Home Blog Page 4

*यशवंत विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप* *विद्यार्थ्यांनी बालवयात चिकित्सकपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा .* *आय पी एस अधिकारी सागर खर्डे यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

सद्यस्थितीला देश आणि विदेशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बाल वयातच चिकित्सकपणे सर्व विषयाचा अभ्यास करावा असे आग्रही प्रतिपादन प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी श्री सागर खर्डे यांनी केले .
ते दि.15 रोजी यशवंत विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर हे होते.
या वेळी व्यासपीठावर
प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट भगवानराव पौळ, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे ,पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी प्रा. शिवशंकर पाटील, खयूम शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सागर खर्डे पुढे बोलताना म्हणाले की स्वप्न मोठे पहा, ते पूर्ण करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती ठेवून त्याचा पाठलाग करा, 50% वाला विद्यार्थी सुद्धा जिद्द, चिकटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशस्वी होतो. न्यूनगंड बाजूला ठेवा, विनम्रतेने अभ्यास करा जाहीर आवाहन केले.
डॉक्टर अशोक सांगवीकर यांच्या भाषणाने अध्यक्षीय समारोप करण्यात आला.
या समयी उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, प्रा. शिवशंकर पाटील यांचे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सृष्टी बेरळकर, सोहम देशमुख यांचे मनोगत पर भाषणे झाली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार डॉ. शरद करकनाळे यांनी मांनले.
यावेळी दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आय पी एस अधिकारी सागर खर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

**शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा.* *लोहारे गुरुजी यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी*- *माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे आणि त्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आग्रही प्रतिपादन लोकनेते तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.
ते दि.12 रोजी यशवंत विद्यालयात आयोजित शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी सभापती आर डी शेळके, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, एस एस एम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कवी अनिल मुळे,सचिव प्राध्यापक डॉक्टर सुनिता चवळे, एडवोकेट प्रकाश चवळे, सिद्धी शुगरचे एम.डी.पी.जी. होनराव , जि प चे माजी अध्यक्ष ज्ञानोबा घुमंनवाड, प्राचार्य गजानन शिंदे, कमलाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे, संचालक शिवाजीराव पाटील, राम बेल्लाळे,राहुल शिवपुजे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की शिक्षण महर्षी डी बी.लोहारे गुरुजी यांनी जीवनभर शैक्षणिक क्षेत्रात कर्मयोगी सारखे काम केले असून कामामुळे माणूस मोठा होतो. त्यामुळे तरुणांनी सकारात्मक काम करावे असे आवाहन केले.
यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुनिता चवळे, डॉक्टर भालचंद्र पैके, कवी अनिल मुळे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
प्रास्ताविक माधव वाघमारे, यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
यावेळी सत्कार संयोजन समितीच्या वतीने शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी व पुष्पाताई लोहारे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार स्मृतीचिन्ह, भर आहेर देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य रामलिंग मुळे, प्राचार्य अशोक पेदेवाड, प्राचार्य व्ही बी गंपले, मुख्याध्यापक रवी साकोळकर, मुख्याध्यापक राजकुमार घोटे, उपप्राचार्य प्राध्यापक मुजमिल सय्यद, मुख्याध्यापक राजेश्वर पारशेटे, मुख्याध्यापक रमेश जटाळ, मुख्याध्यापक दत्तात्रय तुंमराम, मुख्याध्यापक एस बी फड, एस एस एम प्रतिष्ठानचे प्राचार्य डॉक्टर दिलीप मुगळे, सोमनाथ स्वामी, आशा रोडगे, कलावती भातंबरे,शरण चवंडा यांच्यासह मान्यवरां ची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार पाटील, बालाजी सोनटक्के, प्रा विश्वंभर स्वामी, प्रा.शिवशंकर पाटील, श्रीधर लोहारे, मनोहर ढेले, गुरप्पा बावगे, डॉक्टर शरद करकनाळे यांच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी राजेंद्र सूर्यवंशी तर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांचे निवड*

अहमदपूर:-
मासूम शेख

टागोर शिक्षण समिती अंतर्गत चालणाऱ्या यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी पदोन्नतीने श्री राजेंद्र सूर्यवंशी यांची व त्या रिक्त झालेल्या जागेवर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल या दोघांचा प्राचार्य गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी वसंत जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथ देऊन देऊन सन्मान करण्यात आला.
या निवडीबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव प्रा. डॉक्टर सुनीताताई चवळे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

*एनएसएस मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समस्या सोडविण्याचे सामर्थ्य येते – पृथ्वीराज पाटील एकंबेकर*

अहमदपूर:-
मासूम शेख

एनएसएस शिबिराच्या माध्यमातून देशाचा आधारस्तंभ घडत असतो. एनएसएस स्वयंसेवक शिबिराच्या दरम्यान गावच्या विविध समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्याचे सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करतात आणि ग्राम संस्कृतीशी एकरूप होतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे बीदर जिल्हा सचिव तथा युवा नेते पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष शिबीर मौजे हसर्णी ता. अहमदपूर येथे दि. २५ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा ज्येष्ठ सदस्य ज्ञानदेव झोडगे हे होते. तर किसान मंचावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, अजित पाटील तोंडचिरकर यांच्यासह अहमदपूरच्या पीएसआय स्मिता जाधव, सरपंच वैशाली करे, प्रा. डॉ. रमेश गंगथडे, माजी सरपंच बालाजी गंगथडे, उपसरपंच बालाजी राऊतराव, तंटामुक्ती अध्यक्ष विलास राऊतराव, पोलीस पाटील गिरजाप्पा परीट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा तिडोळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शादुल्ला शेख, शिवाजी गौंड, बळीराम गौंड, नारायण गव्हाळे, बाबुराव करे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा देशमुख, वनिता नरवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी पुढे बोलतांना पृथ्वीराज पाटील एकंबेकर म्हणाले की, अशा शिबिराच्या माध्यमातून समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातूनच राष्ट्राची जडणघडण होते. तसेच शेतकऱ्यांचे जीवन उज्ज्वल करण्यासाठी महाविद्यालयाने ‘माती परीक्षण’ सारख्या प्रयोगशाळा सुरू करून शेतकरी बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासात एनएसएसच्या स्वयंसेवकाचे सेवा, समर्पण, त्याग आणि संयम गुणांचे योगदान आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांनी स्वानुभवातून स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्याच्या वतीने कु. ऋतुजा देशमुख, गोवर्धन जाधव, कु. वनिता नरवटे, कु. प्रतीक्षा राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. तर ग्रामस्थांच्या वतीने व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. रमेश गंगथडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शादुल्ला शेख आदींनी आपल्या मनोगतातून शिबिराच्या यशस्वीते बद्दल भाष्य केले. याबरोबरच सन २०२४-२५ चे एनएसएस उत्कृष्ट स्वयंसेवक सागर जंगापल्ले व ओम मुंढे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शिबीर अहवाल कार्यक्रमा- धिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी सादर केला व सूत्रसंचालन ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामस्थांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व एनएसएसचे स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सामाजिक परिवर्तनात समाजसुधारकांचे मोठे योगदान – डॉ. मारोती कसाब*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारताला संत, महंत, कलावंत, विचारवंत आणि समाज सुधारकांची मोठी परंपरा लाभलेली असून, भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात समाज सुधारकांचे मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन डॉ.मारोती कसाब यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या निवासी युवक शिबिरात मौजे हासरणी ता. अहमदपूर येथील उद्बोधन कार्यक्रमात डॉ. कसाब बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे हे होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. कसाब म्हणाले की, भारतातील संत, विचारवंत आणि समाज सुधारकांनी केलेले सामाजिक परिवर्तन हा जगाच्या अभ्यासाचा विषय झाला आहे. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा कबीर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदींनी भारतीय समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. आधुनिक काळात राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तन चळवळीत दिलेले योगदान लक्षणीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. बब्रुवान मोरे म्हणाले की, भारतीय समाजाला मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची आवश्यकता असून अज्ञान, अंधश्रद्धा, भेदभाव, शोषण या सर्वांविरुद्ध लढण्यासाठी महामानवांच्या विचारांची आज मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली असून, सामाजिक चळवळींची गरज आहे असेही ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी केले. तर आभार प्रसाद शिंदे यांनी मानले. यावेळी शिबिरार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.