Home Blog Page 300

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे – तेलंगना राज्य येथून १२ किलो गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना अटक करण्यात ठाण्याच्या गुन्हे शाखा, घटक – १ यांना यश आले आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, एक इसम कॅसलमील नाका, अभिरुची बस स्टॉप, ठाणे येथे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक – १ यांना मिळाली.

सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ११.९५० किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.

सदर प्रकरणी त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.

कल्याण डोंबिवलीत वाढला कोरोनाचा कहर! उद्यापासून कठोर निर्बंध लागू!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध उद्यापासून (दि. 11 मार्च) जाहीर करण्यात आले. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध उद्यापासून (दि. 11 मार्च) जाहीर करण्यात आले. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तर हे टाळेबंदी नसून निर्बंध लागू करण्यात आल्याचेही यावेळी पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले

पालिकेसह पोलीस प्रशासनही उद्यापासून सज्ज.

कल्याण डोंबिवलीमध्ये आज (दि. 10 मार्च) कोरोनाग्रस्तांचा आकडा आला व सर्वच प्रशासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये 392 नवे कोरोनाग्रस्त आढळले. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजेच 5 महिन्यांनंतर येथील कोविड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद

उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शिव मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार. केवळ पूजा करण्यासाठी ही मंदिरे उघडली जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) असणारे कोविड रुग्ण सर्रासपणे फिरत असल्याचे आढळून आले असून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. असे रुग्ण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून हे असतील निर्बंध..

अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवणे.शनिवार आणि रविवारी पी1-पी2 नूसार दुकाने सुरू ठेवणे.खाद्यपदार्थ आणि इतर हातगाड्या संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी असेल. हॉटेल्स-रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवणे. पोळीभाजी केंद्र 9 वाजेपर्यंत सुरू राहणार.पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार.भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणार.लग्न- हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोकं नकोत, जास्त लोकं असल्यास गुन्हे दाखल होणार.लग्न हळदी समारंभ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी, मास्क घातलेच पाहिजेत.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि वराच्या पित्यासह हॉल व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई! नेपाळी चरस तस्कर अटकेत; त्याच्याकडून १४ किलो चरस जप्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कांदिवलीच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला एक नेपाळी गॅंग नेपाळहून मुंबईमध्ये चरस ची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने नॅशनल पार्कजवळ नानासाहेब धर्माधिकारी चौक येथे सापळा रचला.

काही वेळातच या गॅंग चा एक सदस्य तिथे आला असता त्याला अटकाव करून दोन पंचासमक्ष पंचनाम्या अंतर्गत त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एकूण १४ किलो ५६ ग्राम चरस हा अंमली पदार्थ आढळून आला.

हा चरस चा साठा त्याने नेपाळहून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या मालासहित सदर इसमाला अटक करण्यात आली असून अमली पदार्थ कक्षाची पुढील चौकशी व तपास सुरू आहे.

घर मालकाचे दागिने चोरून पलायन करणाऱ्या महिलेस अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई – घरमालकाचे सोन्याचे दागिने चोरी करून पलायन करणाऱ्या पेइंग गेस्ट महिलेस अटक करण्यात रबाळे MIDC पोलिसांना यश आले आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी महिला आणि आरोपी महिला यांची मागील एका महिन्यापासून ओळख झाली होती. तेव्हापासून फिर्यादी यांनी सदर महिलेस पेइंग गेस्ट म्हणून घरी राहावयास ठेवले होते. फिर्यादी महिला या गावी गेल्या असताना सदर महिलेने फिर्यादी यांच्या घरातील ७,८४,०००/- रु. किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५,०००/- रु. चोरी केली असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रबाळे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून सदर महिलेस चिंचपाडा, ऐरोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून १४.८ तोळे सोन्याचे दागिने व ७०० रु. रोख रक्कम असे एकूण ६,६७,२००/- रु. किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांना भरलेल्या बोलेरो वाहनाच्या मालकाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत मुंब्रा खाडीत आढळल्यानंतर राज्यात एकाच खळबळ उडाली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एन.आय.ए कडे देण्याची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास ए.टी.एस कडे सोपवत असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी ए.टी.एस कडे दिलेला आहे.

या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात.
सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच असते.
स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे,
प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तो देखील आमच्याकडे आहे आणि म्हणून ए.टी.एस कडे हा तपास दिला आहे.
पण एन.आय.ए कडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही” असंही शेवटी ते म्हणाले..