Home Blog Page 302

कल्याण डोंबिवली मनपा ची कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जंतुनाशक व धूर फवारणी

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

संपूर्ण राज्यात आणि डोंबिवली कल्याणात महाभयंकर कोरोना साथीचा संसर्ग वाढत चालला असताना रुग्ण संख्येत दिवसाकाठी वाढ होत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे सुरक्षा उपाय योजना म्हणून जंतुनाशक आणि धुर फवारणी मोहिम कल्याण डोंबिवली शहरात राबविण्यात येत आहे.

पालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, कल्याण डोंबिवली शहरात विशेष मोहिम ६ आणि ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून, घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रभागात कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

डोंबिवली येथील `फ` आणि `ग` प्रभाग क्षेत्रात मोहीम राबविण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्य आरोग्य निरिक्षक नरेंद्र धोत्रे, वसंत देगलूरकर, शेकडो कर्मचारी ११ सिटी ट्रक्टर्स, ४ जिप फॉग मशीन, तसेच दहा प्रभागातील हँड फॉग मशीन द्वारे जंतुनाशक फवारणी आणि धुरावणी करण्यात आली.

कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ लाख ८४ हजार १०० रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त

प्रतिनिधी : अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सापळा रचून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या विजयकुमार पटेल याला अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा १०० किलो वजनाच्या गांजासह मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली जीप असा एकूण १८,०३,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कल्याण सत्र न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बिर्ला कॉलेज रोडवर इंदिरा नगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर एक जण अंमली पदार्थांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून विजयकुमार पटेल याला पकडून गजाआड केले व एव्हढा गांजा कुठून आणला व कोणाला विकणार होता याची पुढील चौकशी सुरू आहे.

सुशांत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने दाखल केले 30 हजार पानांचं आरोपपत्र

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात आणि देशात गाजलेल्या बॉलिवूडच्या बातम्यांपैकी सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने काल न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे.
एन.सी.बी.चे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः आरोपपत्र सादर केले आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून एन.सी.बी.कडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तब्बल ३० हजार पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. रियाला अटक सुद्धा करण्यात आलं होतं. तसंच एक महिना ती तुरूंगातही होती. रियाचं नावही आरोपपत्रात असून, ३० हजार पानांच्या या आरोपपत्रांमध्ये रियाच्या भावासह ३३ जणांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असताना एन.सी.बी ने काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावं यात आहेत.
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता.

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.
त्याच्या मृत्यूवरून नंतर प्रचंड वादविवाद झाले.
सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता.
सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली ?
हा वाद सुरू असतानाच ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं.

या प्रकरणात एन.सी.बी.ने तपास सुरू केला होता.
अनेक ठिकाणी धाडी टाकत एन.सी.बी.ने ड्रग्ज जप्त केलं होतं. तसेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मा. न्यायालय काय न्याय निवाडा देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अनैतिक संबंधांतून रिक्षाचालकाची हत्या, महिला पोलीस असलेल्या पत्नीनेच दिली सुपारी!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीचा सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावात घडली असून या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती पोलिसांच्या समोर आली आहे.

महिला पोलीस कॉन्स्टेबलनेच आपल्या पतीचा खून करण्यासाठी पोलीस असलेल्या प्रियकराला सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी महिला पोलिसासह पाच जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुंडलिक आनंदा पाटील (वय-३० रा. पोलीस कॉलनी, रुम नं. ७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाटील यांच्या पत्नी वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मयत पुंडलिक पाटील हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. पाटील यांच्या पत्नीचे वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातून तिने पतीचा खून केला.

पोलिसांनी महिला पोलीस, तिचा प्रियकर आणि प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या तिघांना अटक केली आहे. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी मनोर येथे ढेकाळे परिसरात पुंडलीक यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. या गुन्ह्यात मिळालेल्या विविध माहितीच्या अनुषंगाने या पथकांनी पाच जणांना विविध ठिकाणाहून अटक केली आहे.

देशभरातून मोबाइल चोरणारी टोळीअटकेत, टोळीकडे आय क्लाउडचा डेटा आणि अकाउंट डिलीट करण्याचे कौशल्य

प्रतिनिधी: अवधुत सावंत

चोरीला गेलेले व २ महिन्यांपेक्षा जास्त काळ हरवलेला मोबाइल शोधताना तांत्रिक विश्लेषणातून गुन्हे शाखेच्या कक्षास मोलाची माहिती अशी प्राप्त झाली कि आय-क्लाउड अकाउंट डिलीट करणे सहजा सहजी शक्य नसल्यामुळे आय फोन चोरी करून, इ क्लाउड वरील अकॉउंट व इतर माहिती सॉफ्टवेअर द्वारे डिलीट करून ते फोन ग्राहकांना पुन्हा विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्याप्रमाणे चोरीच्या मोबाईलचे आय क्लाउड अकाउंट आणि इतर माहिती डिलीट करणाऱ्या संशयित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली.

अंधेरी येथील बॉनी प्लाझा शॉपिंग सेंटर या दुकानात काही इसम चोरीचे अँड्रॉइड फोन फॉरमॅट करणे आणि आय क्लाउड अकाऊंट डिलीट करण्यासाठी येणार असल्याचो माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून या दोनही इसमांना आणि दुकान मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपास केला. या टोळीच्या म्होरक्याकडे विविध राज्यातील चोरी केलेले फोन जमा होतात आणि ते सर्व फोन बोनी प्लाझा येथे आणले जातात. यातील एक आरोपीं सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्व अँड्रॉइड फोन फॉरमॅट करतो तसेच परदेशातील हॅकर्सच्या मदतीने आय क्लाउड अकाऊंट डिलीट करतो.
या इसमांकडून ७० चोरीचे मोबाइल, हार्ड डिस्क, फॉरमॅट करण्याकरता लागणारे विविध कंपन्यांचे डोंगल, विविध कंपन्यांचे सिम कार्ड असा ₹.९,१३,६०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.