य करणारे पत्रकार धीरज परब सह स्थानिक जागरूक रहिवाशी रुपाली श्रीवास्तव आदींनी अनेक तक्रारी केल्या होत्या . त्या अनुषंगाने तालुका स्तरीय कांदळवन समितीने पाहणी करून ह्या दोन्ही ठिकाणी कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास होत असल्याचे स्पष्ट करत पालिकेस काम बंद करण्याचे निर्देश दिले होते . परंतु तरी सुद्धा पालिकेने सतत येथे काम सुरूच ठेवले होते . २५ मार्च रोजी अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या परवानगी नंतर मंडळ अधीकारी प्रशांत कापडे यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर दीपक खांबित आणि सुरेश वाकोडे सह ठेकेदार आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता .

मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे . मंगळवारी ठाणे न्यायालयात खांबित व वाकोडे यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता . ह्यावेळी सरकारी वकील विवेक कडू यांनी जामिनास हरकत घेऊन शासनाच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला . खांबित यांच्यावर ह्या आधी पर्यावरण संरक्षण कायद्या खाली कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास केल्याचे ५ गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले . तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देतानाच जामीन मंजूर करू नये अशी विनंती केली . न्यायाधीश पी . पी . जाधव यांनी गुन्हा आणि एकूणच गांभीर्य पाहता खांबित व वाकोडे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावत चांगलाच दणका दिला आहे .

कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यावर आधीच कांदळवन ऱ्हासाचे ५ गुन्हे दाखल असून अन्य ५ गुन्ह्यात सुद्धा त्यांना थेट आरोपी केले नसले तरी पालिकेच्या बांधकाम विभागाचे ठेकेदार व अधिकारी आरोपी आहेत . कांदळवनच्या गुन्ह्यात पोलिसांची भूमिका आता पर्यंत आरोपीना पाठीशी घालणारी राहिली असून आज मंगळवारी न्यायालयात सुद्धा पोलिसांनी जामीन अर्ज रद्द करण्यास फारसा आग्रह धरला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने आता तरी पोलीस ह्या बड्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बेड्या ठोकणार का? एखादया छोट्याशा गुन्ह्यात देखील ज्या पद्धतीने सामान्य नागरिकांना अटक करून पोलीस कोठडीत डांबले जाते त्याच पद्धतीने ह्या बड्या अधिकाऱ्यांना देखील कोठडीत डांबणार का? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत .

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्या – संतोष केणे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय कृती समितीसोबत बैठक आयोजित करुन देणार असल्याचे आश्वासन सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

लोकनेते दि.बा.पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालय समोरील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली यावेळी नाना पटोले बोलत होते. शिष्टमंडळात सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक जे एम. म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, काॅग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे, सहचिटणीस दीपक म्हात्रे, ॲड. मनोज भुजबळ, जासईचे सरपंच मेघनाथ म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.