Home Blog Page 315

शेतकरी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी पनवेलचे रामदास पाटील यांची नियुक्ती !!

0

जगदीश काशिकर, उरण : रायगड जिल्हा: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील मूळ भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाजाचे अस्तित्व सध्या विविध कारणांनी धोक्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधव, कामगार, शेतकरी वर्गांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी प्रबोधिनी ही संस्था शेतकऱ्यांना, कोळी बांधवांना, कामगारांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच रामदास हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मु – नितळस तालुका पनवेल येथील रहिवाशी असलेले रामदास हरिश्चंद्र पाटील यांचे आजपर्यंतचे कार्य व गोरगरिबांविषयी, कामगार, कोळी, शेतकरी बांधवांविषयी असलेली तळमळ पाहता कामगार, कोळी बांधव, शेतकऱ्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधन या संस्थेच्या उपाध्यक्षपदी रामदास हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली. रामदास पाटील यांची निवड संस्थेच्या उपाध्यक्ष पदी झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँगेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी !

मिलन शाह, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर एका व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) असे फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने फोन करून ‘रूपाली चाकणकर कुठे आहे, मला तिचा मोबाईल नंबर हवा आहे. ती काय करते पाहून घेतो. तिचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो’, अशी धमकी दिली.

चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी सदर प्रकार चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या पूर्वी मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनाही धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर बर्निंग बसचा थरार! बस चालकाच्या समयसूचकतेमुळे प्रवासी बचावले!

मिलन शाह, लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या समयसुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अग्निशमन दलांच्या जवानांनी तातडीने आग विझवली.

सकाळी सोलापूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या खासगी प्रवासी बसमध्ये अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. बर्निंग बसचा हा थरार पाहून परिरातील ग्रामस्थ आणि बसमधील प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली. चालक आणि वाहकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने सर्व प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर उतरवले.

नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर १५ ते २० मिनीटांमध्ये पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी पाण्याचा मारा करत एका तासात आग विझवली. या दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.

नाताळच्या पूर्वसंध्येला आय.सी. कॉलनीमध्ये सेल्फी पॉइंटचे लोकार्पण सोहळा संपन्न !

जगदीश काशिकर, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 01 या आपल्या प्रभागात सर्वाधिक उद्याने असून यामागे आपले सर्वांचे सहकार्य असल्याचे शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. एक व्हिजन ठेऊन नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी याठिकाणी विभागाचा कायापालट केल्याचे सांगत आपण याचे साक्षीदार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पुनर्विकास आराखड्यात शहरासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. बोरिवली पश्चिमेकडील आय. सी. कॉलनी रहिवाशासाठी नाताळच्या पूर्वसंध्येला काल एका लक्षवेधी सेल्फी पॉइंटचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. आय सी कॉलनी, आय. सी.रेसिडन्सी याठिकाणी संध्याकाळी ह्या सेल्फी पॉइंटचे उदघाटन सेंट लुईस चर्चचे फादर रोनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.आय.सी. कॉलनीतील ह्या आकर्षक सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून स्वच्छ- सुंदर आय. सी. कॉलनी हे ब्रीदवाक्य खरोखरच सार्थ ठरेल असे माजी नगरसेवक, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी वुमन वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष ईव्हान डिसूज़ा, आय.सी.सी.आर.डब्ल्यू .ए. चे किशोर मारवाड़ी, आय.सी.कॉलनी स्पोर्ट्स क्लबचे सचिव दयानंद कुमार, मुंबई मोहल्ला कमिटी मोमेंट ट्रस्टचे मेरी डिसूज़ा, विधानसभा संघटक बालाकृष्णा ढमाले, शाखाप्रमुख राजेन्द्र इंदुलकर,भूपेंद्र कवळी, आय. सी विजनचे रैंडल परेरा, शाखा संघटक जुड़ी मेंडोसा, युवासेना शाखा अधिकारी जितेन परमार, शाखा समन्वयक दर्शित कोरगावकर सहित स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची खासदार राजन विचारे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मागणी

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासोबत २३ डिसेंबर रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील विकास मुद्द्यांवर चर्चा केली.

त्यामध्ये सर्वप्रथम एम. आर. व्ही. सी. मार्फत बोरवली ते विरार दोन वाढीव लाइन टाकण्याच्या कामाची स्थिती जाणून घेतली असून मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा आराखडा बनविताना खासदार राजन विचारे यांनी मी केलेल्या सूचनांचा समावेश केला आहे का? तसेच या नवीन लाईनमुळे दोन्ही रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळू शकणार आहे का? असा सवाल खासदार राजन विचारे यांनी बैठकीमध्ये घेतला.

त्यावर पश्चिम रेल्वेने खासदार राजन विचारे यांना बोरवली ते विरार दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनचे काम एम आर व्ही सी मार्फत हाती घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील बोरवली, दहिसर, मिरा रोड, नायगाव, वसई रोड वरील आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भाईंदर नालासोपारा व विरार पर्यंतचा आराखडा एम आर व्ही सी मार्फत मान्यतेसाठी पश्चिम रेल्वेस प्राप्त झालेला नाही. प्राप्त झाल्यास मान्यता देऊ असे रेल्वेने कळवले आहे.

तसेच एम आर व्हि सी ने नायगाव व भाईंदर या दोन रेल्वेस्थानकामधील नव्याने होणाऱ्या खाडी पुलाच्या दोन्ही बाजू असेलेल्या मातीच्या चाचणीच्या सर्वेक्षणाच्या निविदा काढण्यात आलेला आहेत. तसेच 11.70 हेक्‍टर जमीन मिळविण्यासाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास चार वर्षे लागणार आहेत असे रेल्वे कडून खासदार राजन विचारे यांना कळवले आहे.

तसेच नव्याने होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे भाईंदर व मीरा रोड या रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मान्यता घेण्यात येईल व त्यानंतर या रेल्वे स्थानकात गाड्यांना थांबा मिळू शकेल असे कळविले आहे. जोधपूर, जयपूर, अजमेर, उदयपूर अहमदाबाद या व इतर राज्यात जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या येताना व जाताना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे असे खासदार राजन विचारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वेला विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना रेल्वे प्रशासनाकडून या दोन्ही रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने, लिफ्ट, तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीन, रेल्वे स्थानकातील फेऱ्या, शौचालय, सुरक्षेसाठी बसविलेले सी सी टीव्ही यावर भर देऊन वाढविण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाने कळविले.

पुढील प्रश्नांमध्ये होर्डींग ने मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानके झाकली गेली असून नागरिकांना अडथळा ठरत आहेत ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी वारंवार करून सुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यावर बाधित ठरणारी सर्व होल्डिंग काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जातील असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

पुढील प्रश्नांमध्ये खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्चिम फाटक रोड येथील भुयारी मार्गाच्या दुरवस्थेबाबत विचारले असता रेल्वे प्रशासनाने या कामाच्या निविदा प्रक्रिया 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होऊन महानगरपालिके मार्फत रस्त्याचे काम मार्गी लागेल असे कळविले आहे. तसेच या ठिकाणी नवीन उड्डाणपुलासाठी प्राधिकरणामार्फत आराखडा प्राप्त झाल्यास डिपॉझिट टर्म वर उड्डाणपुलाची निर्मिती करू शकतो असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.