Home Blog Page 7

*अहमदपुरात तिसरे जागल मराठी साहित्य संमेलन उत्साहात साजरे* *मराठी साहित्य चळवळीतून आदर्श समाज उभा करावा* *सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारतीय संस्कृतीमध्ये मराठी साहित्याला अनन्य साधारण असे महत्त्व असून मराठी साहित्यामुळे जीवन जगण्याला प्रेरणा, आधार आणि दिशा मिळते त्यामुळे सर्वांनी मराठी साहित्याचा आस्वाद घेऊन मराठी साहित्य चळवळीतून आदर्श समाज उभा करावा असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
ते मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूर च्या वतीने आयोजित तिसरे जागल मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
जागल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, व्यासपीठावर मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ.दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते, म.सा.प. शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, उपाध्यक्ष उदयकुमार जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की साहित्यातून शेती, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रात मोठे बदल करून ग्रामीण भागात सहकार चळवळ अग्र क्रमाणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, मराठीला खूप जुनी परंपरा असल्याचे सांगून मराठी भाषा ग्रामीण आणि शहरी भागात रुजवायची असेल तर प्रामाणिकपणे मराठी भाषेचा चिकित्सकपणे अभ्यास करावा.असे जाहीर आवाहन केले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की, माणूस प्रतिकूल परिस्थितीत असला तरी शिक्षणात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ठेवून अभ्यास केल्यास सर्वसामान्य माणूस असामान्य होतो असे सांगून विविध साहित्याचा अहवाल त्यांनी सादर केला. ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जीवंत ठेवण्यासाठी लोक साहित्याचा अभ्यास करावा असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नामदार बाबासाहेब पाटील यांचा कॅबिनेट दर्जाचा सहकार मंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान नामदार बाबासाहेब पाटील, सत्यनारायण काळे यांच्या हस्ते ग्रंथ, सन्मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सत्यनारायण काळे परिचय प्रा.द.मा.माने, सूत्रसंचालन राम तत्तापुरे आणि सौ आशा तत्तापुरे-रोडगे यांनी तर आभार उदय जोशी यांनी मानले.
कार्यक्रमाचा शुभारंभ वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदे चे मोहिब कादरी, प्रा. गुरुनाथ चवळे, जिलानी शेख गंगाधर याचवाड,अनिल फुलारी प्रा. यादव सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*किलीबल नॅशनल स्कूल येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*

अहमदपूर :-
मासूम शेख

तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह जिजाऊ यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका उज्वला परचंडे, प्रतीक्षा बेंबडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
इयत्ता पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यात भाषण गीतगायन समूह नृत्य अशा कार्यक्रमात भाग घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शेवटी जिजाऊ यांच्या भूमिकेत असलेल्या उज्वला मॅडम व प्रतीक्षा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा माने ,उषा पांचाळ यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याची प्रेरणा दिली—- डॉ. संतोष पाटील*

अहमदपूर:-
मासूम शेख

जगातल्या विद्वानांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊंचे मोठे योगदान असून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची खरी प्रेरणा जिजाऊंनी दिली, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिजाऊंना आपल्या पूर्वजांकडून मिळालेले संस्कार हे सैनिकाचे होते. तेच संस्कार त्यांनी शिवबावर आणि शिवबांच्या सोबत असलेल्या बाल मावळ्यांवरही केले. शिवबांना स्वराज्याचे बाळकडू जिजाऊंकडून मिळाले. जिजाऊंनी शिवबांना लष्करी शिक्षण दिल्यामुळेच ते स्वराज्य निर्माण करू शकले, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवबांच्या स्वराज्याला आकार दिला तसेच शिवरायांचा राज्यकारभार रयतेसाठी आदर्श ठरावा यासाठीही प्रयत्न केले. तसेच स्वामी विवेकानंदांनी युवकांना ध्येय प्राप्तीसाठी प्रेरणा दिली, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले. प्रास्ताविक ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले, तर डॉ. सतीश ससाणे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*अहमदपुरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे ‘दक्षिण भारत अभ्यास’ अभियान*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक भौगोलिक वैभवांसह इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी ‘ दक्षिण भारत अभ्यास’ अभियान मोहिमेचा प्रारंभ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी या अभियानास हिरवा झेंडा दाखवून केला.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शैक्षणिक तसेच समाजोपयोगी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे विविधतेने नटलेल्या भारताच्या वैभवाचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास मोहिमेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला असून या मोहिमेत विजयपूर, बागलकोट, हॉस्पेट , हम्पी , हुबळीसह इतर ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तेथील ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास करण्यात येणार आहे.
या मोहिमेत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील,उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सहलीचे नेतृत्व करणारे सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे, प्रोफेसर ह.भ.प. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. मारोती कसाब, प्रोफेसर डॉ. नागराज मुळे, डॉ. पांडुरंग चिलगर, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. बी.के. मोरे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापुरे आदींचा समावेश आहे.

*किलीबल नॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

अहमदपूर:-
मासूम शेख

तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका, अंजली भंडारे, स्वाती कुमठेकर, संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
ज्ञानोबा भोसले पुढे बोलताना म्हणाले, की 18 व्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी मोठे कार्य केले. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्या केवळ फुले दाम्पत्याच्या दूरदृष्टीमुळे. चूल आणि मूल या पारंपरिक चौकटीतून महिलांना बाहेर काढून शिक्षण दिल्याने महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत, ही अमूल्य गोष्ट आहे.