Home Blog Page 89

बाळासाहेबांच्या शिवसेनेने केला डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेवर कब्जा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर आज बाळासाहेबांच्या शिवसेनेने अखेर कब्जा मिळवला. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये या शाखेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ही शाखा शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांमध्ये डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची ? यावरून दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात राडा झाला होता व गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे सामंजस्याने दोन भागात विभाजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी दोन्ही गटातील हा वाद पुन्हा उफळला. ही शाखा आमचीच आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या आधीपासूनच या कार्यालयाच्या जागेची विक्री करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून बाळासाहेबांच्या शिवसेनेने हे कार्यालय अखेर कायदेशीर बाबी पूर्ण करत आपल्या ताब्यात घेतले आहे, असे शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख राजेश मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले.

यावेळी शिंदे गटातील राजेश कदम, नगरसेवक महेश पाटील, रवी पाटील, दीपेश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, रमेश म्हात्रे, संजय पावशे, रणजित जोशी, विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे आदी नगरसेवक तसेच उपशहरप्रमुख अमित बनसोडे आपल्या कार्यकर्त्यांसह मध्यवर्ती शाखेत येऊन बसलेले निदर्शनास आले.

 

डोंबिवलीतील शेलार प्रभागातील काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कै. शिवाजी शेलार यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेलार प्रभागाअंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होऊन सदर रस्ता नागरीकांसाठी शुक्रवार पासुन खुला करण्यात आला आहे. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या निधीतून त्रिमूर्ती नगर सार्वजानिक शौचालाय ते शिवसेना शाखा या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे उद्घाटन व शुभारंभ रविंद्र चव्हाण व इतर कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थित पार पडला.

 

अनेक दिवसांपसून रखडला गेलेल्या शेलार प्रभागातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी रविंद्र चव्हाण यांच्या मदतीने निधी मंजुर करण्यात आला आहे. सर्व रस्ते काँक्रीटीकरणातून व आतील सर्व गल्ल्याबोळ पेवरब्लॉकिकरणातून तयार करण्यात येणार असल्याची महिती रविंद्र चव्हाण यांनी या वेळी बोलताना दिली. तसेच तेथील नागरीकांचेही यात मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शशिकांत कांबळे, साई शेलार, नीलेश म्हात्रे, राजु शेख व इतर कार्यकर्ते या लोकार्पण सोहळ्यास उपस्थितीत होते.

 

मातोश्रीपेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही – दिपाली सय्यद


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रत्येकजण आपलं काम करीत असतो. मी जे करतेय ते कामातून लोकांसमोर येत आहे. आपण केवळ कृतीतून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला नेता सपोर्ट करीत असेल तर आपण त्याबरोबर जायला हवं. असं दिपाली सय्यद यांनी एक सूचक विधान केलं.

मागील काही दिवसांपासून माझा आवाज ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही. असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार, असं दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून सय्यद ह्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद नाराज असल्याचं बोललं जात आहे.

 

भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली असून त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला आहे. अत्यंत चुरशीने लढत होईल अशी अपेक्षा असलेल्या या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नंतर राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार आणि शेवटी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या, भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर विचार करून माघारीचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेतील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब करून पक्षाचे चिन्हं गोठवून पक्षाची नावे बदलून नवीन चिन्हे देणाऱ्या या निवडणुकीत अखेर भाजपाने उमेदवार दाखल केला आणि आता माघारही घेतली आहे.

मूळच्या शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती, पालिकेत नोकरीला असलेल्या त्यांच्या पत्नीला आधी राजीनाम्यासाठी झगडावे लागल्या नंतर आमदारकी मात्र आता सहज मिळणार आहे असे बोलले जात असून पोटनिवडणूक ही होणारंच असल्याचे चित्र दिसत आहे.

 

सरन्यायाधिशपदी न्या. धनंजय चंद्रचुड यांची नियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे. ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील.

न्या.धनंजय चंद्रचूड ९ नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. दरम्यान सरन्यायाधिशपदी अवघ्या ७४ दिवसांचा कार्यकाळ लाभलेले विद्यमान सरन्यायाधीशपदी न्या. उदय लळीत ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होणार आहेत

नवनियुक्त न्या.धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ पासन ११ जुलै १९८५ पर्यंत म्हणजे जवळपास ७ वर्षांपर्यंत होता. वडील निवृत्त झाल्यानंतर जवळपास ३७ वर्षांनी न्या.धनंजय चंद्रचुड याच पदावर विराजमान होतील.