Home Blog Page 72

‘एनडीटीव्ही’ च्या संचालक मंडळावर अदानी समूह येणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अदानी समुह आता ‘एनडीटीव्ही’ चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समुह आता ‘एनडीटीव्ही’वर आपला ताबा मिळविण्यासाठी पुढची पावले उचलत असल्याचे प्रॉक्सी कंपन्यांच्या सल्लागारांनी सांगितले.

प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्या आरआरपीआर होल्डींग्ज कंपनीत २९.१८ टक्के समभाग असलेल्या एनडीटीव्हीवर अदानी समुहाच्या विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनी त्यांच्या संचालक मंडळ आणू शकते, आणि खुल्या ऑफरने बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांना रस दाखवला नसला तरी, अदानी समूह हा ‘एनडीटीव्ही’चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे, आणि कंपनीवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे, असे प्रॉक्सी सल्लागार कंपन्यांच्या संस्थापकांनी म्हटले आहे. बुधवारी दुसऱ्या आठवड्यात खुल्या ऑफरसाठी इतर कोणत्याही गुंतवणूकदारांनी स्वारस्य न दाखविल्यामुळे अदानी समुह आता ‘एनडीटीव्ही’चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समुह आता ‘एनडीटीव्ही’वर आपला ताबा मिळविण्यासाठी पुढची पावले उचलत असल्याचे प्रॉक्सी कंपन्यांच्या सल्लागारांनी सांगितले.

अदानी ग्रुपची संपूर्ण मालकी असलेली ‘व्हीसीपीएल’ व्दारे ३७.४४ टक्क्यांपर्यंत शेअर होल्ड केल्यामुळे अदानी ग्रुप हा ‘एनडीटीव्ही’चा सर्वात मोठा एकमेव शेअरधारक बनला. अदानी ग्रुपने ३७.४४ टक्के हिस्सा मिळविल्यानंतर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे आता ३२.२६ टक्के एवढा एनडीटीव्हीचा हिस्सा राहिला आहे. २२ नोव्हेंबर रोजी ‘एनडीटीव्ही’च्या शेअर्सची खुली ऑफर जाहीर करण्यात आली होती, ही ऑफर ५ डिसेंबर पर्यंत असणार आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणीही गुंतवणूकदार कंपनीने शेअर्स खरेदीमध्ये स्वारस्य दाखविलेले नसल्याचे ‘मुंबई स्टॉक एक्सेंज’च्या माहितीवरुन दिसून येते. याबाबत अदानी ग्रुपकडून कोणतेही स्टेंटमेंट देण्यात आलेले नाही.

सेबीचे माजी कार्यकारी संचालक आणि प्रॉक्सी अॅडव्हायझरी फर्म एसईएसचे एमडी जे.एन. गुप्ता म्हणाले, “अदानी समूहाच्या स्टेकमुळे ‘एनडीटीव्ही’च्या संचालक बोर्डात अदानी ग्रुपच्या संचालकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीचे शेअर बुधवारी ४४६.३० च्या सर्किटवर खुला झाला. त्या किंमतीवर शेअरबाजाराच्या सत्रादरम्यान राहीला. यातील प्रत्येक शेअरवर २९४ रुपयांच्या सवलतीची ऑफर असून ती शेअर बाजाराच्या ३४ टक्के सवलतीची आहे. ही सवलत ऑफर सलग चौथ्या सेशनमध्ये ५ टक्क्यांच्या सर्कीटवर पोहचली.

गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार ही बदलणारी सवलतीची किंमत शेअरबाजाराशी सुसंगत राहण्याची शाश्वती नाही. गुप्ता म्हणाले सेबीने समभागधारकांच्या सुरक्षिततेसाठी एक खुली ऑफर अनिवार्य केली आहे. ज्या गुंतवणूकदारांना व्यवस्थापन बदलण्याच्या बाबतीत स्वारस्य असेल आणि ज्यांना व्यवस्थापनातील बदलामुळे कंपनीला चालना मिळेल असे वाटत असेल तर गुंतवणूकदार शेअरबाजाराच्या ऑफर किंमतीच्यावर ते ट्रेड करु शकतात आणि जर बाजार मंद असेल तर अशावेळी गुंतवणुकदार या खुल्या ऑफरचे सदस्यत्व घेऊ शकतात.

 

कोश्यारी, लोढा यांच्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी तोडले अकलेचे तारे !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि भाजप आमदार आणि सध्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधाने केली होती. या सगळ्यांत भर म्हणून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा धोरणात्मक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने हाती घेतलाय की काय असा सवाल सध्या पडत आहे. याचं कारण ठरतंय ते भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने. सर्वात आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल बादग्रस्त विधानं केलं होतं. त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि भाजप आमदार आणि सध्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादरग्रस्त विधाने केली होती. या सगळ्यांत भर म्हणून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे.

शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यामुळे छत्रपतीच्या अपमानाच्या मुद्द्यावरून शिंदे-भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यााधीही भाजपाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वादग्रस्त विधान

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान केले होते. तेव्हापासून या सर्व वादाला सुरुवात झाली आहे.

मंगलप्रभात लोढा यांचे वादग्रस्त विधान

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले होते.

सुधांशू त्रिवेदी यांचे विधान काय होते ?

राहुल गांधी म्हणाले की वीर सावरकर यांनी माफी मागितली आहे. मात्र, माफीनाम्यावर बोलायचं झालं तर, त्याकाळी सुटका होण्यासाठी अनेक जण माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगाजेबाला ५ वेळ पत्र लिहून माफी मागितली. असं वादग्रस्त विधान सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.

दरम्यान, आता सरकारमधील आणखी एक आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. समाजातील सर्व स्तरावरून आता थेट महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारलाच धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

एमएमआर क्षेत्रात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार संवेदनशील पावले उचलत आहे. मुंबईतील गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढवत ती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) देखील राबविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात ही योजना एमएमआरमध्ये राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील पायाभुत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी शहरातील रस्ते, चौक, फुटपाथ, फ्लायओव्हर्सचे सुभोभिकरण देखील वेगात केले जात आहे. मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सरकारने भक्कमपणे पावले उचलली आहेत. तसेच मुंबईत आणि मुंबई महानगर प्रदेशात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सागितले. यावेळी ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्विनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जगातील सुंदर शहर मुंबई असावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने आम्ही पावले उचलत असून शहरातील रस्त्यांचे देखील येत्या काळात काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते उभाऱण्यावर आता आमचा अधिक भर असेल.

तसेच मुंबईतील कोळीवाड्यांचा मुद्दा देखील महत्त्वाचा असून कोळीवाड्यांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी कोळीवांड्यांची संस्कृती, खाद्य संस्कृती जपण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
मुंबईत सध्या कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमाचे ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. जागतिक तापमानवाढीच्या दृष्टीने विचारमंथन व्हावे व मुंबईतील बदलत्या तापमानाच्या अनुशंगाने येत्या काळात आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठकीत चर्चा झाली.

 

उद्धव ठाकरेंना अतुल भातखळकरांचा बोचरा सवाल !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरे यांनी एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसविण्याच्या वक्तव्यावरून अतुल भातखळकर यांनी बोचरा सवाल केला आहे. कोण असावी बरं ती महिला?, असे छोटेशे ट्विट शेअर करत त्यांनी कुतुहल निर्माण केले आहे.

अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना घरातील किंवा मर्जीतील महिलेलाच तर मुख्यमंत्रीपदी बसवायचे नाही ना अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा अतिरेकी हस्तक्षेप होत असल्याचे आरोप यापूर्वीच झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर पुन्हा एकदा रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मध्यंतरी शिवसेनेतून फुटून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दिपाली सय्यद यांनी देखील पक्ष सोडत असताना संजय राऊतांसह थेट रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोपही दिपाली सय्यद यांनी केला होता.

शिवशक्ती-भीम शक्ती-लहू शक्ती जर एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत, हे सध्या मी अनुभवतो आहोत. सध्या मी घराबाहेर पडतो आहे तरी यांच्या पोटात गोळा यायला लागलाय. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले हेते. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

त्यांच्या या विधानानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर रश्मी ठाकरे यांच्यासोबतच आणखी एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अगदी ३ महिन्यांपूर्वी शिवसेनेत सहभागी झालेल्या सुष्मा अंधारे यांचं. सुष्मा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांत पक्षात आपले हक्काचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य करत असताना मनात कोणत्या महिला नेत्याचा विचार केला हा सध्या अभ्यासाचा विषय ठरत आहे.

 

पंतप्रधानांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार समृद्धी महामार्गाचे लोकार्पण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई – नागपूर रस्ते प्रवासाचे अंतर लक्षणियरित्या कमी करणाऱ्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणास अखेर मुहूर्त सापडला आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ही माहिती दिली आहे. महामार्गावरील वायफड नाक्याजवळ लोकार्पण सोहळ्यासाठीचं सभास्थळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

या पहिल्या टप्प्यातील द्रुतगती महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी अंतर आता १० तासांऐवजी फक्त ५ तासांत पार करता येणार आहे.

समृद्धी महामार्गाबाबत

यामुळे मुंबई ते नागपूर ८ तासांत अंतर पार करता येईल.
या दृतगती महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे.
महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे.
हा महामार्ग १० जिल्ह्यांमधील ३९० गावांना जोडणार आहे.