Home Blog Page 286

मुलुंड पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इसमास केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुलुंड येथे ऍक्टिव्हा मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इसमास मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले आहे.

त्याच्याकडून एकूण २० ऍक्टिव्हा मोटार सायकल (अंदाजे कींमत ८,००,००० /- आठ लाख रुपये) हस्तगत करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी स्वतंत्रपणे राज्याला कोरोना लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत.

काय लिहिलं आहे पत्रात..
गेल्यावर्षी कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असं राज यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो ? असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळकळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ ही हवीच.

कोरोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

*राज ठाकरेंच्या पंतप्रधानांकडे पाच प्रमुख मागण्या..*
१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
२) राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
३) सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
५) कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

संपादक: मोइन सय्यद

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

१२ एप्रिल, १८६७ रोजी दिवशी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता ७ पैसे! तिसऱ्या श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाऱ्या वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, कारण मध्ये स्थानके कमी होती. स्थानके अशी होती – नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड.

मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ ला अधिक महत्त्व आहे, कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन – देशातली पहिली ट्रेन – धावली. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे माजी मुख्य ऑपरेशन मॅनेजर ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नसेल. हे दुर्भाग्यपूर्णच आहे.’ मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे.

राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू.. आर्थिक सहाय्य कोणाला किती ? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि. १३ एप्रिल २०२१
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज..

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी..

कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही..

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार..

कामगारांसह, आदिवासी,  असंघटीत क्षेत्राला दिलासा..

मुंबई, दि. १३ : – कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले आहे.

राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत

राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. .

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

आदिवासी कुटुंबांना सहाय्य

आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

ब्रेक द चैन !! काय आहेत निर्बंध ?
उद्या सायंकाळी ८ वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे. मंगळवेडा पंढरपूर मध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.

उद्या संध्याकाळपासून राज्यात १४४ कलम लागू

पुढचे १५ दिवस संचारबंदी अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावराचे दवाखाने सुरु राहतील.मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू राहतील.

अधिस्विकृती पत्रकारांना मुभा

हाॅटेल्स, रेस्टांरंट “टेक अ वे” सुरुच राहतील

रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांनाही “टेक अ वे” ची घोषणा

प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ ७ कोटी लोकांना देण्यात येईल एक महिना मोफत. १० रुपयांची शिवभोजन थाळी ५ रुपयांवर केली तेव्हा काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला, आता मोफत देणार.

रोजी रोटीचा भार नाही कर्तव्य पार पाडत आहे

वयोवृदध, महिला, आदिवासी, निराधार लोकांना २ महिन्यांकरीता हजार रुपये ३५ लाख लोकांना देत आहोत

नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणि घरकाम करणा-या लोकांना मदत करीत आहोत

अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये देत आहोत ५ लाख लाभार्थ्यांना फायदा होणार

नोंदणी असलेल्या रिक्षाचालकांना १५०० रुपये देत आहोत

५ हजार ४०० कोटी रुपये आपण कोव्हिडसाठी वापरत आहोत

असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसहाय्य जाहीर केले आहे..

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन, दत्त मेडिकलचा सेवाभाव

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अकोल्यातील सेवाभावी दत्त मेडिकलने गेल्या महिनाभरापासून एक वेगळा सेवाभाव जपला आहे. हे मेडिकल रेमडीसीवीर इंजेक्शन ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना देत आहे. त्यामुळेच एकीकडे इतर ठिकाणी काळ्या बाजारात ४० ते ५० हजारांपर्यंत विकलं जाणारं हे इंजेक्शन अकोल्यात मूळ १४७५ रुपये दरात मिळत आहे.शहरातील सिव्हिल लाईन्स चौकातील दत्त मेडिकलची ओळख सेवाभावी मेडिकल अशी आहे.

महिनाभरापूर्वी मेडिकलचे संस्थापक संचालक प्रकाश सावला यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांनी रुग्णालयांकडून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णांची होत असलेली लूट पाहिली. अणि त्यामधूनच ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन महिनाभरापासून ग्राहकांना द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाचं जिल्हा प्रशासन आणि मंत्रालय पातळीवर कौतुक झालं आहे.सध्या रेमडीसीवीरचा होत असलेला काळाबाजार पाहता अगदी परवडणाऱ्या भावात इंजेक्शन मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे.

अकोल्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह अहवाल – ३१०१५ – मृत – ५१३ डिस्चार्ज – २५४१० – दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) – ४०९२
सध्या कोरोनाच्या या संकटकाळातही अनेकजण माणुसकी हरवताना दिसत आहेत. मात्र, अकोल्यातील दत्त मेडिकलने दिलेला हा माणुसकीचा परिचय निश्चित राज्यातील इतर मेडिकल चालकांनी आत्मसात करणं गरजेचं आहे.